Jammu & Kashmir : जम्मू आणि काश्मीर विधानसभेत कलम ३७० वरून तुफान राडा, सत्ताधारी आणि विरोधक आमदार एकमेकांना भिडले

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये ओमर अब्दुल्ला सरकार सत्तेत आले आहे. कलम ३७० वरून निवडणुकीतच वातावरण तापले होते. या मुद्दावर गेल्या दोन दिवसांपासून मोठा वाद सुरू आहे. आज या धुसफुसीचे रुपांतर धक्काबुक्की आणि हाणामारीपर्यंत गेलं आहे. विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले. कलम ३७० वरून धुमश्चक्री उडाली. हे कलम परत घेण्यासाठी वाद उफाळून आला आहे. दोन्ही गटातील आमदार आज एकमेकांना भिडले.




विधानसभेत तुफान राडा


आज जम्मू आणि काश्मीर विधानसभेत तुफान राडा झाला. आमदारांमध्ये कलम ३७० वर झटापट झाली. यावेळी कलम ३७० रद्द करण्याची मागणी करणारे पोस्टर फाडण्यात आले. विधानसभेचे कामकाज या गोंधळामुळे २० मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले होते. मात्र, दोन्ही बाजुचे आमदारांची आक्रमकता पाहता आज विधानसभेच्या कामकाजाला जोरदार फटका बसण्याची शक्यता आहे. सकाळी सकाळीच विधानसभेत मोठा हंगामा झाला. त्यानंतर दोन्ही गटाचे आमदार आमने-सामने आल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. घोषणाबाजीने सभागृह चांगलंच दणाणून गेले.



कलम ३७० वरून मोठा गदारोळ


आज सकाळीच आमदार शेख खुर्शीद कलम ३७० पुन्हा बहाल करण्यात यावे अशी मागणी करणारे पोस्टर घेऊन सभागृहात आले. हे पोस्टर पाहताच भाजप आमदार भडकले. त्यावेळी त्यांनी हे पोस्टर हिसकवण्याचा आणि फाडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये दोन्ही गटामध्ये झटापट झाली. भाजप आमदारांनी शेख खुर्शीद यांच्या हातातून पोस्टर हिसकावलेच आणि ते फाडले सुद्धा. एकमेकांची कॉलर पकडून बॅनर हिसकावून घेण्यास दोन्ही बाजूंनी सुरुवात केली. गोंधळ वाढत असल्याचे पाहून मध्यस्थी करणाऱ्या मार्शलनी भाजप आमदारांना सभागृहाच्या बाहेर काढले.



Comments
Add Comment

IND vs SA : संजूचा नादच खुळा! १००० धावांचा टप्पा पार करत अभिषेक-सूर्याच्या पंगतीत पटकावले स्थान

भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्यात आपल्या

पंतप्रधान येत्या २० आणि २१ डिसेंबरला आसाम दौऱ्यावर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २० आणि २१  डिसेंबरला आसामला भेट देणार आहेत. दिनांक २० डिसेंबर रोजी दुपारी ३

SIR तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा पश्चिम बंगाल दौरा, ३२०० कोटींचे प्रकल्प सुरू

मुंबई : सध्या पश्चिम बंगालमध्ये SIR मुद्द्यावरून तणावपूर्ण वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारताला मोठ्या लढाईत गुंतवून ठेवण्याचा डाव ?

कोलकाता : बांगलादेशमध्ये एकीकडे जमिनीवर भारतविरोधी आंदोलनांना धार येत असतानाच, दुसरीकडे समुद्रातही तणाव

ओला-उबरला टक्कर; १ जानेवारीपासून भारत टॅक्सी ॲप सुरू होणार

मुंबई : प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे ती म्हणजे, ओला आणि उबरसारख्या खासगी टॅक्सी सेवांना पर्याय ठरणारे भारत

Indian Railways : रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! वेटिंग आणि RAC तिकिटांचे नियम बदलले, आता रात्री झोपण्यापूर्वीच...रेल्वेची मोठी अपडेट वाचा

मुंबई : भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेकदा रेल्वे