विक्रोळीत व्हॅनमधून साडे सहा टन चांदीच्या विटा जप्त

  85

मुंबई : विक्रोळी परिसरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने साडेसहा टन चांदीच्या विटा असलेली व्हॅन जप्त केली आहे. मुलुंडमधील एका गोदामात चांदीच्या विटा नेण्यासाठी ब्रिंक्स या कंपनीच्या गाडीतून त्या नेल्या जात होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मालवाहतूक अधिकृत असल्याचे दिसून येत आहे. तरीही, निवडणूक आयोग, आयकर विभाग आणि पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


मुंबई आणि महाराष्ट्रात निवडणुकीच्या काळात अनेक ठिकाणी बेहिशेबी रोकड किंवा मौल्यवान वस्तू सापडल्याच्या घटना वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईतील भुलेश्वरमध्ये देखील सुमारे १ कोटी ३२ लाख रुपयांची रोकड सापडली होती. या प्रकरणात पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चौकशी करण्यात आली होती. तसेच, पुण्यातही पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोकड जप्त केली होती.


विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर पोलिसांनी सर्वत्र बंदोबस्त कडक केला आहे, या आधीही, मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील खेड-शिवापूर टोल प्लाझाजवळ झालेल्या नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी बेहिशेबी रोकड जप्त केली होती. या कारमधील प्रवाशांना अटक करण्यात आली होती आणि त्यांची चौकशी करण्यात आली.

Comments
Add Comment

सौर पंप शक्य नसल्यास पारंपरिक कृषी पंप देणार

भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार मुंबई : राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर भर दिला आहे.

वाहतूकदारांच्या संपात ७० हजार वाहने सहभागी

नागरिकांसह आयात-निर्यातदारांना संपाचा मोठा फटका मुंबई : ई-चलन व वाहतूकदारावर लाभलेल्या इतर अनेक अन्यायकारक

मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतरखान्यांमुळे श्वसन तसेच फुफ्फुसांचे आजार वाढले असून यात काही रहिवाशांचा

Nitesh Rane : “पिक्चर अभी बाकी हैं”, ‘तुम्हाला सांगून ठेवलेली उत्तर रेकॉर्ड करुन’ नंतर एकत्र…मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल

मुंबई : दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई

आरोग्यास अपायकारक तरीही मुंबई महापालिकेच्या हद्दीत ५१ कबुतरखाने पुन्हा सुरू

मनपाने मुंबईतील कबूतरखान्यांबाबत विशेष अभियान राबवावे – मंत्री उदय सामंत मुंबई : सध्या मुंबई महापालिकेच्या

शक्तीपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी : मंत्री नितेश राणे

मुंबई : शक्तीपीठ महामार्ग हा लोकांच्या विकासासाठी आहे. या प्रकल्पासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी मी पालकमंत्री