
पालघर : राज्यातील थंड हवामानातही पालघरच्या राजकीय वातावरणाने तापमान वाढवले आहे. पैसे वाटपावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. या प्रकरणामुळे विष्णूनगर भागात तणाव निर्माण झाला, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
विष्णूनगर भागातील वर्धमान सोसायटीमध्ये शिंदे गटाचे नगरसेवक रवींद्र म्हात्रे व अमोल पाटील वेळ संपून गेल्यानंतरही प्रचारासाठी गेले होते. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, प्रचाराच्या नावाखाली पैसे वाटप करण्यात येत होते. यावरून दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला. काही वेळातच दोन्ही बाजूचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले आणि शाब्दिक बाचाबाची झाली.

दोन डिसेंबरला न्यायालयात हजर रहाण्याचे न्यायालयाचे आदेश पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्याप्रकरणी सुरू अ ...
प्रसंगाची माहिती मिळताच पालघर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती शांत करत संशयित कार ताब्यात घेतली. मात्र, तपासणीत कारमध्ये पैसे किंवा इतर कोणत्याही प्रकारचे पुरावे आढळले नाहीत. पोलिसांनी दोन्ही गटांना समज दिली आणि तणाव निवळला.
प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले असून, अधिकृत तक्रारींचा तपास सुरू आहे. या घटनेने निवडणुकीनंतरही राजकीय संघर्ष कसा चिघळतो आहे, हे स्पष्ट झाले आहे.
पालघरमधील या घटनेने ठाकरे व शिंदे गटातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. हे प्रकरण भलेही थांबले असले तरी या राजकीय संघर्षाचा परिणाम स्थानिक वातावरणावर होण्याची शक्यता आहे.