Onion Price: कांद्याचे भाव स्थिर करण्याकरिता केंद्र सरकारने घेतला हा निर्णय

लासलगाव : किरकोळ बाजारात सध्या कांद्याचे दर स्थिर करण्याकरिता बफरस्टॉक मधील अधिक कांदा बाजारात आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.यासाठी किरकोळ बाजारामध्ये दर स्थिर ठेवण्याकरिता तात्पुरता पुरवठा केला जाणार आहे.यामुळे कांद्याच्या दरावर केंद्र लक्ष ठेवून आहे.


केंद्राच्या प्राप्त माहितीनुसार, दिल्लीतील कांद्याचे किरकोळ विक्री दर ६५ रुपये प्रतिकिलो इतके असून देशभरात सरासरी ५८ रुपये इतका दर आहे.यामुळे सरकारने बफर स्टॉकमधील कांद्याचा पुरवठा वाढवण्याचा निर्णय घेतला असून सणासुदीचा हंगाम व बाजार बंदी झाल्यामुळे काही बाजारांमधील कांद्याच्या पुरवठ्यात अडथळे येत होते. या पुरवठ्यामुळे ते अडथळे दूर होणार आहेत.


नाफेडच्या माध्यमातून खरेदी केलेला कांदा दर स्थिर करण्यासाठी दिल्लीत दोन व गुवाहाटीत एक रेक पाठविण्याचे नियोजन करण्यात आले असून त्याप्रमाणे,बाजारात कांद्याची उपलब्धता होण्याकरिता रस्ते वाहतुकीद्वारे सुद्धा पुरवठा वाढण्याचे सरकारचे नियोजन आहे. त्याचबरोबर ‘एनसीसीएफ’च्या माध्यमातून रस्ते व रेल्वे वाहतुकीद्वारे कांद्याचा पुरवठा केल्यामुळे उपलब्धतेत वाढ होईल असे म्हटले आहे. शिवाय सरकारने चंदीगढ़, पंजाब, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, दिल्लीसारख्या शहरांच्या गरजा पूर्ण करण्याकरिता सोनीपत येथे शीतगृहात ठेवलेला कांदा बाजारात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


सरकारने यंदा ४.७ लाख टन रब्बी कांदा खरेदी करून तो बफर स्टॉप केला आहे. ५ सप्टेंबर रोजी किरकोळ विक्रीद्वारे ३५ रुपये प्रतिकिलो दराने व देशभरातील प्रमुख मंडळींमध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीद्वारे सुरुवात झाली होती. बफर स्टॉकमधील खरेदी केलेला दीड लाख टन अधिक कांदा नाशिक व इतर ठिकाणा वरून ट्रकद्वारे ग्राहक केंद्रांवर पाठवण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Monsoon Update : आनंदाची बातमी, अंदमानात 'मान्सून'साठी पोषक वातावरण; कोकणात ६ जूनला आगमनाचा अंदाज

नवी दिल्ली : राज्यात एकीकडे कडाक्याचे ऊन आणि उष्णतेची लाट असतानाच, दुसरीकडे मान्सूनच्या आगमनाबाबत दिलासादायक

BRICS : दिल्लीत १४ आणि १५ मे रोजी ब्रिक्स शिखर परिषद

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील युद्ध, युक्रेन संघर्ष आणि ढासळत्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर,

Sanjay Kapoor Property Dispute : 'कपूर संपत्ती प्रकरण महाभारतालाही फिके पाडेल'

नवी दिल्ली : दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या तब्बल ३० हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेवरून सुरू असलेला कौटुंबिक

NEET-UG 2026 : पेपरफुटीमुळे NEET परीक्षा रद्द झाली, आता पुढे काय होणार ?

नवी दिल्ली : पेपरफुटी झाल्याचे उघड झाल्यानंतर वैद्यकीय प्रवेशासाठी रविवार ३ मे २०२६ रोजी घेण्यात आलेली 'नीट' (NEET-UG

NEET UG 2026 : 'नीट' पेपर फुटीचं केरळ कनेक्शन! ४२ तास आधीच फुटला होता पेपर; परीक्षा अखेर रद्द; सीबीआय करणार चौकशी

२२ लाख विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक

Assam Himanta Biswa Sarma Oath : आसाममध्ये पुन्हा 'बिस्वा'राज! हिमंत बिस्वा सलग दुसऱ्यांदा आसामच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान

गुवाहाटी : आसामच्या राजकीय इतिहासात मंगळवारी (१२ मे) एका नव्या पर्वाची नोंद झाली. विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता