IPL 2025 : आरसीबी कर्णधार पदासाठी केएल नावाची चर्चा!

२०२५ मेगा लिलावासाठी उलटी गिनती सुरू


नवी दिल्ली : आयपीएल २०२५ (IPL 2025) मेगा लिलावासाठी उलटी गिनती सुरू झाली आहे. आयपीएलचा लिलाव २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे होणार आहे. या लिलावात फ्रेंचायझी मोठ्या प्रमाणात बोली लावताना दिसती. केएल राहुल आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) या खेळाडूंचा समावेश आहे. लखनऊ सुपर जायंट्मसधून (Lucknow Super Giants) बाहेर झाल्यानंतरके एल राहुल आयपीएल२०२५ मध्ये कोणत्या संघाचा भाग असेल, यावर सगळ्यंचे लक्ष लागले आहे.



आयपीएल२०२५ च्या मेगा लिलावाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे राहुल आरसीबीमध्ये (RCB) जाऊ शकतो, अशी अफवा वाढत आहे. जिथे त्याने २०१३ मध्ये त्याच्या आयपीएल कारकिर्दीला सुरुवात केली होती. एका मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राहुलला लिलावात खरेदी करण्यासाठी आधीच ३० कोटी रुपयांचे बजेट राखून ठेवले आहे.


केएल राहुल २०१६ पर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला आणि त्याच हंगामात आरसीबीने आयपीएलची अंतिम फेरी गाठली. २०१६ मध्ये सनरायझर्स हैदराबाद बंगळुरूविरुद्ध विजेतेपदाच्या लढतीत होते. त्या सामन्यात एसआरएचने प्रथम खेळताना२०८ धावांची मोठी खेळी केली होती. दुसरीकडे, बंगळुरूला निर्धारित २० षटकांत केवळ २०० धावांपर्यंत मजल मारता आली. त्या सामन्यात विराट कोहलीने ५४ आणि राहुलने ११ धावा केल्या होत्या. राहुलने आयपीएल २०१६ मध्ये १४ सामने खेळताना ३९७ धावा केल्या होत्या.



केएलचे आरसीबीमधून पदार्पण


केएल राहुलने २०१३मध्ये आरसीबीकडून खेळताना आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने बेंगळुरूसाठी चार हंगाम खेळले, ज्यामध्ये त्याने १९ सामन्यांमध्ये ४१७ धावा केल्या. आरसीबीने आयपीएल २०२५ साठी विराट कोहली (२१ कोटी), रजत पाटीदार (११ कोटी) आणि यश दयाल यांना ५ कोटी रुपयांना खरेदी केले होते. आरसीबीच्या पर्समध्ये अजूनही ८३ कोटी रुपये शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत या टीमने राहुलसाठी लिलावात ३० कोटी रुपयांपर्यंत बोली लावण्याची तयारी केली असल्याचा दावा केला जात आहे.

Comments
Add Comment

Income Tax Return भरणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी...

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत