झाशी: जिल्हा रुग्णालयात भीषण आग, १० नवजात बाळांचा होरपळून मृत्यू

झाशी: उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये शुक्रवारी रात्री मेडिकल कॉलेजच्या नवजात शिशु विभागात भीषण आग लागली. यात १० नवजात बाळांचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर सकाळी उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचले आणि घटनेची पाहणी केली.


या अपघाताप्रकरणी उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी तपासाचे आदेश दिले आहेत तसेच जखमींवर उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आर्थिक मदतीसाठी तयार असल्याचे ते म्हणाले. उपमुख्यमंत्री म्हणाले, नवजात बाळांच्या मृत्यूची घटना दुर्देवी आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत मिळून आम्ही बालकांच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत.


रुग्णालयात ही आग कशामुळे लागली याचा तपास केला जाईल. यात जे दोषी आढळतील त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल. तसेच कोणालाही यात माफ केले जाणार आहे. सरकार बाळांच्या कुटुंबियांसोबत आहे. २४ तासांच्या आत तपासाचा रिपोर्ट येईल. मृत मुलांमध्ये १० पैकी ७ जणांची ओळख पटली आहे. अद्याप ३ बाळांची ओळख पटणे बाकी आहे. गरज पडल्यास डीएनए टेस्ट केली जाईल.



एनआयसीयूमध्ये ५४ मुले दाखल होती


या घटनेबाबत माहिती देताना झांसी सीएमएस सचिन मेहर यांनी सांगितले, महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजच्या एनआयसीयू वॉर्डमध्ये ५४ मुले दाखल होती. यावेळी अचानक आग लागली. ही आग विझवण्याचा प्रयत्न झाला. मात्र अधिकतर मुले ऑक्सिजन सपोर्टवर होती.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला