Kudal : कुडाळ मतदारसंघाचा निकाल दुपारी १२ पर्यंत होणार स्पष्ट

मतमोजणीसाठी १४ टेबल आणि २० फेऱ्या


पक्ष कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी जागा निश्चित


सिंधुदुर्ग : कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाची (Kudal-Malvan Assembly Constituency) मतमोजणी शनिवार दिनांक २३ नोव्हेंबर रोजी कुडाळ तहसील कार्यालय येथे होणार आहे. सकाळी आठ वाजता ही मतमोजणी सुरू होणार आहे. त्यासाठी १४ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे.


१४ टेबलवर ही मतमोजणी होणार असून एकूण २० फेऱ्या होणार आहेत. त्यासाठी २५८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. २३ रोजी सकाळी आठ पासून मतमोजणी सुरू होऊन दुपारी १२ पर्यंत कुडाळ-मालवण मतदारसंघाचा निकाल स्पष्ट होणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने तीन टप्प्यांमध्ये सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती कुडाळ निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी दिली.


प्रशासन स्तरावर नियोजन करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया झाली. त्यानंतर आता सर्वांनाच निवडणुकीच्या निकालाचे वेध लागले आहेत. राजकीय स्तरावर विविध लोकप्रतिनिधी मतांची आकडेवारी करण्यात व्यस्त आहेत तर प्रशासन मात्र निवडणुकीची मतमोजणी आणि निकालाची जय्यत तयारी करण्यात व्यस्त आहे. या अनुषंगाने कुडाळ तहसील कार्यालय येथे मतमोजणीची जय्यत तयारी सुरू आहे.


कुडाळ - मालवण विधानसभा मतदारसंघात एकूण २७९ मतदान केंद्रे असून त्यासाठी एकूण १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. एका फेरीत १४ केंद्राची मतमोजणी होणार आहे. एकूण २० फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण करण्यात येणार आहे.


निवडणूक मतमोजणी कालावधीत सुरक्षा यंत्रणा कडेकोट ठेवण्यात येणार आहे. या मतमोजणी दरम्यान दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी हॉटेल अभिमन्यू जवळचा परिसर व एस. एन. देसाई चौक या ठिकाणचा परिसर अशा दोन ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. जागा लवकरच त्या त्या पक्षाच्या नेत्यांना सांगण्यात येतील, अशी माहिती कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.

Comments
Add Comment

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ

आधी रेकी, मग बुरखा घालून दरोडा; उच्चभ्रू परिसरात भरदिवसा चोरी

नवी मुंबई : नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

चहा बनवण्याची योग्य पद्धत,पित्त व ॲसिडिटीच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका

मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवाट होतो ती म्हणजे चहाने ... भारतातच नाही तर संपूर्ण जगात असंख्य असे चहा प्रेमी आहेत .

श्रीराम लाईफ इन्शुरन्समधून पिरामल फायनान्स बाहेर पडणार 'या' कारणामुळे,६०० कोटीचा एकूण सौदा जाहीर

मुंबई: पिरामल फायनान्स लिमिटेड (Piramal Finance Limited) कंपनीने श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनीतील आपला संपूर्ण १४.७२% हिस्सा

या वर्षीचा ख्रिसमस ठरतोय खास का ? जाणून घेऊया कारण

अंकांचा अनोखा योग जुळून आला आहे .तारीख बघा २५ /१२/२५ आहे ना आश्चर्यकारक डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना आतुरता

उच्च रक्तदाबाने हैराण झाला आहात? मग रोज खा सुकं खोबर

रोज जेवण बनवताना वेगवेगळ्या पदार्थांचा वापर केला जातो.त्यामध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ म्हणजे