विक्रोळीत व्हॅनमधून साडे सहा टन चांदीच्या विटा जप्त

मुंबई : विक्रोळी परिसरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने साडेसहा टन चांदीच्या विटा असलेली व्हॅन जप्त केली आहे. मुलुंडमधील एका गोदामात चांदीच्या विटा नेण्यासाठी ब्रिंक्स या कंपनीच्या गाडीतून त्या नेल्या जात होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मालवाहतूक अधिकृत असल्याचे दिसून येत आहे. तरीही, निवडणूक आयोग, आयकर विभाग आणि पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


मुंबई आणि महाराष्ट्रात निवडणुकीच्या काळात अनेक ठिकाणी बेहिशेबी रोकड किंवा मौल्यवान वस्तू सापडल्याच्या घटना वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईतील भुलेश्वरमध्ये देखील सुमारे १ कोटी ३२ लाख रुपयांची रोकड सापडली होती. या प्रकरणात पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चौकशी करण्यात आली होती. तसेच, पुण्यातही पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोकड जप्त केली होती.


विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर पोलिसांनी सर्वत्र बंदोबस्त कडक केला आहे, या आधीही, मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील खेड-शिवापूर टोल प्लाझाजवळ झालेल्या नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी बेहिशेबी रोकड जप्त केली होती. या कारमधील प्रवाशांना अटक करण्यात आली होती आणि त्यांची चौकशी करण्यात आली.

Comments
Add Comment

वाढत्या बेकायदा घुसखोरांमुळे चौफेर सामाजिक संकटांचा धोका - नामवंत तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त

मुंबई  : तीन शेजारी देशांमधून भारतात घुसणाऱ्या असंख्य बेकायदा स्थलांतरितांमुळे भारताची सुरक्षा आणि विकास हे

Nitesh Rane : नालासोपारा मध्ये मंत्री नितेश राणे यांच्या प्रचार सभांचा झंझावात!

नालासोपारा : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील

भुयारी मेट्रो मार्गिकेमध्ये नेटवर्कची गैरसोय कायम !

तोडगा काढण्यात एमएमआरसीएल ढिम्म मुंबई : आरे ते कफ परेड या मेट्रो-३ भुयारी मेट्रोच्या संपूर्ण मार्गिकेमध्ये

मुंबईत २२ वर्षांत कुठे आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग

इमारतींना ओसी, पण प्रत्यक्षात सत्ताकाळात उबाठाला अंमलबजावणी करण्यात अपयश उबाठ- मनसेचा वचननामा, आमचा

दोन माजी बेस्ट समिती अध्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या बेस्ट समितीचे अध्यक्षपद भूषवलेले दोन माजी नगरसेवक यंदा पालिका निवडणुकीच्या रिंगणात

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी २४ तास टोल-फ्री समुपदेशन!

मुंबई (प्रतिनिधी) : सीबीएसईने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य मानसिक व सामाजिक समुपदेशन सेवा सुरू