Health: अति प्रमाणात बदाम खाणेही शरीरासाठी ठरू शकते हानिकारक

  60

मुंबई: बदाम आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर सुकामेवा आहे. आजही लोक चांगल्या आरोग्यासाठी काजू बदाम खाण्याचा सल्ला देतात. आधी काजू-बदाम खाणे लोकांना परवडत नव्हते. मात्र आता मध्यमवर्गातील लोकांमध्येही ड्रायफ्रुट्स खाण्याची चलती वाढली आहे. मात्र ड्रायफ्रुट्स हे मर्यादित प्रमाणात खावेत. यामुळे शरीरास नुकसानही होत नाहीत.


जर तुम्हाला कसली अॅलर्जी आहे तर कोणत्याही प्रकारचे नट्सचे सेवन सावधतेने केले पाहिजे. ज्या लोकांना अक्रोडची अॅलर्जी आहे त्यांनी बदामही खाऊ नये. जे लोक जास्त प्रमाणात बदाम खातात त्यांचे वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते.



बदामामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. मात्र अधिक बदाम खाल्ल्यास त्रास होऊ शकते. बदामाचे अधिक सेवन बद्धकोष्ठतेला कारणीभूत ठरू शकते.


जर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास आहे तर बदाम खाऊ नयेत. बदामामध्ये ऑक्सालेट मोठ्या प्रमाणात असते. यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो.


ज्या लोकांना अॅसिड रिफ्लक्सचा त्रास आहे त्यांनी बदामाचे सेवन कमी प्रमाणात केले पाहिजे. अधिक बदाम खाल्ल्याने छातीत जळजळ आणि गॅस तसेच अॅसिडिटीची समस्या होऊ शकते.


बदामामध्ये व्हिटामिन ई मोठ्या प्रमाणात असते. व्हिटामिन ई रक्त जमा होण्यापासून रोखतात. यामुळे रक्ताच्या गाठी होत नाहीत.



एका दिवसांत किती बदाम खाल्ले पाहिजे?


निरोगी राहण्यासाठी एका दिवसांत ५ ते ६ बदाम खाल्ले पाहिजेत. जे मोठ्या प्रमाणात वर्क आऊट करता ते ८ ते १० बदाम खाऊ शकतात. बदाम नेहमी पाण्यात भिजवून खाल्ले पाहिजेत. सकाळी रिकाम्या पोटी बदाम खाणे फायदेशीर असते.

Comments
Add Comment

पावसाळ्यातील रानभाज्यांचा खजिना; निसर्गाकडून मिळालेला एक आरोग्यदायी वरदान!

मांसाहार नाही, रानभाज्या खा; पावसात मिळते नैसर्गिक औषध आणि पोषण यांचा संगम! पावसाळा सुरू झाला की काहीजण जंगलात

शरीरात व्हिटॅमिन ई ची कमतरता का होते?

Vitamin E : व्हिटॅमिन ई हे एक आवश्यक पोषक तत्व आहे, जे केवळ आपल्या त्वचेच्या आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीच आवश्यक नाही,

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक