Plan B : बंडखोर, अपक्षांवर भाजपाची नजर; 'प्लान बी'साठी फडणवीसांचे ६ शिलेदार सक्रिय

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी (दि. २३ नोव्हेंबर) जाहीर होईल. गेल्या पाच वर्षांत राज्यात घडलेल्या अभूतपूर्व घडामोडी पाहता यंदा मतदारराजा कोणाला कौल देणार याबद्दल उत्सुकता आहे. निकालाला अवघे काही तास राहिलेले आहेत. बहुतांश एक्झिट पोल्सनी राज्यात महायुतीचेच सरकार कायम राहील, असा कौल दिला आहे. पण तरीही महायुती बहुमतापासून दूर राहिल्यास भाजपाने 'प्लान बी' (Plan B) रेडी केला आहे. अपक्ष आणि बंडखोरांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी भाजपाच्या राज्य नेतृत्त्वाने सहा नेत्यांवर दिली आहे. विशेष म्हणजे यातल्या निम्म्या नेत्यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.


महायुती आणि महाविकास आघाडीत तीन प्रमुख पक्ष असल्याने यंदा इच्छुकांचा आकडा मोठा होता. त्यामुळे अनेक ठिकाणी बंडखोरी झाली. काही ठिकाणी बंडखोरांमुळे अधिकृत उमेदवार पराभूत होण्याची शक्यता आहेत. काही बंडखोर तगडे असल्याने विशिष्टपूर्ण परिस्थितीत त्यांच्या विजयाची शक्यता वाढलेली आहे. अशा बंडखोरांवर आणि विजयाची शक्यता अधिक असलेल्या अपक्षांसाठी भाजपाने मोठी फिल्डींग लावली आहे.



सरकार स्थापनेसाठी फडणवीसांची जोरदार फिल्डींग


विजयाची शक्यता अधिक असलेल्या अपक्ष आणि बंडखोरांशी संपर्क ठेवण्याची जबाबदारी भाजपाच्या नेत्यांवर आहे. मंत्री रविंद्र चव्हाण, विधान परिषदेतील गटनेते प्रविण दरेकर, आमदार संजय कुटे, नितेश राणे, निरंजन डावखरे, मोहित कंबोज यांना अपक्ष, बंडखोरांवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. हे सगळेच नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी फडणवीस जोरदार फिल्डींग लावताना दिसत आहेत.


बंडखोर, अपक्षांवर करडी नजर ठेवण्यासाठी निवडण्यात आलेल्या सहा नेत्यांपैकी तिघांनी अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदेंच्या बंडात महत्त्वाची भूमिका बजावली होती. विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर शिंदेंसह अनेक आमदार सूरतच्या दिशेनं रवाना झाले. ते सूरतमध्ये असताना आमदार संजय कुटे, रविंद्र चव्हाण, मोहित कंबोज यांनी त्यांची भेट घेत यशस्वी बोलणी केली होती. आता याच नेत्यांकडे भाजपाने पुन्हा एकदा सत्तेसाठी जुळवाजुळव करण्याची जबाबदारी दिली आहे.

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य