Assembly election result: निवडणुकीच्या जल्लोषादरम्यान लागली आग, नवनिर्वाचित आमदारांसह अनेक महिला जखमी

मुंबई: राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी जाहीर करण्यात आले. निकाल घोषित केल्यानंतर राज्यातील चांदगड विधानसभा मतदार संघातून हैराणजनक बातमी समोर आली आहे. येथे अपक्ष उमेदवार म्हणून शिवाजी पाटील यांनी विजय मिळवला. रात्री शिवाजी पाटील यांच्या विजयाच्या जल्लोषादरम्यान अचानक मोठी आग लागली. यात पाटीलही जखमी झाले आहेत.


प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या जल्लोषाच्या वेळेस काही महिलाही जखमी झाल्या आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवाजी पाटील यांच्या विजयानंतर काही महिला महंगावमध्ये त्यांना ओवाळत होत्या. यावेळेस क्रेनमधून मोठ्या प्रमाणात गुलाल आरतीच्या थाळीवर पडला. यामुळे आग लागली.



अचानक लागलेल्या आगीने महिलाही जखमी


यानंतर आग अचानक पसरली. यात शिवाजी पाटील यांच्यासह काही महिलाही जखम झाल्या. चांदगड विधानसभा मतदार संघातून शिवाजी पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि एनसीपी शरद पवार गटातील उमेदवार होते. मात्र दोन्ही पक्षांच्या उमेदवाराला मात देत त्यांनी २१ हजार १३४ मतांनी निवडणूक जिंकली. दुसऱ्या स्थानावर अजित पवार यांच्या एनसीपी पक्षाचे राजेश पाटील होते.


?feature=share
Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा