राजकीय जाहिरातींच्या फोन कॉलमुळे मतदारांची वाढली डोकेदुखी!

अनोळखी मोबाईल क्रमांकावरून राजकीय पक्षांचा प्रचार


ठाणे: मोबाईलवर येणाऱ्या अनोळखी जाहिरातींच्या फोन कॉलमुळे अगोदरच सर्वजण वैतागले असताना, आता निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राजकीय पक्ष मोबाईलवर जाहिराती करून मतदाराला वेठीस धरत आहेत. फोनद्वारे राजकीय जाहिरातीतून मतदाराला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असून, मात्र अचानक येणाऱ्या अनोळखी फोन वरील राजकीय जाहिरातींमुळे सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. महाराष्ट्रात (२० नोव्हेंबर रोजी) विधानसभा निवडणुकीचे मतदान आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मतदाराला आपलंसं करण्याच्या दृष्टीने सर्वच स्तरातून प्रयत्न केला जातो आहे. आपल्या पक्षाचे काम किती चांगले आहे हे सांगण्यासाठी पक्षाचे दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत. ठिकठिकाणी त्यांच्या मोठ्या सभा देखील पार पडत आहेत. सोबतच सोशल मीडियाचा वापर करून राजकीय जाहिरातींच्या माध्यमातून जास्तीत-जास्त लोकांपर्यंत आपल्याच पक्षाला मतदान करण्यासाठी गरळ ओकली जात आहे. मात्र मोबाईल फोनवर राजकीय जाहिरातीची स्पर्धा बघायला मिळते आहे.


आत्ताच्या तरुण पिढीला सोशल मीडियाच महत्त्व समजत असले तरी, ज्येष्ठ व्यक्ती अथवा दुर्गम आदिवासी भागात मोबाईल नेटवर्क उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेकांकडे कॉलिंग करण्यासाठीचा मोबाईल असतो. शहर ग्रामीण भागात मोबाईलवर फोन आलाच, तर पटकन उचलला जातो. त्यामुळे मोबाईल कॉलवर राजकीय जाहिराती केंद्रित केल्या आहेत. मोबाईलवर येणारा कॉल महत्वाचा मानून प्रत्येकजण उचलत असतो. मात्र राजकीय जाहिरातींच्या कॉलमुळे सर्वजण मेटाकुटीला आले आहेत. मोबाईलवर अनोळखी नंबरचा कॉल आला तरी अनेक जण उचलतात. खूप बिझी असल्यास कट करून थोडा वेळाने या क्रमांकावर फोन करतात. मात्र राजकीय पक्षाची कॅसेट या कॉल सुरू आहेत. आमचा पक्ष किती चांगला काम करतो आहे असे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न राजकीय पक्ष करताना दिसतात. अशा अनोळखी मोबाईल क्रमांकावर फोन करायचा झाल्यास हा फोन अस्तित्वात नाही असे सांगितले जाते.

Comments
Add Comment

Big Boss Marathi : कठीण परिस्थितीची आठवण आजही मनात; करण सोनावणे म्हणतो, ‘त्या अनुभवांनी मला घडवलं’

मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून, घरातील

BMC Election Results : २२७ वॉर्डांचे निकाल एकाच वेळी नाहीत, टप्प्याटप्प्याने मतमोजणी

मुंबई : राज्यभरात महापालिका निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले असून, मुंबई महापालिकेच्या (BMC) निकालांकडे संपूर्ण

मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मक मुंबई :  भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन

आर्मर सिक्युरिटी इंडिया आयपीओला पहिल्या दिवशी थंड प्रतिसाद! दुपारपर्यंत केवळ ०.०३ पटीने मिळाले सबस्क्रिप्शन

मोहित सोमण: आजपासून आर्मर सिक्युरिटी इंडिया लिमिटेड (Armour Security India Limited) कंपनीचा आयपीओ (IPO) बाजारात गुंतवणूकदारांसाठी

वर्षभरात १ लाख व्हिसा रद्द; नियम मोडणाऱ्यांना दणका

८ हजार भारतीय विद्यार्थ्यांवरही टांगती तलवार नवी दिल्ली : अमेरिकेला अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि बेकायदेशीर

कॅनडात १४० कोटींच्या सोन्याची चोरी

मास्टरमाईंड भारतात लपल्याचा दावा टोरंटो : टोरंटो पिअरसन आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या २ कोटी कॅनेडियन