भारत जागतिक महासत्तांच्या यादीत हवा

नवी दिल्ली: “इतर कुठल्याही देशापेक्षा भारताची अर्थव्यवस्था जलद गतीने वाढत असून, जागतिक महासत्तांच्या यादीमध्ये समावेश करण्यास भारत पात्र आहे”, असे प्रतिपादन रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केले. सोची येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, “रशिया भारताशी सर्व बाजूंनी संबंध दृढ करीत आहे आणि दोन्ही देशांमध्ये कमालीचा विश्वास आहे. जगात भारताची लोकसंख्या सर्वाधिक आहे. त्यात दर वर्षी एक कोटींनी वाढ होत आहे. अब्जाहून अधिक लोकसंख्या आणि वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, प्राचीन संस्कृती आणि आश्वासक भविष्य पाहता महासत्तांच्या यादीत भारताचा समावेश निःसंशय व्हायला हवा”.


पुतिन म्हणाले की, “भारत हा गेल्या अनेक दशकांपासून आमचा मित्र आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमधला भागीदार राहिला आहे. तब्बल दीड अब्ज लोकसंख्या असलेल्या या देशाचा विकास दरही वेगवान आहे. त्यांच्याकडे प्राचीन संस्कृती आहे. त्याचबरोबर विकासाची मोठी क्षमता देखील आहे”. “भारत एक महान देश आहे. या महान देशाशी आपले अनेक दशकांपासून उत्तम संबंध आहेत. मॉस्को व नवी दिल्ली विविध क्षेत्रांमध्ये भागीदार आहेत आणि ही भागीदारी दिवसेंदिवस वाढवत आहोत. भारताचा जीडीपी ७.४ टक्क्यांनी वाढतोय. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आमचे सहकार्य वाढत आहे. भारताच्या स्वातंत्र्यालढ्यापासून उभय देशांमध्ये गुणवत्ता, विश्वास व सहकार्यामुळे अद्वितीय संबंध निर्माण झाले. या दोन देशांमधील द्विपक्षीय व्यापार हा तब्बल ६० अब्ज डॉलर्सचा आहे”.


दोन आठवड्यांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाच्या दौऱ्यावर गेले होते. रशियातील कझान शहरात पार पडलेल्या १६ व्या ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेत ते सहभागी झाले होते. त्यावेळी व्लादिमीर पुतिन यांनी रशिया आणि भारत या दोन्ही देशातील घनिष्ठ संबंधांबाबत भाष्य केले.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव