मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असून २३० जागांवर विजय मिळवला आहे. भाजपने १३२, शिवसेना (शिंदे गट) ने ५७, तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) ने ४१ जागा जिंकल्या. दुसरीकडे महाविकास आघाडीला फक्त ४६ जागा मिळाल्या असून काँग्रेसला १६, ठाकरे गटाला २० आणि शरद पवार गटाला १० जागांवर समाधान मानावे लागले.
या विजयामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणे निश्चित आहे. विधानसभेतील निकालानंतर विधान परिषदेतील ६ जागा रिक्त झाल्या आहेत. यामध्ये भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि प्रविण दटके तसेच शिवसेनेचे आमश्या पाडवी आणि राष्ट्रवादीचे राजेश विटेकर हे विधानसभेसाठी निवडून आले आहेत. त्यामुळे विधान परिषदेतील या जागांसाठी आता नव्या नेत्यांची निवड होणार आहे. महायुतीतील तीनही पक्ष या रिक्त जागांसाठी संभाव्य उमेदवार निश्चित करण्यासाठी लॉबिंग करत आहेत.
विशेषतः विधानसभेचे तिकीट न मिळालेल्या नाराज नेत्यांना शांत करण्यासाठी या जागांचा उपयोग होणार आहे. भाजपकडून अधिक वजनदार नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित गट) देखील नाराजांना खुश करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सध्या सर्वांचे लक्ष महायुतीच्या निर्णयाकडे लागले आहे. कोणते नेते या लॉटरीतून विधान परिषदेवर पोहोचतात, हे लवकरच स्पष्ट होईल.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…