Bharat Gogavale : राज्याच्या पाचही प्रांतावर राज्य करणारे नेते

महाड : आमदार भरत गोगावले (Bharat Gogavale) यांचे कौतुक करताना हभप कोकरे महाराज यांनी सांगितले की महाराष्ट्रात पाच प्रांत आहेत विदर्भात शास्त्रज्ञ, मराठवाड्यात संत, खानदेशात कवी, पश्चिम महाराष्ट्रात पुढारी तर कोकणात लेखक व क्रांतीकारक जन्माला येतात मात्र विदर्भ, मराठवाडा, खांदेश, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या पाचही प्रांतावर राज्य करणारे भरतशेठ हे एकमेव नेते आहेत. भरतशेठ हे केवळ महाडचे नेते नाही तर राज्यातील कानाकोपऱ्यातून येणारे दिन दलित, गोरगरीब, निराधार, अनाथ यांचे मंत्रालयातील काम फक्त भरतशेठ मुळे होते असे वारकरी सांप्रदाय कोकण प्रांताचे अध्यक्ष भगवान काकरे यांनी स्पष्ट केले.


राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व माजी मुख्यमंत्री उबाठा यांच्यावर टिकास्त्र सोडताना कोकरे यांनी महाराष्ट्राला खाईत लोटण्यासाठी शरद पवार व उबाठा यांनी जातीजातीत धर्मांधर्मात भांडणे लावून जातीय वाद निर्माण केला. कष्टकरी, मराठी माणसाची गळचेपी थांबवण्यासाठी शिवसेनेचा भगवा हाती घेतलेल्या बाळासाहेबांनी मोठ्या विश्वासाने उबाठा यांच्या खांद्यावर पक्षाची धुरा सोपवली मात्र स्वार्थ आणि खुर्चीसाठी त्यांनी सेनेचा भगवा काँग्रेसकडे गहाण ठेवला. मुख्यमंत्री पदाचे खुर्चीत बसल्यानंतर गड किल्ले, मराठी अस्मितेचा उद्धार होईल अशी स्वप्ने मराठी माणसांनी पाहिली मात्र उबाठा यांनी शिवसेना प्रमुखांचे विचार आणि पक्ष संपवून मराठी माणसाची स्वप्ने धुळीला मिळवली.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गद्दारी केल्याचा उबाठा यांच्याकडून आरोप केला जातो त्याचा समाचार घेताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुखांचे विचार आणि पक्ष वाचवण्यासाठी, गहाण ठेवलेला भगवा, धनुष्यबाण सोडवण्यासाठी उठाव केला असे कोकरे यांनी सांगितले. दिवाळीत ३ तारखेला सर्व लाडक्या बहिणींची भाऊबीज झाली. आता २० तारखेला आ. गोगावले यांना मताच्या रुपाने भाऊबीजेचा आहेर द्या. देश संकटात असेल तर मातृशक्ती जागी होत असते महिषासुर उन्मत झाला होता त्यावेळी कालीकामा प्रकटली, सुलतानीने नंगा नाच सुरु केला त्यावेळी जिजाऊ धावून आली आता महाविकास आघाडी देश गिळंकृत करायला बसली आहे तेव्हा मातृशक्तीने जागे व्हावे असे आवाहन कोकरे यांनी केले.


पन्हाळगडाला जेव्हा शत्रुंचा वेढा पडला होता त्यावेळी आपला राजा जोवर गडावर पोचत नाही तोपर्यंत बाजीप्रभु देशपांडे यांनी पावन खिंड लढवली होती त्याप्रमाणे आजपासून पुढील पाच दिवस शिवसैनिकांनी बाजीप्रभू प्रमाणे खिंड लढवून २० तारखेला शेवटचं मत मतपेटीत पडत नाही तोपर्यंत जागरूक राहावे असे आवाहन केले. यावेळी आ. गोगावले यांनी नाते गणासाठी २० कोटी तर नडगांव गणासाठी १८ कोटीचा निधी आणल्याचे सांगितले. नाते ते डोंगरोळी लोणेरे रस्ता, रवळनाथ सोमजाई देखणं मंदीर (१ कोटी मंजुरी ) जगदीश्वर मंदीर ३० लाख, निरंजन डावखरे यांच्या माध्यमातून पुल गारपाटला, सानेकोंड अशा दुर्गम भागातील रस्ते, पाणी योजना आपल्या आमदारकीच्या काळात झाल्याचे सांगत पुन्हा महायुतीची सत्ता येणार असून महाडकरांसाठी हा सुवर्णकाळ असणार आहे. त्यामुळे तुमच्या आमदाराला (Bharat Gogavale) भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन केले.

Comments
Add Comment

Dhurandhar 2 ; Virushka : वीरूष्काला पडली धुरंधर २ ची भुरळ; इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत.....

मुंबई : धुरंधर या चित्रपटाने सर्वानाच भुरळ पाडली आहे. पहिल्या भागाने जोरदार कमाई करत. भारतीयांच्या लोकांच्या

देवेंद्र फडणवीसांच्या एका कॉलनं बदलला निर्णय, प्राजक्त तनपुरेंनी राहुरी पोटनिवडणुकीतून घेतली माघार

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत दिवंगत

Nagpur Crime : नागपूर हादरलं! पैशांसाठी १४ वर्षीय मित्राची निघृण हत्या

नागपूर : नागपूर शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शहराला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय मुलाच्या अपहरण आणि

Gautami patil : गौतमी पाटीलच्या 'या' नवीन गाण्यानं घातला धूमाकूळ

मुंबई : आपल्या मनमोहक अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारी महाराष्ट्राची लाडकी नृत्यागंणा गौतमी पाटील ( Gautami Patil ) चा

Gautami Patil : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर गौतमी पाटीलनं दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

नाशिक : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातचे दिवसेंदिवस अनेक काळे कारनामे समोर येत असून महिला लैंगिक शोषण, आर्थिक

Bigg Boss Marathi 6 : पहिला फायनलिस्ट कोण ठरणार ? तिकीट टू फिनालेची उत्सुकता वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन आता शेवटच्या टप्प्यात पोहचलं असून ११ जानेवारी २०२५ रोजी सुरु झालेल्या बिग बॉस मराठी