Health: डाएटमध्ये सामील करा या गोष्टी, कमी होईल कॅन्सरचा धोका

मुंबई: कॅन्सरसारख्या घातक आजारांचे नाव ऐकताच मृत्यू दिसू लागतो. मात्र तज्ञांच्या मते जर आपण आपले डाएट व्यवस्थित ठवले तर कॅन्सरचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी करू शकतो. आज आम्ही तुम्हाला त्या सुपरफूडबद्दल सांगणार आहोत ज्याचे सेवन करून तुम्ही कॅन्सरचा धोका टाळू शकतो.



ही फळे कॅन्सर रोखण्यास मदत करतात


ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, रासबेरी, ब्लॅकबेरी या फळांमध्ये एंथोसायसिन आणि एलेजिक अॅसिडसारखी अँटीऑक्सिडंट असतात. यामुळे कॅन्सरपासून बचाव होण्यास मदत होते.



आंबट फळे - संत्रे, लिंबू, द्राक्षे


यात व्हिटामिन सी, फ्लॅवेनॉईड्स आणि लिमोनोईड्स. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते.



डाळिंब


यात कॅन्सरविरोधी गुण असलेले एलेजिक अॅसिड आणि पॉलिफेनॉल्स असतात यामुळे प्रोस्टेट आणि ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते.



पपई


बीटा कॅरोटिन, लायकोपिन आणि व्हिटामिन सी असलेले पपई टिश्यूंना रिपेअर करण्यास मदत करतात.



ब्रोकोली


यात सल्फोराफेन आणि इंडोल-३ कार्बिनोल असते ज्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.


हिरव्या भाज्यांमध्ये कॅरोटिनॉईड, फायबर आणि फोलेट भरपूर प्रमाणात असते. यामुळे त्वचा, फुफ्फुसे आणि पोटाचा कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो.



टोमॅ


टोमॅटोमध्ये लायकोपीन भरपूर प्रमाणात असते. हा कॅन्सरला रोखणारा घटक आहे. यामुळे प्रोस्टेट आणि फुफ्फुसांच्या कॅन्सरमध्ये फायदा होतो.

Comments
Add Comment

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण