UP Accident : उत्तर प्रदेशात ट्रक अन् खासगी बसची जोरदार धडक; अपघातात ५ जणांचा मृत्यू, १५ जण जखमी!

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (UP News) अलीगढमध्ये यमुना एक्सप्रेस वेवर भीषण अपघात (UP Accident) घडल्याची बातमी समोर आली आहे. एका खासगी डबल डेकर बस आणि ट्रकची जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात घडला. यामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहेत.



मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये यमुना एक्सप्रेस वेवर (Yamuna Express Way) मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. दिल्लीहून आजमगढला जाणाऱ्या एका डबल डेकर बसने ट्रकला मागून धडक दिली. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यत वर्तवण्यात येत आहे. तर प्रवाशांनी चालक नशेत होता असेही म्हटले आहे. मात्र त्यावर जखमी कंडक्टरने चालक नशेत नव्हता असा दावा केला आहे.



जखमींची माहिती


अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये पाच महिन्याचे बाळ, एक महिला आणि तीन पुरुष यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये ११ महिन्यांची चिमुकली, एक लहान मुलगी, पाच वर्षांचा मुलगा, तीन महिला आणि ९ पुरुष आहेत. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी रेस्क्यू करत सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं.



मुख्यमंत्री योगींनी दिल्या सूचना


अलिगढ दुर्घटनेची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी दखल घेतली असून शोक व्यक्त केला आहे. तसेच जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यासोबतच जखमींच्या लवकरात लवकर बरे व्हावी अशा आशा व्यक्त केली आहे. (UP Accident)

Comments
Add Comment

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या