IND Vs SA : आज तिसऱ्या टी-२०मध्ये भारताची परीक्षा

मुंबई: टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ(IND Vs SA )यांच्यात ४ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. सुरूवातीच्या दोन्ही सामन्यानंतर मालिका १-१ अशा बरोबरीत आहे. तर तिसरा सामना आज १३ नोव्हेंबरला सेंच्युरियनमध्ये खेळवला जाणार आहे.


हे मैदान भारतासाठी अनलकी ठरले आहे. अशातच संघासाठी येथील रेकॉर्ड धोक्याची घंटा ठरू शकतात. या मैदानावर भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हेनरिक क्लासेनपासून वाचून राहिले पाहिजे.



सेंच्युरियनमध्ये भारताचे अपयश


खरंतर, भारतीय संघाने सेंच्युरियनच्या मैदानावर केवळ एक टी-२० सामना खेळला आहे. २१ फेब्रुवारी २०१८मध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारताला आफ्रिकेकडून ६ विकेटनी पराभव सहन करावा लागला होता. क्लासेनला त्या वेळेस प्लेयर ऑफ द मॅच निवडण्यात आले होते.



क्लासेनची जबरदस्त खेळी


त्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने ४ बाद १८८ धावा केल्या होत्या. मनीष पांडेने ४८ बॉलमध्ये ७९ धावांची खेळी केली होती. तर महेंद्रसिंग धोनीने २८ बॉलमध्ये ५२ धावा ठोकल्या होत्या. प्रत्युत्तरात आफ्रिकेच्या संघाने १८.४ षटकांत ४ विकेट गमावत सामना जिंकला होता.

Comments
Add Comment

शुभमन गिलच्या तब्येतीमध्ये सुधारणा, मात्र दुसरा कसोटी सामना खेळणार का?

कोलकाता: कोलकातामधील ईडन गार्डन्सवर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय

गुवाहाटीत पहिल्यांदाच होणार कसोटी सामना! दक्षिण आफ्रिकेच्या पराभवासाठी काय असणार भारताची रणनीती ?

गुहावटी: भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्कारावी लागली. फिरकीपटूंसाठी फायदेशीर

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे