IND Vs SA : आज तिसऱ्या टी-२०मध्ये भारताची परीक्षा

  41

मुंबई: टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ(IND Vs SA )यांच्यात ४ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. सुरूवातीच्या दोन्ही सामन्यानंतर मालिका १-१ अशा बरोबरीत आहे. तर तिसरा सामना आज १३ नोव्हेंबरला सेंच्युरियनमध्ये खेळवला जाणार आहे.


हे मैदान भारतासाठी अनलकी ठरले आहे. अशातच संघासाठी येथील रेकॉर्ड धोक्याची घंटा ठरू शकतात. या मैदानावर भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हेनरिक क्लासेनपासून वाचून राहिले पाहिजे.



सेंच्युरियनमध्ये भारताचे अपयश


खरंतर, भारतीय संघाने सेंच्युरियनच्या मैदानावर केवळ एक टी-२० सामना खेळला आहे. २१ फेब्रुवारी २०१८मध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारताला आफ्रिकेकडून ६ विकेटनी पराभव सहन करावा लागला होता. क्लासेनला त्या वेळेस प्लेयर ऑफ द मॅच निवडण्यात आले होते.



क्लासेनची जबरदस्त खेळी


त्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने ४ बाद १८८ धावा केल्या होत्या. मनीष पांडेने ४८ बॉलमध्ये ७९ धावांची खेळी केली होती. तर महेंद्रसिंग धोनीने २८ बॉलमध्ये ५२ धावा ठोकल्या होत्या. प्रत्युत्तरात आफ्रिकेच्या संघाने १८.४ षटकांत ४ विकेट गमावत सामना जिंकला होता.

Comments
Add Comment

R Ashwin IPL Retirement: आर. अश्विनने आयपीएलला दिला निरोप! म्हटले "प्रत्येक शेवट ही एक..."

चेन्नई: भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण

मिस्टर ३६०' एबी डिव्हिलियर्सचे आरसीबीमध्ये पुनरागमनाचे संकेत, पण नव्या भूमिकेत!

बंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाचा लाडका खेळाडू, 'मिस्टर ३६०'

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये