Gautam Gambhir : ऑस्ट्रेलियाला पोहोचण्याआधी गौतम गंभीरचे मोठे विधान, कांगारू संघाला दिली वॉर्निंग

  37

मुंबई: पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होण्याआधी भारतीय संघाचे हेड कोच गौतम गंभीरने(Gautam Gambhir) सोमवारी पत्रकार परिषद घेतली. कोच गंभीरने या पत्रकार परिषदेत आपल्या स्वभावानुसार तिखट प्रहार केले. त्यांनी ऑस्ट्रेलिया संघाला इशाराही दिला की भारतीय संघ पहिल्या बॉलपासून आक्रमण करेल.


गंभीरच्या मते भारतीय संघ पहिल्या कसोटी सामन्यात संपूर्ण तयारिनीशी उतरणार आहे. मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरला पर्थच्या मैदानावर असणार आहे. गंभीरने पत्रकार परिषदेत सांगितले, जेव्हा तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये खेळता तेव्हा सगळ्यात मोठे आव्हान तेथील वातावरण असते. १० दिवसांत आम्ही चांगली तयारी करू.



कोच पुढे म्हणाले, आम्ही एका चांगल्या स्थितीत असू. आम्ही अनेकदा ऑस्ट्रेलियाला गेलो आहोत आणि २२ तारखेला पूर्ण तयार असू. पहिल्या बॉलपासून आक्रमण करू.


रोहितच्या फॉर्मबाबत गंभीर(Gautam Gambhir) म्हणाले, मी कोहली अथवा रोहितबाबत चिंतित नाही. आमचे खेळाडू दमदार कामगिरीसाठी सज्ज आहेत. ही बाब गेल्या मालिकेत सिद्ध झाली आहे.

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी