Nitin Gadkari : काय सांगता खरंच... आता फक्त १७ मिनिटात पोहोचा नवी मुंबई विमानतळावर!

मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) देशातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल घडवून आणणार आहेत. आता मुंबई ते नवी मुंबई विमानतळ (Navi Mumbai Airport) फक्त आणि फक्त १७ मिनिटांत गाठता येणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रस्तावित वॉटर टॅक्सी (Water Taxi) सेवेमुळे लोकांना मुंबईतील कुठूनही १७ मिनिटांत पोहोचता येईल. त्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.



रविवारी रात्री महाराष्ट्राच्या ठाणे शहरात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी एका निवडणूक सभेला संबोधित करत असताना त्यांनी हे वक्तव्य केले. मुंबई आणि ठाणे दरम्यान कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या योजनांबद्दलही त्यांनी माहिती दिली.



बस १७ मिनिटे लागतील


मुंबईत विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election 2024) २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. मार्च २०२५ मध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होण्याची अपेक्षा आहे. नितीन गडकरी म्हणाले की, प्रवाशांना प्रस्तावित वॉटर टॅक्सी सेवा सुरू झाल्यानंतर मुंबईच्या कोणत्याही भागातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचण्यासाठी फक्त १७ मिनिटे लागतील. विमानतळाजवळ या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी एक 'जेट्टी' आधीच बांधण्यात आली आहे असेही गडकरी म्हणाले. विशाल समुद्र किनारा मुंबई आणि ठाणे परिसराला लाभला आहे. या समुद्राचा जल वाहतुकीसाठी वापर करुन रस्त्यावरील गर्दी आणि प्रदूषण कमी करता येणार आहे. मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस हायवे पूर्ण झाल्यावर मुंबई-पुणे महामार्गावरील गर्दी कमी होणार असल्याचे गडकरी यांनी म्हटले.


महाराष्ट्रमध्ये सर्व मोठी उद्योग येत आहेत. संभाजी नगरमध्ये २० हजार कोटींची गुंतवणूकहोत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडून राज्य आणि प्रशासन कसे असावे आणि ते कसे चालवावे शिकण्यासारखे आहे. परंतु काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे गेल्या ६० वर्षांत देशाचा विकास झाला नाही, अशी टीका नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर केली.



रस्ते बांधण्यासाठी करणार कचऱ्याचा वापर


अटल सेतू जवळून १४ पदरी रस्ता तयार केला जाणार आहे. हा रस्ता मुंबईहून बेंगळुरूला जाणार असून पुण्यातील रिंग रोड मार्गे हा रस्ता तयार केला जाईल. या रस्त्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक ५० टक्क्यांनी कमी होईल. तसेच येत्या २५ वर्षांत सर्व वाहने विजेवर चालतील. तसेच आपण रस्ते बांधण्यासाठी कचऱ्याचा देखील वापर करू शकतो, असेही त्यांनी म्हटले. (Nitin Gadkari)

Comments
Add Comment

आशियातील सर्वात मोठा विकेंद्रीत सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून महाराष्ट्राने रचली यशोगाथा

सौर ऊर्जेच्या माध्यमातून वर्षअखेरपर्यंत १६ गिगा वॅट वीज निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस : 

मुंबई कोस्टल रोड पूर्ण, सहा महिन्यांनी अभियंत्यांच्या पाठीवर आयुक्तांची कौतुकाची थाप

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई

दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात ‘लॉन्चिंग शाफ्ट’चे खोदकाम जलद गतीने सुरू

मुंबई विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी

रेडिओ क्लब जेट्टीचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास कंत्राटदारावर कारवाई करणार - मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांचा इशारा

मुंबई : बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबनजीक असलेल्या जेट्टीचे काम निविदेतील कालमर्यादेत करण्यात यावे. जेट्टीचे

जलक्षेत्रांतील जमिनींच्या शाश्वत विकासासाठी महाराष्ट्र सरकार आणणार विशेष धोरण - मंत्री नितेश राणे यांनी घेतला ‘लँड मॅनेजमेंट अँड वॉटरफ्रंट युज पॉलिसी’चा आढावा

मुंबई : राज्यातील जलक्षेत्रांलगतच्या जमिनींचा शाश्वत, नियोजनबद्ध आणि पर्यावरणस्नेही विकास साधण्यासाठी

नाहूर–ऐरोली उड्डाणपूल ठरणार गेमचेंजर, केबल-स्टेड रचनेतून ठाणे–मुंबईला नवी गती; जाणून घ्या सविस्तर

मुंबई : मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा देणारा गोरेगाव–मुलुंड लिंक रोड प्रकल्प निर्णायक टप्प्यावर