Pomegranate: हिवाळ्यात जरूर खा डाळिंब, होतील जबरदस्त फायदे

  83

मुंबई: डाळिंब(Pomegranate) फळाला गुणांचा खजिना म्हटले जाते. हे खाण्यासाठी चांगले लागतेच मात्र त्यासोबतच त्याचे आरोग्यासही अनेक फायदे होतात. दररोज डाळिंबाचे सेवन केल्याने तुमच्या शरीराला अनेक आजारांपासून वाचवता येते आणि ते निरोगी राहते.


डाळिंबामध्ये फ्लेव्होनॉइड्स, फिनोलिक्स, व्हिटॅमिन सी, फायबर, लोह, पोटॅशियम, झिंक आणि ओमेगा -६ फॅटी ॲसिड हे पोषक घटक असतात, ज्यामुळे ते एक सुपरफूड बनते.


गर्भवती महिलांना डाळिंब खूप फायदेशीर मानले जाते. यामधील अँटिऑक्सिडेंट प्लेसेंटाचे संरक्षण करतात आणि मुलाच्या आरोग्यासाठी देखील चांगले असतात.


ज्या लोकांमध्ये लोहाची कमतरता आहे त्यांच्यासाठी डाळिंब हा चांगला पर्याय आहे. डाळिंबाच्या बियांमध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते, जे शरीरातील अशक्तपणा दूर करण्यास मदत करते.


हृदयविकारांपासून बचाव करण्यासाठीही डाळिंब खूप उपयुक्त आहे. त्यात अँटीहाइपरटेन्सिव्ह आणि अँटीएथेरोजेनिक गुणधर्म आढळतात, जे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि रक्तवाहिन्यांमध्ये साचलेला प्लेक कमी करण्यास मदत करतात.


डाळिंबात(Pomegranate) व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते.

Comments
Add Comment

Rakshabandhan: यंदाच्या रक्षाबंधनाला द्या चॉकलेटी टच, बनवा हे घरगुती केक आणि ब्राऊनी

मुंबई: रक्षाबंधन २०२५ जवळ येत असताना, मिठाई आणि गोड पदार्थांची तयारी सुरू झाली आहे. यावर्षी तुम्ही तुमच्या

Health: रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

मुंबई: ओवा हा भारतीय स्वयंपाकघरात वापरला जाणारा एक सामान्य मसाला आहे, पण त्याचे आरोग्यदायी फायदे खूप मोठे आहेत.

Health: त्वचेसाठी वरदान आहे आवळा, दररोज खाल्ल्याने मिळतील हे फायदे

मुंबई : आवळा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. 'सुपरफूड' म्हणून ओळखला जाणारा आवळा केवळ शरीरातील विविध

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे