Ghulam Ahmad Mir : “घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलिंडर देणार”, काँग्रेस नेत्याची अजब घोषणा

भाजपाकडून जोरदार टीका


रांची : काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यावर आम्ही सर्व नागरिकांना ४५० रुपयांमध्ये एलपीजी गॅस सिलेंडर देऊ. घुसखोरांनाही त्यात सामावून घेऊ. झारखंडच्या सर्व नागरिकांना सामावून घेऊ, अशी अजब घोषणा (Strange announcement) अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि झारखंड काँग्रेसचे प्रभारी गुलाम अहमद मीर (Ghulam Ahmad Mir) यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.


मीर यांच्या या वक्तव्यानंतर भाजपाने जोरदार टिका केली. हे काँग्रेसचे तुष्टीकरण्याचे आणि ध्रुवीकरणाचे राजकारण आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून अशाच प्रकारचे राजकारण करत आले आहेत, असे भाजपाचा आरोप आहे.


झारखंडमधील बेरमो विधानसभा मतदारसंघातील चंद्रपुरा भागात गुरुवारी काँग्रेसची एक प्रचारफेरी पार पडली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना गुलाम अहमद मीर (Ghulam Ahmad Mir) म्हणाले, आम्ही जनतेला आश्वासन दिले आहे की “जर आमचं सरकार आलश् तर आम्ही १ डिसेंबरपासून सर्वांसाठी ४५० रुपयांमध्ये एलपीजी गॅस सिलेंडर उपलब्ध करून देऊ. ही योजना सामान्य नागरिकांसाठी असेल. तुम्ही हिंदू असा अथवा मुसलमान किंवा घुसखोर… सर्वांना या योजनेचा लाभ मिळेल. झारखंडच्या सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ मिळेल. कोणावरही अन्याय केला जाणार नाही.

Comments
Add Comment

प्लास्टिकवर प्रक्रिया करून तरुण बनला करोडपती

कचऱ्याचे रूपांतरण संपत्तीत दिल्ली : दिल्लीतील एका तरुणाने प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक नवीन

भारताला खुणावतेय रशियन बाजारपेठ

२०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातले

जगभरातील बालमृत्यूच्या घटनांमध्ये भारत दुसऱ्या स्थानी

नवी दिल्ली : जगभरात जवळपास १० लाख मुले पाच वर्षांचे वय गाठण्याआधीच मृत्युमुखी पडली. कुपोषणाशी संबंधित घटक-जसे की

२००९ पासून अमेरिकेतून १८,८२२ भारतीय हद्दपार

मंत्री एस. जयशंकर यांची राज्यसभेत माहिती नवी दिल्ली : अमेरिकेने २००९ पासून एकूण १८,८२२ भारतीय नागरिकांना हद्दपार

अंदमान येथे होणार स्वा. सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण

अंदमान : अंदमान येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रचलेल्या ‘सागरा प्राण तळमळला’ या अजरामर गीताला

‘अयोध्या बस झाँकी है, काशी-मथुरा बाकी है’: योगी आदित्यनाथ

सुट्टीच्या दिवशीही दोन्ही सभागृहांचे कामकाज चालणार नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार (८