Jio पेक्षा BSNL वरचढ, तीन महिन्यांपासून खाजगी कंपन्यांना देतेय मात

  102

मुंबई: अनेक वर्षे भारतीय टेलिकॉम इंडस्ट्रीवर राज्य केल्यानंतर बीएसएनएल(BSNL) गेल्या एका दशकापासून खूप मागे पडले होते. त्यांचे सबस्क्रायबर्सही घटले होते. मात्र आता चित्र काही वेगळेच दिसत आहे. खासकरून प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किंमतीत वाढ केल्यानंतर या चित्रामध्ये फरक दिसत आहे.


या वर्षी जुलैमध्ये जिओ, एअरटेल आणि वोडाफोन या कंपन्यांनी आपले रिचार्ज प्लान्स महाग केले. तर जिओला सलग तिसऱ्या महिन्यात सबस्क्रायबर्सचे नुकसान उचलावे लागले. सप्टेंबर महिन्यात जिओच्या वायरलेस युजर्सची संख्या कमी झाली. तर एअरटेल आणि वोडाफोन आयडियाचेही नुकसान झाले.


या दरम्यान म्हणजेच सप्टेंबर २०२४मध्ये बीएसएनएलने नवे सबस्क्रायबर्स जोडले आहेत. ट्रायच्या रिपोर्टनुसार बीएसएनएल सबस्क्रायबर्सची संख्या जुलै महिन्यापासून सातत्याने वाढत आहे. जुलै महिन्यात कंपनीने २९.२ लाख, ऑगस्ट २५.३ लाख आणि सप्टेंबर महिन्यात ८.४ लाख नवे सबस्क्रायबर्स जोडले आहेत.


जिओचे सबस्क्रायबर्स आताही अधिक आहेत. कंपनीच्या एकूण सबस्क्रायबर्सची संख्या ४६.३७८ कोटी आहेत. एअरटेलजवळ ३८.३४८ कोटी आणि व्हीआयकडे २१.२४५ कोटी सबस्क्रायबर्स आहेत. तर बीएसएनएलच्या युजर्सची संख्या ९.३८ कोटी आहे.

Comments
Add Comment

मीरा भाईंदर पोलिस आयुक्तांची तडकाफडकी बदली, मोर्चा प्रकरण भोवलं

मिरा भाईंदर: मिरा भाईंदरमध्ये काल (८ जुलै) संपन्न झालेला  मराठी भाषिक मोर्चा होऊ न देण्यासाठी पोलिसांनी सर्वात

Ashish Shelar : शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेत पारदर्शकता आणू : मंत्री आशिष शेलार

मुंबई : शासकीय कर्मचाऱ्यांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या वैद्यकीय प्रतिपुर्ती योजनेची प्रक्रिया आँनलाईन व

Dada Bhuse : खोट्या माहितीच्या आधारे ‘अल्पसंख्यांक’ दर्जा मिळवणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई होणार : शिक्षणमंत्री दादाजी भुसे

मुंबई : राज्यातील काही शाळांनी शासकीय लाभ आणि विशेष सवलती मिळवण्यासाठी खोटी माहिती सादर करून ‘अल्पसंख्यांक’

Devendra Fadanvis : पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात; SDRF आणि NDRF यंत्रणा सज्ज – मुख्यमंत्री

नागरिकांनी सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन मुंबई : मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पूर्व विदर्भात

Devendra Fadnavis On Sanjay Gaikwad : आमदार गायकवाड बनियान-टॉवेलवर येतो अन् कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याची धुलाई; देवेंद्र फडणवीस म्हणाले, कारवाई...

मुंबई : नेहमीच चर्चेत असणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांची अक्षरशः गुंडासारखी वर्तवणूक आमदार

'जेएनपीटी आणि वाढवन बंदर प्राधिकरणांसाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता' – मंत्री नितेश राणे

* परदेशी पतसंस्था १२० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार * बंदरे आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण