झाशी: जिल्हा रुग्णालयात भीषण आग, १० नवजात बाळांचा होरपळून मृत्यू

झाशी: उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये शुक्रवारी रात्री मेडिकल कॉलेजच्या नवजात शिशु विभागात भीषण आग लागली. यात १० नवजात बाळांचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर सकाळी उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचले आणि घटनेची पाहणी केली.


या अपघाताप्रकरणी उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी तपासाचे आदेश दिले आहेत तसेच जखमींवर उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आर्थिक मदतीसाठी तयार असल्याचे ते म्हणाले. उपमुख्यमंत्री म्हणाले, नवजात बाळांच्या मृत्यूची घटना दुर्देवी आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत मिळून आम्ही बालकांच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत.


रुग्णालयात ही आग कशामुळे लागली याचा तपास केला जाईल. यात जे दोषी आढळतील त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल. तसेच कोणालाही यात माफ केले जाणार आहे. सरकार बाळांच्या कुटुंबियांसोबत आहे. २४ तासांच्या आत तपासाचा रिपोर्ट येईल. मृत मुलांमध्ये १० पैकी ७ जणांची ओळख पटली आहे. अद्याप ३ बाळांची ओळख पटणे बाकी आहे. गरज पडल्यास डीएनए टेस्ट केली जाईल.



एनआयसीयूमध्ये ५४ मुले दाखल होती


या घटनेबाबत माहिती देताना झांसी सीएमएस सचिन मेहर यांनी सांगितले, महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजच्या एनआयसीयू वॉर्डमध्ये ५४ मुले दाखल होती. यावेळी अचानक आग लागली. ही आग विझवण्याचा प्रयत्न झाला. मात्र अधिकतर मुले ऑक्सिजन सपोर्टवर होती.

Comments
Add Comment

फॉलोअर्सच्या शर्यतीत मुलांचं बालपण धोक्यात, सुधा मूर्तींची सरकारकडे महत्त्वाची मागणी

नवी दिल्ली : इंटरनेटवर आज असंख्य रील्स आणि व्हिडिओ पाहायला मिळतात ज्यात लहान मुलांचा थेट कंटेंट म्हणून वापर केला

उड्डाणं रद्द, तिकीटदर वाढले; हवाई प्रवासातील गोंधळावर सरकारची मोठी कारवाई

नवी दिल्ली : इंडिगोच्या तांत्रिक आणि व्यवस्थापकीय अडचणींमुळे मागील काही दिवसांपासून देशात मोठे विमान प्रवास

प्रवाशांना विमान रद्दीकरणाची पूर्ण परतफेड मिळणार! इंडिगोचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून इंडिगो विमान कंपनीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चेक-इन प्रणालीत

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३