झाशी: जिल्हा रुग्णालयात भीषण आग, १० नवजात बाळांचा होरपळून मृत्यू

झाशी: उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये शुक्रवारी रात्री मेडिकल कॉलेजच्या नवजात शिशु विभागात भीषण आग लागली. यात १० नवजात बाळांचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर सकाळी उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचले आणि घटनेची पाहणी केली.


या अपघाताप्रकरणी उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी तपासाचे आदेश दिले आहेत तसेच जखमींवर उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आर्थिक मदतीसाठी तयार असल्याचे ते म्हणाले. उपमुख्यमंत्री म्हणाले, नवजात बाळांच्या मृत्यूची घटना दुर्देवी आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत मिळून आम्ही बालकांच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत.


रुग्णालयात ही आग कशामुळे लागली याचा तपास केला जाईल. यात जे दोषी आढळतील त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल. तसेच कोणालाही यात माफ केले जाणार आहे. सरकार बाळांच्या कुटुंबियांसोबत आहे. २४ तासांच्या आत तपासाचा रिपोर्ट येईल. मृत मुलांमध्ये १० पैकी ७ जणांची ओळख पटली आहे. अद्याप ३ बाळांची ओळख पटणे बाकी आहे. गरज पडल्यास डीएनए टेस्ट केली जाईल.



एनआयसीयूमध्ये ५४ मुले दाखल होती


या घटनेबाबत माहिती देताना झांसी सीएमएस सचिन मेहर यांनी सांगितले, महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजच्या एनआयसीयू वॉर्डमध्ये ५४ मुले दाखल होती. यावेळी अचानक आग लागली. ही आग विझवण्याचा प्रयत्न झाला. मात्र अधिकतर मुले ऑक्सिजन सपोर्टवर होती.

Comments
Add Comment

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी