Jio पेक्षा BSNL वरचढ, तीन महिन्यांपासून खाजगी कंपन्यांना देतेय मात

मुंबई: अनेक वर्षे भारतीय टेलिकॉम इंडस्ट्रीवर राज्य केल्यानंतर बीएसएनएल(BSNL) गेल्या एका दशकापासून खूप मागे पडले होते. त्यांचे सबस्क्रायबर्सही घटले होते. मात्र आता चित्र काही वेगळेच दिसत आहे. खासकरून प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किंमतीत वाढ केल्यानंतर या चित्रामध्ये फरक दिसत आहे.


या वर्षी जुलैमध्ये जिओ, एअरटेल आणि वोडाफोन या कंपन्यांनी आपले रिचार्ज प्लान्स महाग केले. तर जिओला सलग तिसऱ्या महिन्यात सबस्क्रायबर्सचे नुकसान उचलावे लागले. सप्टेंबर महिन्यात जिओच्या वायरलेस युजर्सची संख्या कमी झाली. तर एअरटेल आणि वोडाफोन आयडियाचेही नुकसान झाले.


या दरम्यान म्हणजेच सप्टेंबर २०२४मध्ये बीएसएनएलने नवे सबस्क्रायबर्स जोडले आहेत. ट्रायच्या रिपोर्टनुसार बीएसएनएल सबस्क्रायबर्सची संख्या जुलै महिन्यापासून सातत्याने वाढत आहे. जुलै महिन्यात कंपनीने २९.२ लाख, ऑगस्ट २५.३ लाख आणि सप्टेंबर महिन्यात ८.४ लाख नवे सबस्क्रायबर्स जोडले आहेत.


जिओचे सबस्क्रायबर्स आताही अधिक आहेत. कंपनीच्या एकूण सबस्क्रायबर्सची संख्या ४६.३७८ कोटी आहेत. एअरटेलजवळ ३८.३४८ कोटी आणि व्हीआयकडे २१.२४५ कोटी सबस्क्रायबर्स आहेत. तर बीएसएनएलच्या युजर्सची संख्या ९.३८ कोटी आहे.

Comments
Add Comment

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक

एआय तंत्रज्ञानाने रोखणार वाघ-बिबट्यांचे हल्ले; प्रवीण दरेकरांच्या सूचनेवर सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्रप्रकल्पात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) सहाय्याने राबवण्यात आलेला

महाराष्ट्रात मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर होणार कारवाई - शिक्षण मंत्री दादाजी भुसे

सर्व माध्यमे, सर्व भाषिक आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी बंधनकारक मुंबई : "महाराष्ट्रातील सर्व

बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचे उपकेंद्र कोकणात करा; आमदार प्रवीण दरेकरांची सरकारकडे मागणी

मुंबई : हिंगोली येथील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राच्या धर्तीवर कोकणातही या केंद्राचे उपकेंद्र स्थापन