Gautam Gambhir : ऑस्ट्रेलियाला पोहोचण्याआधी गौतम गंभीरचे मोठे विधान, कांगारू संघाला दिली वॉर्निंग

  43

मुंबई: पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होण्याआधी भारतीय संघाचे हेड कोच गौतम गंभीरने(Gautam Gambhir) सोमवारी पत्रकार परिषद घेतली. कोच गंभीरने या पत्रकार परिषदेत आपल्या स्वभावानुसार तिखट प्रहार केले. त्यांनी ऑस्ट्रेलिया संघाला इशाराही दिला की भारतीय संघ पहिल्या बॉलपासून आक्रमण करेल.


गंभीरच्या मते भारतीय संघ पहिल्या कसोटी सामन्यात संपूर्ण तयारिनीशी उतरणार आहे. मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरला पर्थच्या मैदानावर असणार आहे. गंभीरने पत्रकार परिषदेत सांगितले, जेव्हा तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये खेळता तेव्हा सगळ्यात मोठे आव्हान तेथील वातावरण असते. १० दिवसांत आम्ही चांगली तयारी करू.



कोच पुढे म्हणाले, आम्ही एका चांगल्या स्थितीत असू. आम्ही अनेकदा ऑस्ट्रेलियाला गेलो आहोत आणि २२ तारखेला पूर्ण तयार असू. पहिल्या बॉलपासून आक्रमण करू.


रोहितच्या फॉर्मबाबत गंभीर(Gautam Gambhir) म्हणाले, मी कोहली अथवा रोहितबाबत चिंतित नाही. आमचे खेळाडू दमदार कामगिरीसाठी सज्ज आहेत. ही बाब गेल्या मालिकेत सिद्ध झाली आहे.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार