स्वामी दत्त अवतारच आहेत...

  23

विलास खानोलकर


श्रीस्वामींचे ‘अरे, तू शास्त्र शिकण्यास केव्हा जाणार आहेस’ असे पाहा की, या शास्त्रांनी कामादी षड्रीपूस जिंकले आहे काय?’ हे वाक्य ऐकून बावडेकरांस मोठा पश्चातापच झाला. दुसऱ्या दिवशी त्यांच्याजवळ येऊन बावडेकरांनी श्री स्वामींना सांष्टांग नमस्कार घालून शास्त्रीबुवांबरेाबर जाण्याचा बेत रद्द केला. नंतर श्री समर्थांजवळ राहिले. श्री स्वामींचे पुराणिकावर फार प्रेम होते. त्यामुळे महाराजांनी देह सोडण्यापूर्वी त्यास बार्शी गावी पाठवून दिले होते. कारण हे शरीर पडलेले पाहून त्यास फार दुःख होईल व त्याच्या नित्य ध्यानात विघ्नता येईल. पुढे अंतकाळी श्री समर्थांनी त्यांची खेळणी जवळच्या एका सेवेकऱ्याजवळ देऊन सांगितले, ‘ही खेळणी बावडेकर येथे आल्यावर त्यांना दे.’



श्री स्वामींच्या देहावसानानंतर बावडेकर अक्कलकोटला आले, तेव्हा ती खेळणी त्यांच्या स्वाधीन केली. ती हल्ली बार्शी येथे पुराणिकांचे देवघरात आहेत. असेच पूर्वी एकदा बावडेकर नृसिंहवाडीस गेले होते. तेथे यज्ञ करावयाचा होता. तेव्हा बावडेकरांना टेंबेस्वामींनी सांगितले की, ‘तुमचे गुरू जे अक्कलकोटचे स्वामी ते प्रत्यक्ष दत्तावतार आहेत. अगोदर त्यांची आज्ञा घेऊन या, मग यज्ञ करा.’ यावरून टेंबे स्वामीही श्री समर्थांस दत्तअवतारी मानीत असत.

Comments
Add Comment

Vastu shastra: ही कामे तुम्हाला बनवू शकतात कंगाल, कधीच करू नका

मुंबई: वास्तुशास्त्रानुसार व्यक्तीच्या कर्मावर त्याला त्याचे फळ मिळत असते. काही कामे केल्याने नकारात्मक ऊर्जा

शरीर साक्षात परमेश्वर

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै अनंत कोटी ब्रह्मांड, अनंत रूपे अनंत वेषे अशी परमेश्वराची रूपे आहेत. अनंत कोटी

मंत्र वारीचा

ऋतुराज : ऋतुजा केळकर मंत्र वारीचा संतांच्या पायधूळीतून भिजतो मातीचा जीव... शब्दांच्या ओवाळणीतून गुंफतो भावाचा

स्वामी विवेकानंद : एक थोर युगपुरुष

आत्मज्ञान : प्राची परचुरे वैद्य ज्यांच्या विचारांनी सतत नवी ऊर्जा मिळते असे युवकांचे प्रेरणास्थान व आपल्या

ब्रह्मर्षी भृगू

भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णी महर्षींणा भृगुरहं गिरामस्येकमक्षरम्। गीता अ.१०,२५ भगवद्

महिमा एकादशीचा

मनाचा गाभारा : अर्चना सरोदे एकादश्यां निराहारः स्थित्वाद्याहं परेऽहनि। भोक्ष्यामि