Anmol Bishnoi : मुंबई पोलिसांची कारवाई! लॉरेन्स बिश्नोईच्या भावाला अमेरिकेतून अटक

मुंबई : एनसीपी नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्यावर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून (Lawrence Bishnoi Gang) गोळीबार करण्यात आला होता. तसेच लॉरेन्स बिश्नोईकडून सातत्याने सलमान खानला (Salman Khan) देखील जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आतापर्यंत २५ आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर या प्रकरणातील फरार आरोपी लॉरेन्स बिश्र्नोईच्या भावाला देखील अटक करण्यात आली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानला धमकी आणि बाबा सिद्दिकीच्या हत्ये प्रकरणातील आरोपी अनमोल बिश्नोई (Anmol Bishnoi) फरार होताच त्याच्या प्रत्यार्पणासाठी मुंबई पोलिसांनी अमेरिकेला प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी अनमोल बिश्नोई अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात असल्याचे सांगितले. त्यांनतर माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांनी धडक कारवाई करत लॉरेन्स बिश्र्नोईच्या भावाला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याला लवकरच भारतात आणले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.


दरम्यान, एजन्सीने २०२२ च्या दोन प्रकरणांमध्ये बिष्णोई विरुद्ध आरोपपत्र दाखल केलं होतं. यामध्ये २०२२ साली पंजाबचा गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येचाही समावेश असून याच्यावर अनमोल बिश्नोईवर (Anmol Bishnoi) १८ पेक्षाही अधिक गुन्हे नोंद आहेत.

Comments
Add Comment

‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करावा'

मुंबई : प्रवाशांना घरापासून ते थेट कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून

विरोधी पक्षात बसताच उबाठाच्या नगरसेवकांना आसने टोचू लागली

महापालिका सभागृहातील आसन व्यवस्थेत होणार सुधारणार गटनेत्यांच्या अनौपचारिक बैठकीत प्रशासनाला दिल्या

बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांविरोधात कारवाईला वेग

मुंबई : मुंबई उपनगरचे सहपालक मंत्री गेल्या पाच वर्षापासून सातत्याने बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांच्या

मध्य, हार्बरसह पश्चिम रेल्वेवर ब्लॉक

खारबाव येथील नियोजित रात्रकालीन मेगाब्लॉक रद्द मुंबई (प्रतिनिधी) : रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि

कांजूरमार्ग कारशेडच्या जागेबाबत खासगी विकासकांची याचिका फेटाळली

मुंबई : ‘स्वामी समर्थ नगर – विक्रोळी मेट्रो ६’ मार्गिकेच्या कारशेडसाठी हस्तांतरित करण्यात आलेल्या कांजूरमार्ग

Water Metro Project: मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; लवकरच सुरु होणार 'जल मेट्रो प्रकल्प'

मुंबई: मुंबईच्या दैनंदिन वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची लवकरच सुटका होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खासदार