UP Accident : उत्तर प्रदेशात ट्रक अन् खासगी बसची जोरदार धडक; अपघातात ५ जणांचा मृत्यू, १५ जण जखमी!

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (UP News) अलीगढमध्ये यमुना एक्सप्रेस वेवर भीषण अपघात (UP Accident) घडल्याची बातमी समोर आली आहे. एका खासगी डबल डेकर बस आणि ट्रकची जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात घडला. यामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहेत.



मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये यमुना एक्सप्रेस वेवर (Yamuna Express Way) मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. दिल्लीहून आजमगढला जाणाऱ्या एका डबल डेकर बसने ट्रकला मागून धडक दिली. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यत वर्तवण्यात येत आहे. तर प्रवाशांनी चालक नशेत होता असेही म्हटले आहे. मात्र त्यावर जखमी कंडक्टरने चालक नशेत नव्हता असा दावा केला आहे.



जखमींची माहिती


अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये पाच महिन्याचे बाळ, एक महिला आणि तीन पुरुष यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये ११ महिन्यांची चिमुकली, एक लहान मुलगी, पाच वर्षांचा मुलगा, तीन महिला आणि ९ पुरुष आहेत. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी रेस्क्यू करत सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं.



मुख्यमंत्री योगींनी दिल्या सूचना


अलिगढ दुर्घटनेची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी दखल घेतली असून शोक व्यक्त केला आहे. तसेच जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यासोबतच जखमींच्या लवकरात लवकर बरे व्हावी अशा आशा व्यक्त केली आहे. (UP Accident)

Comments
Add Comment

Kumar Bhaskar Verma Bridge: आसाममधील ब्रह्मपुत्रेवरील ६ पदरी पुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

Narendra Modi: पुलवामा हल्ल्याला ६ वर्षे पूर्ण; मोदींनी वाहिली शहीद जवानांना श्रद्धांजली

मुंबई: पुलवामा हल्ल्याला आज सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी x वर एक भावूक

Indian Passport : भारतीय पासपोर्टचे जागतिक महत्त्व वाढले, रँकिंग सुधारले

Henley Passport Index 2026 । नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट अर्थात भारतीय पारपत्राच्या जागतिक रँकिंगमध्ये (क्रमवारी) सुधारणा झाली

‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली : ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ९ मार्चपर्यंत स्थगित

नवी दिल्ली : लोकसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा शुक्रवारी संपला. पीठासीन अधिकारी संध्या राय यांनी

Narendra Modi: अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या 'सेवा तीर्थ'चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या सेवा