Melghat Tourism : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीसाठी पर्यटकांची झुंबड!

अमरावती : विदर्भाच्या नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळाप्रमाणेच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या (Melghat Tourism) विविध भागात सुरू असलेल्या जंगल सफारी, हत्ती सफारीसाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. मेळघाटात वाघ, बिबट, अस्वल, रानगव्याचे दर्शन पर्यटकांसाठी एक पर्वणी ठरले आहे.



मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वैराट, सेमाडोह, शहानूर, नरनाळा, बोरी, घारगड, वसाली, सिपना गुगामल व अकोट वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या जंगल सफारीसह कोलकास येथील हत्ती सफारीला मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा प्रतिसाद मिळू लागला आहे. दरम्यान मेळघाटचा स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोलकास येथे व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने २० ऑक्टोबरपासून हत्ती सफारी सुरू झाली असून मोठ्या प्रमाणात पर्यटक मेळघाटकडे आकर्षिले जात आहेत.



हत्ती सफारी खास आकर्षण


बच्चेकंपनीसाठी पर्वणी असलेली हत्ती सफारी खास आकर्षण ठरले आहे. चिखलदरा पर्यटनासह सेमाडोह येथे जंगल सफारीसाठी जिप्सी असून, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना व गुगामल वन्यजीव विभागांतर्गत असलेल्या वैराट, सेमाडोह, कुवापाटी आदी जंगलात हीजंगल सफारी पर्यटकांना आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. विविध वन्यप्राणी, पशु-पक्षी यांचे खास आकर्षण असले तरी मोठ्या प्रमाणात आता पर्यटकांना या प्राण्यांचे दर्शन होऊ लागले आहे. घनदाट अरण्यात होणारी जंगल सफारी सुरू झाली. सफारीसाठी चार हत्ती तैनात आहेत.



मेळघाटच्या राजासह बिबटे, सांबराचे दर्शन


जंगल सफारीदरम्यान पर्यटकांना हमखास वाघ, बिबट, अस्वल, रानगवा, सांबर, हरिण, मोर तसेच विविध पक्षी-प्राण्यांचे दर्शन होत आहे. नरनाळा, शहानूर जंगल सफारी दरम्यान विविध प्राण्यांचे झालेले दर्शन पर्यटकांनी कथन केले. तसेच सेमाडोह जंगल सफारीतही विविध वन्य जिवांसह वाघाचे दर्शन पर्यटकांना होत असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी दिली.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये