Piyush Goyal : भाजपाचे संकल्पपत्र ही २०२९पर्यंत राज्याच्या वेगवान विकासाची हमी

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन


महायुतीचीच सत्ता येणार; महाविनाश आघाडीला जनता धडा शिकवेल


मुंबई : भारतीय जनता पार्टीचे संकल्पपत्र हे २०२९पर्यंत राज्य विकासाची व्यापक दृष्टी आणि त्या दिशेने वेगाने कृती करण्याची खात्री देणारे आहे. महायुती सरकार कोणत्याही भेदभावाशिवाय सर्वांच्या विकासासाठी कार्यरत आहे.राज्यातील जनतेचे जीवन उज्वल आणि सुकर व्हावे यासाठी महायुती सरकार काम करत आहे. विकसित महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकारच हवे असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले.


भाजपा मीडिया सेंटरमधील या पत्रकार परिषदेला राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. सय्यद जफर इस्लाम, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते. जनतेच्या मनात कायम भ्रम निर्माण करून आपले राजकीय हित साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाविनाश आघाडीचा पराभव निश्चित असून विधानसभा निवडणुकीत जनता आघाडीला धडा शिकवेल आणि महायुतीचेच सरकार सत्तेवर आणेल, असा विश्वास ही त्यांनी (Piyush Goyal) व्यक्त केला.



गोयल म्हणाले की, केंद्रातील एनडीए सरकारच्या साथीने महायुती सरकार तिप्पट वेगाने प्रगती करून तिप्पट परिणाम साध्य करत आहे. जनता त्याचा अनुभव घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशाला नव्या उर्जेसोबत विकासाचे नवे पंखही दिले आहेत. समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत केंद्र आणि राज्यातील सरकारच्या जनकल्याणाच्या योजनांचे लाभ पोहोचवण्यासाठी आमचे सरकार तत्पर आहे. तर दिलेले कोणतेही आश्वासन न पाळणा-या महाविनाश आघाडीने दिलेल्या वचनांवर जनतेचा आता काडीमात्र ही विश्वास नाही. काँग्रेसने त्यांची सत्ता असलेल्या राज्यांमधील शेतकरी, युवावर्गाची दिशाभूल करून एकाही आश्वासनाची पूर्तता न करता निव्वळ फसवणूक केली आहे याची ही आठवण त्यांनी (Piyush Goyal) करून दिली.


महाविनाश आघाडीचा पराभव निश्चित असून महायुतीचे भवितव्य उज्ज्वल आहे असेही त्यांनी नमूद केले. उद्धव ठाकरेंना लक्ष्य करत श्री. गोयल यांनी मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपायी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या विचारांना मूठमाती दिली अशी बोचरी टीका केली. उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल दोन वाक्ये वदवून घ्यावीत. ते त्यांना अजिबात जमणार नाही. त्यामुळे महाभकास आघाडीत त्यांचे काहीच चालत नाही, हेही स्पष्ट झाल्याचे गोयल यांनी सांगितले. देशातील १४० कोटी जनतेच्या एकत्रित विकासाची चिंता केली तरच हा देश सुरक्षित राहील,अशी नरेंद्र मोदी यांची धारणा आहे. धर्म,जात,भाषा आणि प्रांतानुसार होणारी वाटणी आम्हाला मान्य नाही. आम्ही सर्वांनाच एकत्र घेऊन वाटचाल करत असल्याने आम्हाला सर्वांचीच साथ असल्याचे गोयल (Piyush Goyal) यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

CYBER CRIME : सावधान! व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने गंडा; नवी मुंबईतील व्यावसायिकाची १ कोटी ९ लाखांची फसवणूक

NAVI MUMBAI : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली सध्या फसवणुकीचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. नवी मुंबईत शेअर बाजारात

Mumbai Crime : मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये संतापजनक प्रकार, तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास अटक

मुंबईतून (Mumbai) एक संतापजनक घटना समोर आली आहे. मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करताना एका तरुणीचा विनयभंग (Molestation)

BANDRA GARIB NAGAR : वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाला मिळणार मुंबई सेंट्रल टर्मिनसचे स्वरूप; प्रवाशांसाठी मोठा दिलासा

MUMBAI : वांद्रे पूर्व येथील रेल्वे स्थानकाबाहेरील गरीब नगर परिसरातील मोठ्या पाडकाम मोहिमेनंतर आता पश्चिम रेल्वेने

MUMBAI WEATHER : मुंबई हवामान अपडेट: मान्सूनची चाहूल, शहरात पावसाची शक्यता

MUMBAI : मान्सूनच्या आगमनासोबतच मुंबई आणि परिसरात हवामानात बदल जाणवू लागला आहे. आज, ७ जून रोजी शहरात आकाश अंशतः ढगाळ

Mumbai News : वरळीतील लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू; ड्रग्ज अँगलने पोलिसांचा तपास

मुंबईतील वरळी (Worli) परिसरातील NSCI डोम येथे आयोजित करण्यात आलेल्या एका लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टदरम्यान एका

WhatsApp New Feature : WhatsApp चं नवं View-Once Text Feature! मेसेज वाचताच कायमचा गायब होणार

मुंबई : WhatsApp आपल्या युजर्ससाठी (User) आणखी एक भन्नाट प्रायव्हसी फीचर (Privacy Feature) आणण्याच्या तयारीत आहे. हे फीचर टेक्स्ट