UP Accident : उत्तर प्रदेशात ट्रक अन् खासगी बसची जोरदार धडक; अपघातात ५ जणांचा मृत्यू, १५ जण जखमी!

Share

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (UP News) अलीगढमध्ये यमुना एक्सप्रेस वेवर भीषण अपघात (UP Accident) घडल्याची बातमी समोर आली आहे. एका खासगी डबल डेकर बस आणि ट्रकची जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात घडला. यामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये यमुना एक्सप्रेस वेवर (Yamuna Express Way) मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. दिल्लीहून आजमगढला जाणाऱ्या एका डबल डेकर बसने ट्रकला मागून धडक दिली. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यत वर्तवण्यात येत आहे. तर प्रवाशांनी चालक नशेत होता असेही म्हटले आहे. मात्र त्यावर जखमी कंडक्टरने चालक नशेत नव्हता असा दावा केला आहे.

जखमींची माहिती

अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये पाच महिन्याचे बाळ, एक महिला आणि तीन पुरुष यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये ११ महिन्यांची चिमुकली, एक लहान मुलगी, पाच वर्षांचा मुलगा, तीन महिला आणि ९ पुरुष आहेत. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी रेस्क्यू करत सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं.

मुख्यमंत्री योगींनी दिल्या सूचना

अलिगढ दुर्घटनेची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी दखल घेतली असून शोक व्यक्त केला आहे. तसेच जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यासोबतच जखमींच्या लवकरात लवकर बरे व्हावी अशा आशा व्यक्त केली आहे. (UP Accident)

Recent Posts

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

2 hours ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

2 hours ago

समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे

सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…

2 hours ago

राखी वटवट्या

डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…

2 hours ago

“ठाऊक आहे का तूज काही?”

श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…

3 hours ago

साहित्य म्हणजे नेमकं काय ?

गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…

3 hours ago