भारताविरुद्ध विजय मिळवताना आफ्रिकेची दमछाक, मालिकेत गाठली बरोबरी

मुंबई: भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची चांगलीच दमछाक झाली. भारताने विजयासाठी छोटेसे आव्हान दिले होते. मात्र तेही पूर्ण करता करता आफ्रिकेच्या नाकीनऊ आले.

भारताने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ६ बाद १२४ धावा केल्या होत्या. त्यानंतर आफ्रिकेला विजयासाठी १२५ धावा हव्या होत्या. अखेरीस शेवट्च्या फळीतील फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत आफ्रिकेला हा विजय मिळवून दिला आणि बरोबरी गाठून दिली.

चार सामन्यांच्या मालिकेत आता भारत आणि दक्षिण आफ्रिका १-१ अशा बरोबरीत पोहोचले आहेत. आफ्रिकेकडून ट्रिस्टन स्टर्ब्सने सर्वाधिक नाबाद ४७ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
Comments
Add Comment

हरमनप्रीत कौर आणि तो ऐतिहासिक विक्रम: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी 'त्या' १७१ धावांची चर्चा!

नवी दिल्ली : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या

WC Semi-Final: पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचली दक्षिण आफ्रिका, इंग्लंडला १२५ धावांनी हरवले

मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ मध्ये मोठा उलटफेर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी२० सामना पावसामुळे रद्द : दुसरा सामना ३१ ऑक्टोबरला!

ऑस्ट्रेलिया : मनुका ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणारा पहिला टी२० सामना अखेर सततच्या

टी२० मध्ये पुन्हा पावसाचे विघ्न: २० ऐवजी १८ षटकांचा सामना !

कॅनबेरा : कॅनबेरातील मनुका ओव्हल स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत–ऑस्ट्रेलिया पहिल्या टी२० सामन्यात पुन्हा एकदा

भारताला मोठा धक्का: दुखापतीमुळे नितीश कुमार रेड्डी तीन T20 सामन्यांमधून बाहेर!

कॅनबेरा : भारतीय क्रिकेट संघासाठी धोक्याची घंटा वाजवणारी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने बुधवारी दिलेल्या

७ महिन्यांच्या गर्भवती सोनिकाने जिंकले वेटलिफ्टिंग स्पर्धेत कांस्य पदक

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नाही, फक्त जिद्द असायला हवी. दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे खरे