Adani Group : अदानींमुळे LIC ला १२,००० कोटींचा फटका!

मुंबई : अमेरिकन न्यायालयाने गौतम अदानीसह (Gautam Adani) सह जणांवर लाच दिल्याचा आरोपाखाली दोषी ठरवल्यामुळे अदानी समुह गोत्यात अडकला आहे. फसवणूकीच्या (Bribery Case) आरोपामुळे काल अदानी समुहाचे सर्व शेअर २० टक्क्यांपर्यंत खाली कोसळल्यामुळे (Shares Fall) अदानी समुहासह गुंतवणूकदारांना झटका बसला. त्यानंतर आता अदानींमुळे एलआयसी'ला (LIC) देखील मोठा फटका बसला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अदानी समूहाच्या शेअर्स (Adani Group Stock) गुंतवणूकदारांमध्ये एलआयसीचा देखील समावेश आहे. एलआयसीने अदानींच्या सात कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती. मात्र काल शेअर्समध्ये मोठी पडझड झाल्यामुळे एलआयसीला १२,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले.


अदानी ग्रुप कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाल्यानंतर एलआयसीला सुमारे ५ हजार कोटी रुपयांचा तोटा झाला. तसेच, एलआयसी अदानी एंटरप्रायझेसमध्येही अंदाजे ३ हजार कोटी रुपयांचा फटका बसला. याशिवाय, अंबुजा सिमेंटच्या शेअर्समुळे एलआयसीला १२०० कोटी रुपयांचे नुकसान झाले. या तीन मोठ्या नुकसानीसोबतच, अदानी टोटल गॅसमध्ये ८०७ कोटी रुपये, अदानी एनर्जी सोल्युशन्समध्ये ७१६.४५ कोटी रुपये, अदानी ग्रीन एनर्जीमध्ये ५९२ कोटी रुपये आणि एसीसीमध्ये ३८१ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.



अदानींविरुद्ध अटक वॉरंट जारी


दरम्यान, आता अदानी यांच्यावर आरोप न्याय विभागाच्या अंतर्गत गुन्हेगारी विभागाच्या उप सहायक अटॉर्नी जनरल लिसा एच मिलर यांनी केला असून याप्रकरणी रीतसर लेखी तक्रार पत्र देण्यात आले आहे. तसेच गौतम अदानी आणि सागर अदानी यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. (Adani Group)

Comments
Add Comment

Assam Emergency Landing Highway: पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील पहिल्या विशेष 'इमर्जन्शी लँडिंग' सुविधेची सुरुवात

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

Startup India FoF 2.0 : मोदी सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'! स्टार्टअप्ससाठी १०,००० कोटींचा 'फंड ऑफ फंड्स २.०' मंजूर; टर्नओव्हरची मर्यादाही वाढवली

नवी दिल्ली : भारतीय स्टार्टअप्सना जागतिक स्तरावर नेण्यासाठी आणि स्वदेशी गुंतवणुकीला बळ देण्यासाठी केंद्र

Kumar Bhaskar Verma Bridge: आसाममधील ब्रह्मपुत्रेवरील ६ पदरी पुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

Narendra Modi: पुलवामा हल्ल्याला ६ वर्षे पूर्ण; मोदींनी वाहिली शहीद जवानांना श्रद्धांजली

मुंबई: पुलवामा हल्ल्याला आज सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी x वर एक भावूक

Indian Passport : भारतीय पासपोर्टचे जागतिक महत्त्व वाढले, रँकिंग सुधारले

Henley Passport Index 2026 । नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट अर्थात भारतीय पारपत्राच्या जागतिक रँकिंगमध्ये (क्रमवारी) सुधारणा झाली

‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली : ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात