Financial planning : हे ७ सूत्र लक्षात ठेवा! पैसा इतका वाढेल की, लोक विचारायला येतील-तुम्ही हे कसे केले?

  82

मुंबई : जर तुम्ही तुमच्या पगाराचा किंवा मिळणा-या उत्पन्नाचा योग्य वापर करत नसाल आणि आर्थिक नियोजनाकडे (Financial planning) दुर्लक्ष करत असाल तर ही चूक तुम्हाला महागात पडू शकते. पैशाची कमतरता तुमच्या आयुष्यात कधीही समस्या निर्माण करू शकते.



योग्य आर्थिक नियोजन करणे हे रॉकेट सायन्स नाही, तर तुम्ही ते योग्य वेळी सुरू केले पाहिजे. पण जर तुम्ही तुमच्या करिअरच्या सुरुवातीला हे करायला विसरलात तरी काही हरकत नाही, अजूनही संधी आहे... चला, ती ७ सोपी सूत्रे जाणून घेऊया, जी केवळ बचतीद्वारेच नव्हे तर तुमचे उत्पन्न अनेक पटींनी वाढविण्यात मदत करतील. या टिप्सचा अवलंब केल्यावर लोक स्वतः येऊन विचारतील, "भाई, तुम्ही हे कसे केले? तुम्ही इतके पैसे कसे वाढवले?"



आधी बचत, मग खर्च!


पगार आला की आधी बचत करा. त्याचा नियम बनवा. फक्त तुमची बचत जमा करू नका, गुंतवणूक करा, जेणेकरून तुमचे पैसे वाढतील.



तुमचे पैसे योग्य ठिकाणी ठेवा!


५०% खर्चासाठी, ३०% बचतीसाठी आणि २०% मजा आणि सहलीसाठी. आर्थिक बजेट सांभाळण्याचा हा सर्वोत्तम फॉर्म्युला आहे.



कार खरेदी करायची आहे का? हे जाणून घ्या!


२०% डाउन पेमेंट, कर्जाचा ४ वर्षांचा कालावधी आणि पगाराच्या १०% पेक्षा जास्त रक्कम ईएमआयकडे जाऊ नये, याची काळजी घ्या. कार खरेदी करणे शक्यतो टाळा. त्याऐवजी योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, पैसा वाढेल.



प्रियजनांसाठी संरक्षणात्मक कवच


तुमच्या पगाराच्या १० पट आयुर्विमा आणि वैद्यकीय विमा घ्या. हे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आर्थिक ताणापासून वाचवेल.




 

कर्जात बुडणे टाळा!


मासिक हप्ता हा पगाराच्या ३०% पर्यंत असावा. गृहकर्जाचा कालावधी कमी ठेवा म्हणजे कमी व्याज भरावे लागेल.


तुमची सर्व अंडी एका टोपलीत ठेवू नका


जर तुम्ही इक्विटी आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर २०-३०% पेक्षा जास्त गुंतवणूक करू नका. तुमची गुंतवणूक वेगवेगळ्या ठिकाणी विभागून करा.


अडचणीसाठी पैसे तयार ठेवा


दर महिन्याला ३-५% पगार आपत्कालीन निधीत टाका. (Financial planning) संकटकाळात याचा उपयोग होईल.

Comments
Add Comment

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई

शाळांमध्ये १४ ऑगस्टपासून पसायदानाचे पठण

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) :

Health: त्वचेसाठी वरदान आहे आवळा, दररोज खाल्ल्याने मिळतील हे फायदे

मुंबई : आवळा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. 'सुपरफूड' म्हणून ओळखला जाणारा आवळा केवळ शरीरातील विविध

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग