राष्ट्रवादीचे नेते पंतप्रधान मोदी, अमित शहांच्या भेटीला

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. राज्यातील महायुतीच्या विजयानंतर या दोन्ही भेटी केवळ अभिनंदनासाठी होत्या, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.


संसद परिसरात झालेल्या या भेटींसदर्भात तटकरे म्हणाले की, राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढे मोठे यश एखाद्या युतीला मिळाले. तसेच आम्ही महायुतीचा भाग झाल्यापासून अमित शाह यांचे सातत्याने मार्गदर्शन, सहकार्य आहे. त्यामुळे आभार व्यक्त करण्यासाठी, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भेट झाली. अमित शाह हे भाजपचे नेते आहेतच मात्र महायुतीचेही नेते आहेत. योगायोगाने संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट झाली. त्यांचेही आभार व्यक्त केले आणि अभिनंदन केले. राज्यातील जनतेने जे यश आम्हाला दिले त्यात पंतप्रधान मोदींचा मोठा वाटा आहे, असेही तटकरे यांनी सांगितले.


मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना तटकरे म्हणाले की, कोणाचे नाव ठरले याबद्दल मला माहिती नाही. आमची भेट केवळ सदिच्छा भेट होती. आमच्या पक्षाने विधिमंडळ पक्षनेते म्हणून अजित पवारांची निवड केली आणि मंत्रिमंडळाबद्दल किंवा सरकारबद्दल निर्णय घेण्याचे सर्वाधिकार अजित पवारांना दिले. तसेच तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करत आहेत, त्यामुळे सरकार स्थापनेला थोडा वेळ लागत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे दीर्घकाळ राज्यात नेते आहेत. त्यांनी अडीच वर्षे सरकारचे नेतृत्व केले आहे. मात्र आकडे भाजपकडे आहेत ही वस्तुस्थिती आहे. ज्या पद्धतीने महायुतीने सरकार आजवर चालवले त्याच पद्धतीने पुन्हा पाच वर्षे सरकार चालेल, पुढच्या दोन दिवसात राज्य सरकारबद्दल निर्णय होईल, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.


ईव्हीएमवर बोलताना तटकरे म्हणाले की, ईव्हीएमविरुद्ध गळे काढणे म्हणजे विरोधकांचा रडीचा डाव आहे. जेव्हा लोकसभेत त्यांना चांगले यश मिळाले तेव्हा त्यांचे कर्तृत्व आणि आम्हाला यश मिळाले तर ईव्हीएमवर दोष द्यायचा हे विरोधकांचे दुटप्पी धोरण आहे. या निवडणुकीत मोठ्या अपेक्षा मविआला होत्या, त्या पूर्ण झाल्या नाही त्यामुळे त्यांचा भ्रमनिरास झाला त्यामुळे नैराश्यातून ते बोलत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

Comments
Add Comment

Indian Air Force AN-32 Plane Crashes : आसाममध्ये हवाई दलाच्या AN-३२ विमानाचा भीषण अपघात; पायलटसह ५ जवान शहीद, सहवैमानिक गंभीर जखमी

आसाम : आसाममधील जोरहाट येथील भारतीय हवाई दलाच्या एअरफोर्स स्टेशनवर शनिवारी सकाळी झालेल्या AN-३२ मालवाहू

Defence Minister Rajnath Singh : “पाकिस्तानला पाण्याचा एक थेंबही मिळणार नाही”; सिंधू जल करारावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा कडक इशारा

हैदराबाद : भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांनी सीमापार दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या

Indore Bus Accident : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना मोठा धक्का; भाचा प्रभात सिंह यांचा भीषण अपघातात मृत्यू

Indore Bus Accident : इंदौर : केंद्रीय संरक्षणमंत्री (Defence Minister) राजनाथ सिंह  (Rajnath Singh) यांचे भाचे प्रभात सिंह (Prabhat Singh) यांचा मध्य

ED Raid On TMC MLA Madan Mitra House : टीएमसी आमदार मदन मित्रांच्या अडचणी वाढल्या, ईडीची अनेक ठिकाणी छापेमारी

कोलकाता : पश्चिम बंगालमधील नगरपालिका भरतीतील कथित अनियमिततेच्या तपासासंदर्भात ईडीने एक मोठी शोधमोहीम सुरू

Indian Air Force AN-32 Plane Crashes : आसाममध्ये मोठी दुर्घटना! भारतीय वायुदलाचे AN-32 ट्रान्सपोर्ट विमान कोसळले, जोरहाट एअरबेसवर आग

आसाम : आसाममधील जोरहाट येथे शनिवारी सकाळी भारतीय वायुदलाच्या (IAF) AN-32 ट्रान्सपोर्ट विमानाचा भीषण अपघात (Indian Air Force AN-32 Plane

Crime News : MBBS प्रवेशाचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक; तेलंगणातील महाठगाला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे : एमबीबीएस प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत देशभरातील विद्यार्थ्यांची आणि पालकांची कोट्यवधी रुपयांची