Onion Price: कांद्याचे भाव स्थिर करण्याकरिता केंद्र सरकारने घेतला हा निर्णय

लासलगाव : किरकोळ बाजारात सध्या कांद्याचे दर स्थिर करण्याकरिता बफरस्टॉक मधील अधिक कांदा बाजारात आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.यासाठी किरकोळ बाजारामध्ये दर स्थिर ठेवण्याकरिता तात्पुरता पुरवठा केला जाणार आहे.यामुळे कांद्याच्या दरावर केंद्र लक्ष ठेवून आहे.


केंद्राच्या प्राप्त माहितीनुसार, दिल्लीतील कांद्याचे किरकोळ विक्री दर ६५ रुपये प्रतिकिलो इतके असून देशभरात सरासरी ५८ रुपये इतका दर आहे.यामुळे सरकारने बफर स्टॉकमधील कांद्याचा पुरवठा वाढवण्याचा निर्णय घेतला असून सणासुदीचा हंगाम व बाजार बंदी झाल्यामुळे काही बाजारांमधील कांद्याच्या पुरवठ्यात अडथळे येत होते. या पुरवठ्यामुळे ते अडथळे दूर होणार आहेत.


नाफेडच्या माध्यमातून खरेदी केलेला कांदा दर स्थिर करण्यासाठी दिल्लीत दोन व गुवाहाटीत एक रेक पाठविण्याचे नियोजन करण्यात आले असून त्याप्रमाणे,बाजारात कांद्याची उपलब्धता होण्याकरिता रस्ते वाहतुकीद्वारे सुद्धा पुरवठा वाढण्याचे सरकारचे नियोजन आहे. त्याचबरोबर ‘एनसीसीएफ’च्या माध्यमातून रस्ते व रेल्वे वाहतुकीद्वारे कांद्याचा पुरवठा केल्यामुळे उपलब्धतेत वाढ होईल असे म्हटले आहे. शिवाय सरकारने चंदीगढ़, पंजाब, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, दिल्लीसारख्या शहरांच्या गरजा पूर्ण करण्याकरिता सोनीपत येथे शीतगृहात ठेवलेला कांदा बाजारात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


सरकारने यंदा ४.७ लाख टन रब्बी कांदा खरेदी करून तो बफर स्टॉप केला आहे. ५ सप्टेंबर रोजी किरकोळ विक्रीद्वारे ३५ रुपये प्रतिकिलो दराने व देशभरातील प्रमुख मंडळींमध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीद्वारे सुरुवात झाली होती. बफर स्टॉकमधील खरेदी केलेला दीड लाख टन अधिक कांदा नाशिक व इतर ठिकाणा वरून ट्रकद्वारे ग्राहक केंद्रांवर पाठवण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Surat Bus Accident : सुरतमध्ये महाराष्ट्राच्या दोन 'एसटी' बसचा अपघात

सुरत : गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील बारडोली जवळून जाणाऱ्या धुळे हायवेवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या

Bomb Threat : अहमदाबादमध्ये खळबळ! स्पोर्ट्स क्लब उडवण्याची धमकी; पत्रात दाऊद आणि लष्कर-ए-तोयबाचा उल्लेख

अहमदाबाद: गुजरातची राजधानी अहमदाबादमधून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. अहमदाबादच्या प्रसिद्ध स्पोर्टस क्लबला

EPFO : युपीआयद्वारे पीएफ धारकांचे पैसे काही सेकंदांत खात्यात मिळणार

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या ८ कोटींहून अधिक सदस्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा

परदेशी नागरिकांसाठी व्हिसा नियमात बदल

केंद्र सरकारकडून नोंदणी प्रक्रिया अधिक कडक; लहान मुलांना दिलासा नवी दिल्ली : भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांचे

'Rudram-2' : 'रुद्रम-२' क्षेपणास्त्राची सुखोईवरून यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण सज्जतेत आज आणखी एक मोठी भर पडली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि भारतीय

Monsoon 2026 : दिलासादायक! येत्या ४८ तासांत केरळमध्ये पाऊस बरसणार; महाराष्ट्रासह 'या' राज्यांना पाऊस झोडपणार! IMD चा अंदाज काय ?

मुंबई : उन्हाच्या तीव्र झळा आणि असह्य उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी अखेर एक दिलासादायक बातमी समोर आली