Nitin Gadkari : काय सांगता खरंच... आता फक्त १७ मिनिटात पोहोचा नवी मुंबई विमानतळावर!

मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) देशातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल घडवून आणणार आहेत. आता मुंबई ते नवी मुंबई विमानतळ (Navi Mumbai Airport) फक्त आणि फक्त १७ मिनिटांत गाठता येणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रस्तावित वॉटर टॅक्सी (Water Taxi) सेवेमुळे लोकांना मुंबईतील कुठूनही १७ मिनिटांत पोहोचता येईल. त्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.



रविवारी रात्री महाराष्ट्राच्या ठाणे शहरात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी एका निवडणूक सभेला संबोधित करत असताना त्यांनी हे वक्तव्य केले. मुंबई आणि ठाणे दरम्यान कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या योजनांबद्दलही त्यांनी माहिती दिली.



बस १७ मिनिटे लागतील


मुंबईत विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election 2024) २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. मार्च २०२५ मध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होण्याची अपेक्षा आहे. नितीन गडकरी म्हणाले की, प्रवाशांना प्रस्तावित वॉटर टॅक्सी सेवा सुरू झाल्यानंतर मुंबईच्या कोणत्याही भागातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचण्यासाठी फक्त १७ मिनिटे लागतील. विमानतळाजवळ या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी एक 'जेट्टी' आधीच बांधण्यात आली आहे असेही गडकरी म्हणाले. विशाल समुद्र किनारा मुंबई आणि ठाणे परिसराला लाभला आहे. या समुद्राचा जल वाहतुकीसाठी वापर करुन रस्त्यावरील गर्दी आणि प्रदूषण कमी करता येणार आहे. मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस हायवे पूर्ण झाल्यावर मुंबई-पुणे महामार्गावरील गर्दी कमी होणार असल्याचे गडकरी यांनी म्हटले.


महाराष्ट्रमध्ये सर्व मोठी उद्योग येत आहेत. संभाजी नगरमध्ये २० हजार कोटींची गुंतवणूकहोत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडून राज्य आणि प्रशासन कसे असावे आणि ते कसे चालवावे शिकण्यासारखे आहे. परंतु काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे गेल्या ६० वर्षांत देशाचा विकास झाला नाही, अशी टीका नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर केली.



रस्ते बांधण्यासाठी करणार कचऱ्याचा वापर


अटल सेतू जवळून १४ पदरी रस्ता तयार केला जाणार आहे. हा रस्ता मुंबईहून बेंगळुरूला जाणार असून पुण्यातील रिंग रोड मार्गे हा रस्ता तयार केला जाईल. या रस्त्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक ५० टक्क्यांनी कमी होईल. तसेच येत्या २५ वर्षांत सर्व वाहने विजेवर चालतील. तसेच आपण रस्ते बांधण्यासाठी कचऱ्याचा देखील वापर करू शकतो, असेही त्यांनी म्हटले. (Nitin Gadkari)

Comments
Add Comment

Mumbai Update : मुंबईत मलेरियाचा वाढता धोका; 3,177 रुग्णांची नोंद, डेंग्यू-लेप्टोमध्ये मात्र घट

Mumbai : मुंबईत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने उपाययोजना तीव्र

Mumbai Navy Nagar News : नौदल जवान, पत्नी अन् दोन चिमुकल्यांचा संशयास्पद मृत्यू; मुंबईतील 'नेव्ही नगर'मध्ये धक्कादायक घटना

राजस्थान : राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील ककराना गावातील रहिवासी आणि भारतीय नौदलात कार्यरत असलेले जवान

Maha Walkathon 2026 : महा वॉकेथॉन 2026 मध्ये अभिनेता संजय दत्त यांचा सहभाग; 36 जिल्ह्यांत ‘वॉक फॉर वॉटर’

मुंबई : माती आणि जलसंधारणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण

Devendra Fadnavis : दोन वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सिंगापूर आणि 'यूएई'ला मागे टाकेल

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास; अमेरिकेतील कंपन्यांकडून गुंतवणुकीचा ओघ वाढणार मुंबई : "राज्याचा

Sameer Wankhede on FDA Raids : तुकाराम मुंढे फार काही वेगळं करतायत असं नाहीये...तुकाराम मुंढेंबाबतच्या प्रश्नावर समीर वानखेडेंचे थेट उत्तर!

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे (NCB) माजी विभागीय संचालक आणि चर्चित आयआरएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आपल्या रोखठोक

Accident News : मिरा रोडमध्ये भरधाव वाहनाने नागरिकांना उडवलं; धडकेनंतर चालक फरार, व्हिडिओ व्हायरल

मिरा रोड:  मिरा-भाईंदर येथे भरधाव आणि बेदरकार वाहनचालकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिरा रोड येथील जे.पी.