६४९९ रूपयांत लाँच झाला शानदार फोन, 5000mAh बॅटरी

मुंबई: चीनची स्मार्टफोन कंपनी टेक्नोने भारतात नवा बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. याची किंमत खूप कमी आहे. या फोनमध्ये युजर्सला मोठी बॅटरी दमदार प्रोसेसर, शानदार कॅमेरा सेटअप आणि मोठी स्क्रीनही मिळणार आहे. तसेच या सर्व गोष्टींसाठी युजरला केवळ ६ हजार रूपये खर्च करावे लागतील.



डिस्प्ले आणि ऑडिओ फीचर्स


Tecno Pop 9 स्मार्टफोन अँड्रॉईड १४ ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. यात मीडियाटेक हेलिओ जी५० प्रोसेसर आहे. हा फोन ३ जीबी रॅम, व्हर्च्युअल रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेजसह येतो.


Tecno Pop 9मध्ये ६.६७ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 90Hzचा रिफ्रेश रेट आहे. हा डिस्प्ले खूप स्मूथ आहे. खासकरून गेमिंग आणि व्हिडिओ स्ट्रीमिंगदरम्यान. यात डीटीएस सराऊंड साऊंडचा सपोर्टही आहे. यात ऑडिओ क्वालिटीही खूप चांगली असते.


या फोनमध्ये 5000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की ही बॅटरी फुल्ल चार्ज झाल्यानंतर १०० तासांपर्यंत म्युझिक प्लेबॅक टाईम देऊ शकते. कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल सिम स्लॉट, वायफाय, जीपीएस, ब्लूटूथ, ऑडिओ जॅक आणि यूएसबी टाईप सी पोर्ट आहे.


Tecno Pop 9 केवळ ३ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजसह येतो. याची किंमत कंपनीने ६४९९ रूपये ठेवली आहे. या स्मार्टफोनची विक्री अॅमेझॉन इंडियावर २६ नोव्हेंबरपासून सुरू होईल. हा फोन तीन रंगात उपलब्ध आहे. Glittery White, Lime Green आणि Startrail Black मध्ये तुम्ही खरेदी करू शकता.

Comments
Add Comment

Anant Ambani : हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात

Mumbai News : मुंबईत पाण्याचा निचरा करण्यासाठी ५४७ पंपांची आणि फिरते डीवॉटरिंग पंप असणाऱ्या १० वाहनांची व्यवस्था

मुंबईत यंदा पाणी साचण्याची फक्त ८० ठिकाणे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची

BMC News : 'मध्य वैतरणा प्रकल्प राबवताना तुमचे पर्यावरण प्रेम कुठे होते?'

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने गारगाई पाणी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी स्थायी समिती व महापालिका

single-window clearance : लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा

मुंबई : राज्यातील लाईव्ह मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाईव्ह

Godavari to Narmada : असा होणार गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा समारोप समारंभ

मुंबई : जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या

Seeds Act : राज्याचा स्वतंत्र बियाणे कायदा करणार

मुंबई : शेतकऱ्यांना स्वतःचे बियाणे साठवणे, वापरणे, देवाणघेवाण करणे आणि (ब्रँडेड नाव न वापरता) विक्री करण्यास