Jio पेक्षा BSNL वरचढ, तीन महिन्यांपासून खाजगी कंपन्यांना देतेय मात

मुंबई: अनेक वर्षे भारतीय टेलिकॉम इंडस्ट्रीवर राज्य केल्यानंतर बीएसएनएल(BSNL) गेल्या एका दशकापासून खूप मागे पडले होते. त्यांचे सबस्क्रायबर्सही घटले होते. मात्र आता चित्र काही वेगळेच दिसत आहे. खासकरून प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किंमतीत वाढ केल्यानंतर या चित्रामध्ये फरक दिसत आहे.


या वर्षी जुलैमध्ये जिओ, एअरटेल आणि वोडाफोन या कंपन्यांनी आपले रिचार्ज प्लान्स महाग केले. तर जिओला सलग तिसऱ्या महिन्यात सबस्क्रायबर्सचे नुकसान उचलावे लागले. सप्टेंबर महिन्यात जिओच्या वायरलेस युजर्सची संख्या कमी झाली. तर एअरटेल आणि वोडाफोन आयडियाचेही नुकसान झाले.


या दरम्यान म्हणजेच सप्टेंबर २०२४मध्ये बीएसएनएलने नवे सबस्क्रायबर्स जोडले आहेत. ट्रायच्या रिपोर्टनुसार बीएसएनएल सबस्क्रायबर्सची संख्या जुलै महिन्यापासून सातत्याने वाढत आहे. जुलै महिन्यात कंपनीने २९.२ लाख, ऑगस्ट २५.३ लाख आणि सप्टेंबर महिन्यात ८.४ लाख नवे सबस्क्रायबर्स जोडले आहेत.


जिओचे सबस्क्रायबर्स आताही अधिक आहेत. कंपनीच्या एकूण सबस्क्रायबर्सची संख्या ४६.३७८ कोटी आहेत. एअरटेलजवळ ३८.३४८ कोटी आणि व्हीआयकडे २१.२४५ कोटी सबस्क्रायबर्स आहेत. तर बीएसएनएलच्या युजर्सची संख्या ९.३८ कोटी आहे.

Comments
Add Comment

मुंबईतील प्रतिजेजुरी पाहिलीत का? मुंबईतही आहे खंडोबाचे पवित्र देवस्थान

मुंबई : चंपाषष्ठीचा शिवशंकराच्या अवतार मानल्या जाणाऱ्या श्री खंडोबा देवाचा उत्सव राज्यभर मोठ्या भक्तिभावात

शतकातील सर्वात मोठं सूर्यग्रहण; २०२७ मध्ये होणार ६ मिनिटांचा अंधार

मुंबई : येणाऱ्या वर्षात म्हणेजच २ ऑगस्ट २०२७ रोजी शतकातील सर्वात मोठं आणि दुर्मिळ खग्रास सूर्यग्रहण पाहायला

मालाड आणि गोरेगावमधील दोन मनोरंजन मैदानांचा होणार विकास

गोरेगाव पहाडीतील मोकळ्या जागेवर उभारले जाणार मनोरंजन मैदान सरदार वल्लभभाई मनोरंजन मैदानाचे होणार

प्रारुप मतदार यादीवर हरकती, सूचना नोंदवण्यास मुदतवाढ

हरकती आता ३ डिसेंबर २०२५ पर्यंत नोंदवता येणार मागील सात दिवसांत २१६७ हरकती, सूचना नोंदवल्या मुंबई (विशेष

शक्ती वाघाचा मृत्यू न्युमोनियामुळे, शव विच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून माहिती समोर

आता राणीबागेत जय आणि करिष्मा वाघाला पाहता येणार मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा (पूर्व)

अतिवृष्टीचे संकट, पण सरकारचा आधार; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला एक वर्षाची स्थगिती

मुंबई : राज्यात जून ते सप्टेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली