Varsha Usgoankar : मातृभाषा बोलता न येणाऱ्यांना अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी सुनावले खडे बोल!

सिंधुदुर्ग: अनेकांना मातृभाषेत बोलायला जमत नाही व मातृभाषेत बोलता येत नाही मातृभाषेचा अभिमान असायला हवा असं थेट संदेश देत याबद्दल ते सॉरी म्हणतात यावरून मराठी सिने इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgoankar) यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करत मातृभाषा न येणाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.


गोव्यातील एका कार्यक्रमात वर्षा उसगांवकर बोलत होत्या. आपल्याला मातृभाषेचा अभिमान आहे असं त्यांनी त्यावेळी सांगितलं आणि ती बोलण्यासाठी मला सराव करण्याची गरजच नाही माझी मातृभाषा गोवन कोकणी आहे ही बोलण्यासाठी मला सराव करण्याची गरजच पडत नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. गोवामधील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.




या सर्व लोकांचं मला आश्चर्य वाटतं


माझी मातृभाषा गोवन कोकणी असून ती भाषा माझे अस्तित्व आहे ती जन्मदात्री आहे तिने मला शिकवलं 'ती मी कशी विसरू शकता' असं कोकणी भाषेत थेट सवाल करत जे काही थोडी लोक म्हणतात जसे की सॉरी हा मला कोकणी तितकं येत नाही...सॉरी हा मला मराठी इतकं येत नाही.... या सर्वच लोकांचं मला आश्चर्य वाटतं. अरे जी मातृभाषा तुमची ती तुम्हाला येत नाही आणि तुम्ही कोणाची दिलगिर मागता तुमची मातृभाषा तुम्हाला अवगत नाही तुम्ही काय अमेरिकेत वाढलात का असा खडा सवालचं करत ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी उपस्थित करत लोकांचे कान टोचले आहेत.




मातृभाषेचा अभिमान बाळगत ती आपली जन्मभाषा आहे, ती कोणी शिकवण्याची गरज नसते असं सांगत गोवा या त्यांच्या मातृभाषा असलेल्या कोकणीतूनच वर्षा उसगावकर यांनी मातृभाषेबद्दल असलेले प्रेम व त्यांचा अभिमान हा या कार्यक्रमातून अधोरेखित केला आहे. ज्या मातृभाषेत तुम्ही जन्माला आलात ती तुमची जन्मदात्री ती तुम्हाला आलीच पाहिजे त्यासाठी सरावची गरज नाही अशा स्वरूपाचा संदेश देत अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgoankar) यांनी मातृभाषा बोलता न येणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवला आहे.







Comments
Add Comment

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी

तरुणांना नवोन्मेषाचे निर्माते बनवण्यासाठी दिल्लीत 'युवा-एआय' स्पर्धा

विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी यूजीसीकडून सर्व विद्यापीठांना पत्र… ८५ लाखांची बक्षिसं! मुंबई  : भारतातील

संरक्षण दलाच्या तिन्ही दलांसाठी ७९ हजार कोटी

नवी दिल्ली  : भारताच्या तिन्ही सैन्य दलांना अधिक शक्तिशाली आणि आधुनिक बनवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक मोठा

अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान मोदी फडकवणार धर्म ध्वज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत प्रमुख पाहुणे अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या

तब्बल ५ हजार ५०० किलो वजनाची सोन्याची बुद्ध मूर्ती!

बुद्धांचे अनुयायी जगभरात अब्जावधींच्या संख्येने आहेत, जे अनेक देशांमध्ये पसरलेले आहेत. भगवान बुद्धांना भगवान