स्वामी दत्त अवतारच आहेत...

विलास खानोलकर


श्रीस्वामींचे ‘अरे, तू शास्त्र शिकण्यास केव्हा जाणार आहेस’ असे पाहा की, या शास्त्रांनी कामादी षड्रीपूस जिंकले आहे काय?’ हे वाक्य ऐकून बावडेकरांस मोठा पश्चातापच झाला. दुसऱ्या दिवशी त्यांच्याजवळ येऊन बावडेकरांनी श्री स्वामींना सांष्टांग नमस्कार घालून शास्त्रीबुवांबरेाबर जाण्याचा बेत रद्द केला. नंतर श्री समर्थांजवळ राहिले. श्री स्वामींचे पुराणिकावर फार प्रेम होते. त्यामुळे महाराजांनी देह सोडण्यापूर्वी त्यास बार्शी गावी पाठवून दिले होते. कारण हे शरीर पडलेले पाहून त्यास फार दुःख होईल व त्याच्या नित्य ध्यानात विघ्नता येईल. पुढे अंतकाळी श्री समर्थांनी त्यांची खेळणी जवळच्या एका सेवेकऱ्याजवळ देऊन सांगितले, ‘ही खेळणी बावडेकर येथे आल्यावर त्यांना दे.’



श्री स्वामींच्या देहावसानानंतर बावडेकर अक्कलकोटला आले, तेव्हा ती खेळणी त्यांच्या स्वाधीन केली. ती हल्ली बार्शी येथे पुराणिकांचे देवघरात आहेत. असेच पूर्वी एकदा बावडेकर नृसिंहवाडीस गेले होते. तेथे यज्ञ करावयाचा होता. तेव्हा बावडेकरांना टेंबेस्वामींनी सांगितले की, ‘तुमचे गुरू जे अक्कलकोटचे स्वामी ते प्रत्यक्ष दत्तावतार आहेत. अगोदर त्यांची आज्ञा घेऊन या, मग यज्ञ करा.’ यावरून टेंबे स्वामीही श्री समर्थांस दत्तअवतारी मानीत असत.

Comments
Add Comment

Ujjain Mahakaleshwar : महाकालच्या भक्तांसाठी खुशखबर ! आता घरबसल्या घ्या भस्म आरतीचं दर्शन

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या श्री महाकालेश्वराच्या दर्शनानं आपल्या आयुष्यातील संकटे आणि

जाणून घ्या चैत्र नवरात्रीत देवीची पूजा, विधी कसे करावेत ? आणि कोणत्या गोष्टी असतात लाभदायक

मुंबई : गुढीपाडवा हा हिंदू पंचांगातील महत्वाचा सण आहे. या सणापासून चैत्र महिन्याला सुरुवात होते. आणि गुडीपाडवा या

एकादशीच्या दिवशी 'या' गोष्टी केल्यास भगवान विष्णू होतील प्रसन्न !

धार्मिक मान्यतेनुसार हिंदू धर्मात एकादशी व्रताचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार या दिवशी मनोभावे पूजा

गुढीपाडवा का साजरा केला जातो? जाणून घ्या गुढीपाडव्याचे महत्त्व, पूजा विधी आणि परंपरा

मुंबई : महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन

कधी आहे पापमोचनी एकादशी ? काय आहे या दिवसाचे महत्त्व ? कशी करावी या दिवशी पूजा ?

मुंबई : हिंदू पंचांगाप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकरावी तिथी म्हणजे एकादशी. हा दिवस

कधी आहे नृसिंह द्वादशी ? त्या दिवशी नेमके काय करावे ?

भगवान विष्णूचा चौथा अवतार म्हणजेच भगवान नृसिंह यांची द्वादशी ही यंदा शुक्रवार २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी दहा