Health: अति प्रमाणात बदाम खाणेही शरीरासाठी ठरू शकते हानिकारक

मुंबई: बदाम आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर सुकामेवा आहे. आजही लोक चांगल्या आरोग्यासाठी काजू बदाम खाण्याचा सल्ला देतात. आधी काजू-बदाम खाणे लोकांना परवडत नव्हते. मात्र आता मध्यमवर्गातील लोकांमध्येही ड्रायफ्रुट्स खाण्याची चलती वाढली आहे. मात्र ड्रायफ्रुट्स हे मर्यादित प्रमाणात खावेत. यामुळे शरीरास नुकसानही होत नाहीत.


जर तुम्हाला कसली अॅलर्जी आहे तर कोणत्याही प्रकारचे नट्सचे सेवन सावधतेने केले पाहिजे. ज्या लोकांना अक्रोडची अॅलर्जी आहे त्यांनी बदामही खाऊ नये. जे लोक जास्त प्रमाणात बदाम खातात त्यांचे वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते.



बदामामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. मात्र अधिक बदाम खाल्ल्यास त्रास होऊ शकते. बदामाचे अधिक सेवन बद्धकोष्ठतेला कारणीभूत ठरू शकते.


जर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास आहे तर बदाम खाऊ नयेत. बदामामध्ये ऑक्सालेट मोठ्या प्रमाणात असते. यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो.


ज्या लोकांना अॅसिड रिफ्लक्सचा त्रास आहे त्यांनी बदामाचे सेवन कमी प्रमाणात केले पाहिजे. अधिक बदाम खाल्ल्याने छातीत जळजळ आणि गॅस तसेच अॅसिडिटीची समस्या होऊ शकते.


बदामामध्ये व्हिटामिन ई मोठ्या प्रमाणात असते. व्हिटामिन ई रक्त जमा होण्यापासून रोखतात. यामुळे रक्ताच्या गाठी होत नाहीत.



एका दिवसांत किती बदाम खाल्ले पाहिजे?


निरोगी राहण्यासाठी एका दिवसांत ५ ते ६ बदाम खाल्ले पाहिजेत. जे मोठ्या प्रमाणात वर्क आऊट करता ते ८ ते १० बदाम खाऊ शकतात. बदाम नेहमी पाण्यात भिजवून खाल्ले पाहिजेत. सकाळी रिकाम्या पोटी बदाम खाणे फायदेशीर असते.

Comments
Add Comment

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण