IND vs SA : द. आफ्रिकेविरुद्ध भारताचा डावांचा डोंगर, तिलक-संजूचे शानदार शतक

जोहान्सबर्ग: भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात धावांचा डोंगर उभा केला आहे. संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांच्या शानदार शतकांच्या जोरांवर भारताने आफ्रिकेविरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करताना तब्बल २८३ धावा केल्या.


संपूर्ण २० षटकांच्या खेळादरम्यान आफ्रिकेला केवळ भारताचा एकच गडी बाद करता आला. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा दोन्ही सलामीसाठी आले होते. मात्र अभिषेक शर्माला ३६ धावाच करता आल्या. त्यानंतर तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांनी जबरदस्त खेळी करताना भारताला अडीचशे पार धावा करून दिल्या.


गेल्या दोन सामन्यात निराशाजनक खेळी केलेल्या संजू सॅमसनने या सामन्यात शानदार शतक ठोकले. त्याने ५६ बॉलमध्ये ६ चौकार आणि ९ षटकार ठोकत १०९ धावांची नाबाद खेळी केली. त्यानंतर तिलक वर्माने नाबाद १२० धावा तडकावल्या. त्याने ४७ बॉलमध्ये ९ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने ही खेळी साकारली.


चार सामन्यांच्या भारतीय संघ सध्या २-१ने आघाडीवर आहे. त्यामुळे हा सामना जिंकत भारतीय संघ मालिका जिंकण्यांसाठी पुरेपूर प्रयत्न करेल.

Comments
Add Comment

हरमनप्रीत कौर आणि तो ऐतिहासिक विक्रम: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी 'त्या' १७१ धावांची चर्चा!

नवी दिल्ली : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या

WC Semi-Final: पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचली दक्षिण आफ्रिका, इंग्लंडला १२५ धावांनी हरवले

मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ मध्ये मोठा उलटफेर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी२० सामना पावसामुळे रद्द : दुसरा सामना ३१ ऑक्टोबरला!

ऑस्ट्रेलिया : मनुका ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणारा पहिला टी२० सामना अखेर सततच्या

टी२० मध्ये पुन्हा पावसाचे विघ्न: २० ऐवजी १८ षटकांचा सामना !

कॅनबेरा : कॅनबेरातील मनुका ओव्हल स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत–ऑस्ट्रेलिया पहिल्या टी२० सामन्यात पुन्हा एकदा

भारताला मोठा धक्का: दुखापतीमुळे नितीश कुमार रेड्डी तीन T20 सामन्यांमधून बाहेर!

कॅनबेरा : भारतीय क्रिकेट संघासाठी धोक्याची घंटा वाजवणारी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने बुधवारी दिलेल्या

७ महिन्यांच्या गर्भवती सोनिकाने जिंकले वेटलिफ्टिंग स्पर्धेत कांस्य पदक

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नाही, फक्त जिद्द असायला हवी. दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे खरे