Health Tips: डायबिटीज, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवायचा असेल तर मधामध्ये ही गोष्ट मिसळून खा

मुंबई: आयुर्वेदात मध आणि काळी मिरीचे सेवन फायदेशीर मानले जाते. थोडीशी काळी मिरी मधामध्ये मिसळून खाल्ल्याने अनेक आजार दूर होतात. हे दोन्ही औषधी गुणांनी भरलेले आहे. यामुळे सर्दी, खोकला आणि मोसमी आजार बरे केले जाऊ शकतात.


मधामध्ये व्हिटामिन के, आर्यन, पोटॅशियम, मॅग्नेशियम यासारखी गरजेची व्हिटामिन आणि मिनरल्स असतात तर काळ्या मिरी आणि मधामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लामेंटरी आणि अँटी बॅक्टेरियल गुण असतात. या गुणांमुळे मोसमी आजार, थंडीत सांधेदुखी, सूज आणि अनेक समस्यांचा इलाज करता येतो.


पोषकतत्वांचे भांडार असलेली काळी मिरी आणि मध डायबिटीज तसेच कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यास मदत होते. एक चमचा शुद्ध मधात एक चमचा वाटलेली काळी मिरी घ्या. हे चाटण खा. यानंतर अर्धा तास काहीही खाऊ नका. यामुळे घश्यातील कफ, श्सासातील दुर्गंधी या समस्या बऱ्या होतात.


श्वासासंबंधित समस्यांमध्ये आराम मिळवण्यासाठी तुम्ही मध, काळी मिरी तसेच तुळशीच्या पानांच्या रसाचे सेवन करा. यामुळे श्वासासंबंधित समस्या कमी होऊ शकतात. यामुळे अॅलर्जीही दूर राहण्यास मदत होते. खासकरून अस्थमा आणि श्वासासंबंधित समस्यांनी पीडित लोकांना याचा फायदा होईल.

Comments
Add Comment

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि