लश्कर-ए-तोयबाचा सीईओ असल्याचा दावा करत आरबीआयला धमकीचा फोन

मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला एक धमकीचा दूरध्वनी आला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःला ‘लश्कर-ए-तोयबा’चा विशेष कार्यकारी अधिकारी असल्याचा दावा केला. त्या व्यक्तीने आपण लश्कर-ए-तोयबाचा सीईओ आहे, बँक बंद करा, मोटरगाडी धडक देणार आहे, अशीही धमकी दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे.




अधिक माहिती अशी की, हा दूरध्वनी शनिवार सकाळी सुमारे १० वाजता आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेच्या सुरक्षा रक्षकाने माता रमाबाई मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, हा एक खोडसाळपणा असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.

यावर्षी विमानतळावर अनेक धमक्याचे संदेश आले होते. त्या प्रकारणी २० गुन्हे दाखल आहेत. गेल्यावर्षीही अफवांचे सुमारे १०० दूरध्वनी मुंबई पोलिसांना आले होते. यावर्षी जुलै महिन्यापर्यंत ३५ दूरध्वनी मुंबई पोलिसांना प्राप्त झाले आहेत.

Comments
Add Comment

Virar–Alibaug Multi-Modal Transport Corridor : १४ पदरी विरार-अलिबाग मल्टी-मोडल कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याला राज्य सरकारची मंजुरी; ३१ हजार कोटींच्या खर्चाला मान्यता!

मुंबई : महाराष्ट्र शासनाने मुंबई महानगर प्रदेशाचा (Mumbai Metropolitan Region Development Authority) चेहरामोहरा बदलून टाकण्याची क्षमता

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला नवा पर्याय

 नेरळ-शिरूर कॉरिडॉरला मंजुरी; १३३ किलोमीटर चौपदरी महामार्ग खासगी भागीदारीतून साकारणार मुंबई : मुंबई-पुणे

Govandi Crime : गोवंडीत ६ वर्षांच्या चिमुकल्यावर शाळेतील शिपायाकडून लैंगिक अत्याचार; 'पोक्सो'अंतर्गत गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईतील गोवंडी (Mumbai Govandi Area) परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. येथील एका

DC VS KKR : सलग चौथ्या विजयसाठी केकेआर सज्ज, दिल्लीसाठी करो या मरो चा सामना...

अरुण जेटली स्टेडियवर दिल्ली विरुद्ध केकेआर आमने सामने IPL 2026 : आयपीएल २०२६ चा ५१ वा सामना दिल्ली विरुद्ध केकेआर

PCOD Clinic : राज्यातील प्रत्येक सरकारी रुग्णालयांत आता 'पीसीओडी क्लिनिक'

दर १५ दिवसांनी तज्ज्ञ डॉक्टर भेट देणार; आरोग्यसेवा, सल्लाही विनामुल्य मुंबई : राज्यातील महिला आणि युवतींमध्ये

BMC News : महापालिकेत ठरावाच्या सूचना बाद होण्याची हॅट्रीक

सलग तिसऱ्या महिन्यात ठरावाच्या सूचना सभागृहात झाल्या रद्द मुंबई (सचिन धानजी) तब्बल पावणे चार वर्षांनंतर