Nitin Gadkari : काय सांगता खरंच... आता फक्त १७ मिनिटात पोहोचा नवी मुंबई विमानतळावर!

  150

मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) देशातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल घडवून आणणार आहेत. आता मुंबई ते नवी मुंबई विमानतळ (Navi Mumbai Airport) फक्त आणि फक्त १७ मिनिटांत गाठता येणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रस्तावित वॉटर टॅक्सी (Water Taxi) सेवेमुळे लोकांना मुंबईतील कुठूनही १७ मिनिटांत पोहोचता येईल. त्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.



रविवारी रात्री महाराष्ट्राच्या ठाणे शहरात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी एका निवडणूक सभेला संबोधित करत असताना त्यांनी हे वक्तव्य केले. मुंबई आणि ठाणे दरम्यान कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या योजनांबद्दलही त्यांनी माहिती दिली.



बस १७ मिनिटे लागतील


मुंबईत विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election 2024) २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. मार्च २०२५ मध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होण्याची अपेक्षा आहे. नितीन गडकरी म्हणाले की, प्रवाशांना प्रस्तावित वॉटर टॅक्सी सेवा सुरू झाल्यानंतर मुंबईच्या कोणत्याही भागातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचण्यासाठी फक्त १७ मिनिटे लागतील. विमानतळाजवळ या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी एक 'जेट्टी' आधीच बांधण्यात आली आहे असेही गडकरी म्हणाले. विशाल समुद्र किनारा मुंबई आणि ठाणे परिसराला लाभला आहे. या समुद्राचा जल वाहतुकीसाठी वापर करुन रस्त्यावरील गर्दी आणि प्रदूषण कमी करता येणार आहे. मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस हायवे पूर्ण झाल्यावर मुंबई-पुणे महामार्गावरील गर्दी कमी होणार असल्याचे गडकरी यांनी म्हटले.


महाराष्ट्रमध्ये सर्व मोठी उद्योग येत आहेत. संभाजी नगरमध्ये २० हजार कोटींची गुंतवणूकहोत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडून राज्य आणि प्रशासन कसे असावे आणि ते कसे चालवावे शिकण्यासारखे आहे. परंतु काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे गेल्या ६० वर्षांत देशाचा विकास झाला नाही, अशी टीका नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर केली.



रस्ते बांधण्यासाठी करणार कचऱ्याचा वापर


अटल सेतू जवळून १४ पदरी रस्ता तयार केला जाणार आहे. हा रस्ता मुंबईहून बेंगळुरूला जाणार असून पुण्यातील रिंग रोड मार्गे हा रस्ता तयार केला जाईल. या रस्त्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक ५० टक्क्यांनी कमी होईल. तसेच येत्या २५ वर्षांत सर्व वाहने विजेवर चालतील. तसेच आपण रस्ते बांधण्यासाठी कचऱ्याचा देखील वापर करू शकतो, असेही त्यांनी म्हटले. (Nitin Gadkari)

Comments
Add Comment

'आपले सरकार' पोर्टलवरील सेवा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून द्याव्यात', मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्य शासनाच्या विविध विभागांकडून नागरिकांना सेवा पुरवल्या जातात, या सेवांसाठी आपले सरकार हे पोर्टल

Hartalika 2025: अखंड सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी केले जाते हरतालिकेचे व्रत

मुंबई : हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेला हरतालिका व्रताचा सण यंदा २६ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा होत

Mumbai Police: मुंबई पोलिसांची कौतुकास्पद मोहीम, चोरीला गेलेले ८,००० मोबाईल परत मिळवून दिले

मुंबई: मुंबई पोलिसांनी चोरीला गेलेले मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली

GSB Ganpati First Look: मुंबईतील सगळ्यात श्रीमंत बाप्पाची पहिली झलक दिमाखात सादर

मुंबईच्या GSB सेवा मंडळाच्या बाप्पाच्या फर्स्ट लुकचे दिमाखात अनावरण  मुंबई: गणेश चतुर्थीसाठी आता एकच दिवस बाकी

Ganeshotsav 2025: वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने साकारले ५२ फूटी काशी विश्वनाथ मंदिर

मुंबई: दरवर्षी प्रसिध्द मंदिरांची हुबेहुब आरास साकारणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच मराठी चित्रपट ‘अरण्य’ च्या पोस्टरचे अनावरण करण्यात