विधानसभा निकालानंतर महायुतीच्या विधान परिषदेतील ६ जागा रिक्त

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असून २३० जागांवर विजय मिळवला आहे. भाजपने १३२, शिवसेना (शिंदे गट) ने ५७, तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) ने ४१ जागा जिंकल्या. दुसरीकडे महाविकास आघाडीला फक्त ४६ जागा मिळाल्या असून काँग्रेसला १६, ठाकरे गटाला २० आणि शरद पवार गटाला १० जागांवर समाधान मानावे लागले.


या विजयामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणे निश्चित आहे. विधानसभेतील निकालानंतर विधान परिषदेतील ६ जागा रिक्त झाल्या आहेत. यामध्ये भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि प्रविण दटके तसेच शिवसेनेचे आमश्या पाडवी आणि राष्ट्रवादीचे राजेश विटेकर हे विधानसभेसाठी निवडून आले आहेत. त्यामुळे विधान परिषदेतील या जागांसाठी आता नव्या नेत्यांची निवड होणार आहे. महायुतीतील तीनही पक्ष या रिक्त जागांसाठी संभाव्य उमेदवार निश्चित करण्यासाठी लॉबिंग करत आहेत.


विशेषतः विधानसभेचे तिकीट न मिळालेल्या नाराज नेत्यांना शांत करण्यासाठी या जागांचा उपयोग होणार आहे. भाजपकडून अधिक वजनदार नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित गट) देखील नाराजांना खुश करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सध्या सर्वांचे लक्ष महायुतीच्या निर्णयाकडे लागले आहे. कोणते नेते या लॉटरीतून विधान परिषदेवर पोहोचतात, हे लवकरच स्पष्ट होईल.

Comments
Add Comment

कबुतरखान्याचा मुद्दा परत तापणार! जैन मुनींनी दिला उपोषणाचा इशारा, आम्ही गिरगावकर संघटनाही आक्रमक

मुंबई: दादर येथील कबुतरखान्याचा वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मागील अनेक दिवसांपासून दादर येथील कबुतरखाना

Exclusive News: मतदार यादीमुळे विरोधकांना कशा प्रकारे झाली मदत; भाजप करणार पर्दाफाश!

'दिल्ली अजून दूर, मी २०२९ पर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहणार' - देवेंद्र फडणवीस मुंबई: महाराष्ट्राचे

बाप रे ! 'लाडकी बहीण' योजनेचा १२,४३१ पुरुषांनीच घेतला गैरफायदा; सरकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश, कोट्यवधींची लूट!

मुंबई: महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे, त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारावे आणि कुटुंबातील त्यांचा निर्णय

दिवसा कडक ऊन, रात्री थंडी! ऑक्टोबर हिटमुळे आरोग्याची काळजी कशी घ्याल?

मुंबई: पावसाळ्यानंतर आता पुणेसह संपूर्ण महाराष्ट्रात 'ऑक्टोबर हिट'ने जोर धरला आहे. दिवसा कडक उन्हाळा आणि रात्री

एअर इंडियाचे अमेरिकेला निघालेले विमान टेक-ऑफनंतर मुंबईत परतले; तांत्रिक बिघाडाची सात दिवसांतील दुसरी घटना

मुंबई: एअर इंडियाच्या मुंबईहून अमेरिकेतील नेवार्क शहराकडे जाणाऱ्या विमानाला (फ्लाइट AI191) टेक-ऑफनंतर तांत्रिक

खासदार रवींद्र वायकर यांच्या इमारतीला आग; 'फायर सिस्टीम'मधील त्रुटींमुळे वायकर संतापले!

मुंबई: सध्या दिवाळीच्या धामधुमीत फटाक्यांमुळे होणाऱ्या दुर्घटनांची संख्या वाढताना दिसत आहे. अशातच एक मोठी आणि