IND vs SA : द. आफ्रिकेविरुद्ध भारताचा डावांचा डोंगर, तिलक-संजूचे शानदार शतक

  46

जोहान्सबर्ग: भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात धावांचा डोंगर उभा केला आहे. संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांच्या शानदार शतकांच्या जोरांवर भारताने आफ्रिकेविरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करताना तब्बल २८३ धावा केल्या.


संपूर्ण २० षटकांच्या खेळादरम्यान आफ्रिकेला केवळ भारताचा एकच गडी बाद करता आला. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा दोन्ही सलामीसाठी आले होते. मात्र अभिषेक शर्माला ३६ धावाच करता आल्या. त्यानंतर तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांनी जबरदस्त खेळी करताना भारताला अडीचशे पार धावा करून दिल्या.


गेल्या दोन सामन्यात निराशाजनक खेळी केलेल्या संजू सॅमसनने या सामन्यात शानदार शतक ठोकले. त्याने ५६ बॉलमध्ये ६ चौकार आणि ९ षटकार ठोकत १०९ धावांची नाबाद खेळी केली. त्यानंतर तिलक वर्माने नाबाद १२० धावा तडकावल्या. त्याने ४७ बॉलमध्ये ९ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने ही खेळी साकारली.


चार सामन्यांच्या भारतीय संघ सध्या २-१ने आघाडीवर आहे. त्यामुळे हा सामना जिंकत भारतीय संघ मालिका जिंकण्यांसाठी पुरेपूर प्रयत्न करेल.

Comments
Add Comment

IND vs ENG: आम्ही कधीच हार मानणार नाही', हेड कोच गौतम गंभीरची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया

मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam

DSP सिराजला पोलीस विभागाने केला या खास अंदाजात सलाम, मोठ्या कामगिरीसाठी दिल्या शुभेच्छा

मुंबई: मोहम्मद सिराजला DSP सिराज यासाठी म्हटले जाते कारण तेलंगणा पोलीसमध्ये तो डीएसपी पदावर आहे. या मोहम्मद

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे