Shah Rukh Khan : सलमान खाननंतर शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी!

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सलमान खानला (Salman Khan) लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे. धमकी देण्याचे प्रकरण चर्चेत असताना आता बॉलिवूडचा किंगखान शाहरुख खान (Shahrukh Khan) यालाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या बॉलीवूड क्षेत्रात भीतीचे वातावरण पसरले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, फैजान नावाच्या एका व्यक्तीने रायपूरहून शाहरूख खानला धमकीचा फोन केला. या धमकीमध्ये '५० लाख रुपये द्या, नाहीतर जीवे मारुन टाकू' अशी धमकी दिली. धमकी मिळाल्यानंतर मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दरम्यान, शाहरुखने काही दिवसांपूर्वी सलमान खानचीही भेट घेतली होती. तसेच यांचे घर जवळपास असल्यामुळे शाहरुख खानला धमकी देण्यात आली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.


याप्रकरणी पोलिसांचे पथक रायपूरला गेले असून पुढील तपास अद्याप सुरू आहे. तसेच पोलिसांनी मन्नतच्या बाहेर बॅरिकेड्स लावले आहेत. तर शाहरुख खानची सुरक्षाही वाढवली जाण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन

१ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : रविवार, १ मार्च २०२६ रोजी उपनगरीय रेल्वे सेवांवर मोठ्या प्रमाणात देखभाल आणि अभियांत्रिकी कामे हाती

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे

माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; पाच ते १०० कोटींपर्यंत खर्चास मान्यता

मुंबई : राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण व प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा