उबाठाचा वचननामा म्हणजे भुलथापा; आधी महिलांचा मानसन्मान राखा मग महाराजांची मंदिरे बांधा

शिवसेना सचिव डॉ. मनिषा कायंदे यांची उबाठावर घणाघाती टीका


महिलांचा वारंवार अपमान करणारे राऊत बंधू दुर्योधन-दुष्यासन


मुंबई : महिलांचा दररोज अपमान करणारे संजय राऊत आणि सुनील राऊत हे दुर्योधन दुष्यासन आहेत, आधी महिलांचा मानसन्मान राखा मग छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरे बांधा, अशी घणाघाती टीका शिवसेना सचिव डॉ. मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी उबाठावर केली. मुख्यमंत्री असताना बजेटबद्दल अवाक्षर माहित नसलेल्या उबाठाचा वचननामा म्हणजे भुलथापा आहेत, असे त्या म्हणाल्या. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.


डॉ. कायंदे म्हणाल्या की उबाठाचा वचननाम्यामध्ये महिलांना ३००० रुपये देण्याचे आश्वासन दिले. जेव्हा महायुती सरकारने लाडक्या बहिणांना १५०० दिले तेव्हा याच विरोधकांनी बजेटमध्ये तरतूद केली आहे का? पैसे कुठून आणणार असे प्रश्न विचारले होते. लाडकी बहिण योजनेविरोधात कोर्टातही गेले होते, मग आता ३००० रुपये ते कुठून आणणार आहेत, असा सवाल डॉ. कायंदे यांनी केला. ज्यांना बजेट कळत नाहीत त्यांची आश्वासने म्हणजे भुलथापा आहेत, असा टोला ड़ॉ. कायंदे यांनी लगावला. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तुम्ही सोडले म्हणून संजय राऊत, सुनील राऊत, अरविंद सावंत यांच्याकडून महिलांचा अपमान झाला. मात्र याबाबत उद्धव ठाकरे अजूनही गप्प आहेत, अशी टीका डॉ. कायंदे यांनी केली. ज्याप्रकारे महाभारतात दुर्योधन आणि दुष्यासन यांचा अंत झाला तसाच संजय राऊत आणि सुनील राऊत यांचा लाडक्या बहिणी शेवट करतील, असे त्यांनी सांगितले.


काँग्रेसच्या तेलंगणा, हिमाचल, कर्नाटकमधील योजना दीड दोन महिन्यात बंद झाल्या, आमची योजना सहा महिन्यांपासून सुरू आहे. उबाठा महिलांना कुठल्या बसने मोफत प्रवास देणार असा सवाल त्यांनी केला. कुटुंबांना २५ लाखांचा वैद्यकीय विमा देणार या निव्वळ भूलथापा आहेत. कोविडकाळात मुख्यमंत्री सहाय्यता निधी वापरला नाहीत. अडीच वर्षात केवळ फक्त दोन कोटी खर्च केले. मोफत औषध देणार म्हणता मग कोरोनात बॉडीबॅग, रेमडीसिव्हीर का मोफत दिले नाहीत, असा खोचक सवाल डॉ. कायंदे यांनी केला. महाविकास आघाडी वचननाम्याला पंचसूत्री म्हणत असले तरी आमच्यासाठी ते कळसुत्री आहे, असा टोला डॉ. कायंदे यांनी लगावला.


डॉ. कायंदे यांनी राहुल गांधी यांच्यावरही यावेळी टीका केली. राहुल गांधी आरक्षणाची मर्यादा वाढवणार असे बोलतात. लोकसभा निवडणुकीत संविधान बदलण्याचे फेक नरेटिव्ह पसरवले मग आता आरक्षणाची मर्यादा वाढवून तुम्हाला संविधान बदलायचे आहे का,असा सवाल कायंदे यांनी केला. राहुल गांधी यांच्या हातातील लाल पुस्तक नक्की संविधान आहे की आणखी काही ते तपासायला हवं असे त्या म्हणाल्या.



वर्षा गायकवाड यांनी माफी मागावी


मविआच्या मुंबईतील सभेतला एक व्हिडिओ समोर आला आहे. यात छत्रपतींची मूर्ती शरद पवार यांना देण्यासाठी कार्यकर्ता आला असता, वर्षा गायकवाड यांनी स्वत:च्या फोटोसाठी कार्यकर्त्याला बाजूला सारलं आणि महाराजांना झिडकारलं. वर्षा गायकवाड यांनी या कृत्याबाबत माफी मागावी आणि खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी डॉ. कायंदे यांनी केली. काँग्रेसने पंडित जवाहरलाल नेहरुंपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत आल्याची टीका डॉ. कायंदे यांनी केली.

Comments
Add Comment

Minister Adv. Ashish Shelar : पुन्हा अतिक्रमणे वाढून देऊ नका; मुंबई उपनगर पालकमंत्री अँड आशिष शेलार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेत आज उपनगर जिल्ह्यातील शासकीय

Cyber Police : बदलत्या काळातील गुन्ह्यांचे आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज होत काम करण्याची गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

३६ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२६ चा समारोप मुंबई  : महाराष्ट्र पोलीस दलाने बदलत्या काळातील

Legislature's security system : विधिमंडळाच्या सुरक्षा यंत्रणेत होणार मोठे बदल

सभापती राम शिंदेंनी दिले निर्देश; संसदीय आयुधांचा गैरवापर टाळण्यासाठी विशेष उपाययोजना मुंबई : विधिमंडळ

Shree Kshetra Chondi Development Plan : चोंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला चालना मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• पर्यटकांसाठी दर्जेदार सुविधा उभाराव्यात • श्री क्षेत्र चोंडी विकास आराखडा आढावा बैठक मुंबई  : पुण्यश्लोक

Central Railway News : मध्य रेल्वे मार्गावर कोणताही व्यत्यय न आणता मेट्रो लाईन 2ब वरील महत्त्वपूर्ण स्टील स्पॅन उभारणी पूर्ण

कुर्ला ते टिळक नगर रेल्वे ट्रॅक दरम्यान 41.5 मीटर लांबीचा, 178 टन वजनाचा स्ट्रक्चर मुंबई :  मुंबई महानगर प्रदेश विकास

Thane Zilla Parishad : ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलं आता अवकाशाच्या दिशेने; ‘मिशन भरारी’ उपक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवला हिरवा झेंडा

59 ग्रामीण विद्यार्थ्यांची 'इस्रो' सफर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘ग्रामीण ते अवकाश’ व्हिजन ठाणे जिल्हा