कापसाच्या कवडीमोल भावामुळे शेतकरी हवालदिल

अमरावती: कापसाचे उत्पादन यंदा समाधानकारक असले तरी हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्यामुळे शेतकरी रडकुंडीला आला आहे. शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली आहे. भाव वाढतील या आशेवर शेतकरी आहेत; परंतु काही गरीब शेतकऱ्यांना पैशांची गरज असल्यामुळे नाइलाजास्तव कापूस विकावा लागत आहे. भाऊबीजेला बहीण आलेली असताना या पांढऱ्या सोन्याची साठवणूक कुठवर शक्य आहे, असा त्यांचा सवाल आहे. दिवाळीच्या निमित्ताने कापसाची खासगी बाजारपेठेत आवक वाढली आहे. कापूस खरेदीसाठी व्यापाऱ्यांचीही ग्रामीण भागात लगबग दिसून येत आहे. व्यापारी शेतकऱ्यांना मनमानी भावात कापूस मागतो व शेतकऱ्याला देण्यास भाग पाडतो, असा आता शिरस्ता झाला आहे. केंद्राकडून जाहीर झालेला कापसाचा हमीभाव सात हजारांच्या वर आहे. मात्र, खासगी बाजारपेठेत कापसाचे दर नीचांकीवर आहेत.


खासगी व्यापारी कापसाला ६५०० ते ६९०० रुपये प्रतिक्विंटल भाव देत आहेत. केंद्र सरकारने २०२४-२५ साठी कापसाच्या हमीभावात ५०१ रुपयांची वाढ केली. चालू हंगामात मध्यम धाग्याच्या कापसासाठी ७१२१ रुपये आणि लांब धाग्याच्या कापसासाठी ७५२१ रुपये हमीभाव जाहीर केला; परंतु व्यापारी त्यापेक्षा कमी दर देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. हमीभावापेक्षा कमी दराने कापूस विकावा लागत आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय वायदे बाजारात कापसाचे दर वाढले आहेत. वायदे बाजारात मागील आठवड्यात ७२.३४ सेंट प्रति पाउंडवर कापसाचे दर होते. ते आता ७२.६९ सेंट प्रति पाउंडवर गेले. त्यामुळे देशातील बाजारपेठेतही कापसाचे दर वाढणार आहेत. कापसाचे पीक समाधानकारक होईल व कापसाला चांगला भाव मिळेल, अशी होती.


यासंदर्भात कापूस उत्पादक शेतकरी प्रदीप बंड यांनी सांगितले की, कापूस वेचण्याकरिता मजुरी १०-१२ रुपये प्रतिकिलो या लागली. त्यामुळे एक क्चिटल हजार ते बाराशे रुपये खर्च अत्ताच येतो. तो देण्याकरिता कापूस गावातील व्यापारालाच विकावा लागत आहे.मागच्या वर्ष ही अशीच परिस्थिति होती आणि या वर्ष ही अशीच परिस्थिति आहे.
Comments
Add Comment

MPSC Nipun Setu : एमपीएससीच्या अंतिम निवडीत हुकलेल्या उमेदवारांना 'निपुण सेतू'द्वारे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध स्पर्धा परीक्षांच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचूनही अंतिम

Devendra Fadnavis : नीट' परीक्षेच्या नियोजनाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई : गेल्या महिन्यात झालेल्या पेपरफुटीच्या गंभीर प्रकरणामुळे 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी'ने (एनटीए) रद्द केलेली

Jalna : पोलीस भरती होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं, सराव जीवावर बेतला

जालना : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. लहानपणापासून एकचं

Crime News : रात्री वडिलांनी चापट मारली, घरात सकाळी भयानक दृश्य समोर आलं, मॅकेनिकल इंजिनिअर मुलाचं वडिलांसोबत भयंकर कृत्य

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लहान भावाला जास्त जीव लावला जातो, हा राग मनात

वसतिगृहाच्या टेरेसवर झोपलेल्या विद्यार्थ्याचा खून, पोलिसांकडून तपास सुरु

पुणे : पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोनवडी येथील

Transport Minister Pratap Sarnaik : एसटीची स्थानके आणि बसेसची दर चार तासांनी स्वच्छता होणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; जागतिक पर्यावरण दिनी राज्यव्यापी आधुनिक स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ मुंबई :