Narayan Rane : आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना गोळ्या घातल्या असत्या!

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा घणाघात


सिंधुदुर्ग : राज्यभरात सुरु असलेल्या विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) रणसंग्रामासाठी सर्व राजकीय पक्षांची जय्यत तयारी सुरु आहे. अशातच आज कुडाळमध्ये निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाजपा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे उपस्थित असून त्यांनी विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला आहे.



उबाठा गटाचे २५ आमदारही निवडून येणार नाहीत


यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उबाठा गटाचे २५ पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाही, असा दावा नारायण राणे यांनी केला. कारण उद्धव ठाकरे यांची भाषा सुसंस्कृत नाही, ते शिव्या देतात. ही भाषा बाळासाहेब ठाकरे यांच्या घराण्याला शोभत नाही. उद्धव ठाकरे यांची भाषा संस्कृत नसून बाळासाहेबांच्या घराण्याच्याला अशी भाषा शोभत नाही. आज बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असते तर त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना गोळ्या घातल्या असत्या, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली.


उद्धव ठाकरे हे हिंदुत्त्व पणाला लावून मुख्यमंत्री झाले. त्यावेळी अडीच वर्षात केवळ दोन दिवस मंत्रालयात काम केले आणि आता पुन्हा मला मुख्यमंत्री करा, असे म्हणतात. अशा लोकांना सत्ता कोण देईल? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.



पवारांची देखील कुंडली काढली आहे


शरद पवार (Sharad Pawar) याचे वय ८३-८४ इतके आहे. तरीदेखील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकास पाहून त्यांना असह्य झाल्याने त्यांनी राणेंच्या दोन्ही मुलांवर संस्कार नाहीत, अशी टीका केली. मात्र माझ्या घरात त्यांच्यावर संस्कार झाले. मी देखील पवारांची कुंडली काढलेली आहे. गेली अनेक वर्षे आम्ही देखील राजकारणात आहोत. पवार साहेब तुम्ही चार वेळा मुख्यमंत्री होता. विकासावर आणि मराठा आरक्षणावर बोलू नका, असा घणाघात नारायण राणे यांनी शरद पवार यांच्यावर केला.


दरम्यान, २३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकालात निलेश राणे हे आमदार होतील असेच जाहीर होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा

Ketan Agrawal Murder Case : लोणावळा हत्याकांड : आरोपी सियाच्या पालकांची कठोर भूमिका : 'दोषी असल्यास मुलीलाही त्याच दरीत ढकलून द्या'...

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सिया गोयलच्या पालकांनी

Maharashtra Rain Alert : पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता, २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) पुन्हा सक्रिय झाला असून पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने (India

Ketan Agrawal Murder Case : 'खून मी नाही, त्याने केला!'... केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले

Ketan Agrawal Murder Case : आधी कॉफी, मग कट? केतन हत्येपूर्वी सिया-चेतनची तासभर चर्चा

कॅफेत बसून रचला गेला होता प्लॅन? पुणे :  पुण्यातील लोहगड (Lohgad) किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या मृत्यू (Death)