IND vs AUS: पर्थ कसोटीसाठी अंपायर्सच्या नावांची घोषणा, भारतीय चाहत्यांचे टेन्शन वाढले!

  54

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया(IND vs AUS) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरला पर्थच्या ऑप्टस स्टेडियममध्ये खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार हा सामना सकाळी ७.५० वाजता सुरू होईल. पहिल्या कसोटीसाठी अंपायर्सच्या नावांची घोषणा झाली आहे.


इंग्लंडचे रिचर्ड कॅटलबोरो आणि न्यूझीलंडचे क्रिस गॅफनी या सामन्यात अंपायरची भूमिका निभावतील. रिचार्ज कॅटलबोरो यांनी या सामन्यात अंपायरिंग करणे भारतीय चाहत्यांसाठी चिंतेची बाब आहे. मोठ्या सामन्यांमध्ये रिचर्ड कॅटलबोरो यांनी अंपायरिंग केले असताना भारताने अनेक सामने गमावले आहेत. गेल्या वर्षी वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये कॅटलबोरो यांनी मैदानी अंपायरिंगची भूमिका निभावली होती.



न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्डकप सेमीफायनल आणि टी-२० वर्ल्डकप सामन्यात कॅटलबोरो अंपायर होते. गेल्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्येही रिचर्ड यांनी थर्ड अंपायरची भूमिका निभावली होती. यासोबतच २०१४च्या वर्षी टी-२० वर्ल्डकप, २०१५ वनडे वर्ल्डकप, २०१६ टी-२० वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७च्या नॉकआऊट सामन्यातही कॅटलबोरो अंपायर होते.


५१ वर्षीय कॅटलबोरो अंपायर बनण्याआधी क्रिकेटही खेळले आहेत. कॅटलबोरो यांनी ३३ फर्स्ट क्लास आणि २१ लिस्ट ए सामन्यांत एकूण १४४८ धावा केल्या होत्या.

Comments
Add Comment

देशातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम बंगळुरूमध्ये उभारले जाणार

बंगळुरू: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळुरूमधील बोम्मासंद्राच्या सूर्या सिटीमध्ये एक भव्य

संजू सॅमसन राजस्थान रॉयल्समधून बाहेर पडणार?

चेन्नईकडून खेळण्याची शक्यता, अश्विनही संघातून बाहेर पडण्याच्या विचारात चेन्नई  : संजू सॅमसनने राजस्थान

'या' पाकिस्तानी क्रिकेटरला बलात्काराच्या आरोपात ब्रिटनमध्ये अटक

नवी दिल्ली: पाकिस्तानचा २४ वर्षीय क्रिकेटर हैदर अलीला बलात्कार प्रकरणात ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली आहे.

आशिया कप हॉकी स्पर्धेतून पाकिस्तान संघाची माघार; भारतात येऊन खेळण्यास नकार

नवी दिल्ली : आशिया कप क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाक यांच्यातील तिढा सुटला असताना दुसऱ्या बाजूला आशिया कप हॉकी

मोहम्मद सिराज आयसीसी क्रमवारीत १५ व्या स्थानावर

इंग्लंड मालिकेमुळे सिराजची १२ स्थानाची झेप नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल येथील पाचव्या आणि शेवटच्या

आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच, गिल, जायसवाल आणि सुदर्शनला संधी मिळण्याची शक्यता

मुंबई : बीसीसीआय ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. यशस्वी