IND vs SA : द. आफ्रिकेविरुद्ध भारताचा डावांचा डोंगर, तिलक-संजूचे शानदार शतक

  50

जोहान्सबर्ग: भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात धावांचा डोंगर उभा केला आहे. संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांच्या शानदार शतकांच्या जोरांवर भारताने आफ्रिकेविरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करताना तब्बल २८३ धावा केल्या.


संपूर्ण २० षटकांच्या खेळादरम्यान आफ्रिकेला केवळ भारताचा एकच गडी बाद करता आला. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा दोन्ही सलामीसाठी आले होते. मात्र अभिषेक शर्माला ३६ धावाच करता आल्या. त्यानंतर तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांनी जबरदस्त खेळी करताना भारताला अडीचशे पार धावा करून दिल्या.


गेल्या दोन सामन्यात निराशाजनक खेळी केलेल्या संजू सॅमसनने या सामन्यात शानदार शतक ठोकले. त्याने ५६ बॉलमध्ये ६ चौकार आणि ९ षटकार ठोकत १०९ धावांची नाबाद खेळी केली. त्यानंतर तिलक वर्माने नाबाद १२० धावा तडकावल्या. त्याने ४७ बॉलमध्ये ९ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने ही खेळी साकारली.


चार सामन्यांच्या भारतीय संघ सध्या २-१ने आघाडीवर आहे. त्यामुळे हा सामना जिंकत भारतीय संघ मालिका जिंकण्यांसाठी पुरेपूर प्रयत्न करेल.

Comments
Add Comment

R Ashwin IPL Retirement: आर. अश्विनने आयपीएलला दिला निरोप! म्हटले "प्रत्येक शेवट ही एक..."

चेन्नई: भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण

मिस्टर ३६०' एबी डिव्हिलियर्सचे आरसीबीमध्ये पुनरागमनाचे संकेत, पण नव्या भूमिकेत!

बंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाचा लाडका खेळाडू, 'मिस्टर ३६०'

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये