लश्कर-ए-तोयबाचा सीईओ असल्याचा दावा करत आरबीआयला धमकीचा फोन

मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला एक धमकीचा दूरध्वनी आला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःला ‘लश्कर-ए-तोयबा’चा विशेष कार्यकारी अधिकारी असल्याचा दावा केला. त्या व्यक्तीने आपण लश्कर-ए-तोयबाचा सीईओ आहे, बँक बंद करा, मोटरगाडी धडक देणार आहे, अशीही धमकी दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे.




अधिक माहिती अशी की, हा दूरध्वनी शनिवार सकाळी सुमारे १० वाजता आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेच्या सुरक्षा रक्षकाने माता रमाबाई मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, हा एक खोडसाळपणा असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.

यावर्षी विमानतळावर अनेक धमक्याचे संदेश आले होते. त्या प्रकारणी २० गुन्हे दाखल आहेत. गेल्यावर्षीही अफवांचे सुमारे १०० दूरध्वनी मुंबई पोलिसांना आले होते. यावर्षी जुलै महिन्यापर्यंत ३५ दूरध्वनी मुंबई पोलिसांना प्राप्त झाले आहेत.

Comments
Add Comment

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गांतील प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय

राज्यातील २८ हजार प्रलंबित दावे जलद मार्गी लावण्यासाठी ५७ लवादांची नियुक्ती फडणवीस सरकारचा शेतकरी हिताचा

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या, मध्य, आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; वेळ पाहूनच बाहेर पडा

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर

राज्यात ‘वन स्टेट, वन पोर्टल’ संकल्पनेला गती; महा सारथी पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : राज्यात डिजिटल गव्हर्नन्स अधिक सक्षम व नागरिककेंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘वन स्टेट, वन