Ghulam Ahmad Mir : “घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलिंडर देणार”, काँग्रेस नेत्याची अजब घोषणा

भाजपाकडून जोरदार टीका


रांची : काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यावर आम्ही सर्व नागरिकांना ४५० रुपयांमध्ये एलपीजी गॅस सिलेंडर देऊ. घुसखोरांनाही त्यात सामावून घेऊ. झारखंडच्या सर्व नागरिकांना सामावून घेऊ, अशी अजब घोषणा (Strange announcement) अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि झारखंड काँग्रेसचे प्रभारी गुलाम अहमद मीर (Ghulam Ahmad Mir) यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.


मीर यांच्या या वक्तव्यानंतर भाजपाने जोरदार टिका केली. हे काँग्रेसचे तुष्टीकरण्याचे आणि ध्रुवीकरणाचे राजकारण आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून अशाच प्रकारचे राजकारण करत आले आहेत, असे भाजपाचा आरोप आहे.


झारखंडमधील बेरमो विधानसभा मतदारसंघातील चंद्रपुरा भागात गुरुवारी काँग्रेसची एक प्रचारफेरी पार पडली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना गुलाम अहमद मीर (Ghulam Ahmad Mir) म्हणाले, आम्ही जनतेला आश्वासन दिले आहे की “जर आमचं सरकार आलश् तर आम्ही १ डिसेंबरपासून सर्वांसाठी ४५० रुपयांमध्ये एलपीजी गॅस सिलेंडर उपलब्ध करून देऊ. ही योजना सामान्य नागरिकांसाठी असेल. तुम्ही हिंदू असा अथवा मुसलमान किंवा घुसखोर… सर्वांना या योजनेचा लाभ मिळेल. झारखंडच्या सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ मिळेल. कोणावरही अन्याय केला जाणार नाही.

Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या