Jammu & Kashmir : जम्मू आणि काश्मीर विधानसभेत कलम ३७० वरून तुफान राडा, सत्ताधारी आणि विरोधक आमदार एकमेकांना भिडले

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये ओमर अब्दुल्ला सरकार सत्तेत आले आहे. कलम ३७० वरून निवडणुकीतच वातावरण तापले होते. या मुद्दावर गेल्या दोन दिवसांपासून मोठा वाद सुरू आहे. आज या धुसफुसीचे रुपांतर धक्काबुक्की आणि हाणामारीपर्यंत गेलं आहे. विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले. कलम ३७० वरून धुमश्चक्री उडाली. हे कलम परत घेण्यासाठी वाद उफाळून आला आहे. दोन्ही गटातील आमदार आज एकमेकांना भिडले.




विधानसभेत तुफान राडा


आज जम्मू आणि काश्मीर विधानसभेत तुफान राडा झाला. आमदारांमध्ये कलम ३७० वर झटापट झाली. यावेळी कलम ३७० रद्द करण्याची मागणी करणारे पोस्टर फाडण्यात आले. विधानसभेचे कामकाज या गोंधळामुळे २० मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले होते. मात्र, दोन्ही बाजुचे आमदारांची आक्रमकता पाहता आज विधानसभेच्या कामकाजाला जोरदार फटका बसण्याची शक्यता आहे. सकाळी सकाळीच विधानसभेत मोठा हंगामा झाला. त्यानंतर दोन्ही गटाचे आमदार आमने-सामने आल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. घोषणाबाजीने सभागृह चांगलंच दणाणून गेले.



कलम ३७० वरून मोठा गदारोळ


आज सकाळीच आमदार शेख खुर्शीद कलम ३७० पुन्हा बहाल करण्यात यावे अशी मागणी करणारे पोस्टर घेऊन सभागृहात आले. हे पोस्टर पाहताच भाजप आमदार भडकले. त्यावेळी त्यांनी हे पोस्टर हिसकवण्याचा आणि फाडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये दोन्ही गटामध्ये झटापट झाली. भाजप आमदारांनी शेख खुर्शीद यांच्या हातातून पोस्टर हिसकावलेच आणि ते फाडले सुद्धा. एकमेकांची कॉलर पकडून बॅनर हिसकावून घेण्यास दोन्ही बाजूंनी सुरुवात केली. गोंधळ वाढत असल्याचे पाहून मध्यस्थी करणाऱ्या मार्शलनी भाजप आमदारांना सभागृहाच्या बाहेर काढले.



Comments
Add Comment

Income Tax Return भरणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी...

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत