Shah Rukh Khan : सलमान खाननंतर शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी!

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सलमान खानला (Salman Khan) लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे. धमकी देण्याचे प्रकरण चर्चेत असताना आता बॉलिवूडचा किंगखान शाहरुख खान (Shahrukh Khan) यालाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या बॉलीवूड क्षेत्रात भीतीचे वातावरण पसरले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, फैजान नावाच्या एका व्यक्तीने रायपूरहून शाहरूख खानला धमकीचा फोन केला. या धमकीमध्ये '५० लाख रुपये द्या, नाहीतर जीवे मारुन टाकू' अशी धमकी दिली. धमकी मिळाल्यानंतर मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दरम्यान, शाहरुखने काही दिवसांपूर्वी सलमान खानचीही भेट घेतली होती. तसेच यांचे घर जवळपास असल्यामुळे शाहरुख खानला धमकी देण्यात आली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.


याप्रकरणी पोलिसांचे पथक रायपूरला गेले असून पुढील तपास अद्याप सुरू आहे. तसेच पोलिसांनी मन्नतच्या बाहेर बॅरिकेड्स लावले आहेत. तर शाहरुख खानची सुरक्षाही वाढवली जाण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

अशोक हांडे यांनी महापालिका शाळेतील ती व्यक्त केली खंत...म्हणाले ,तर मोठा कलाकार झालो असतो!

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीचे शिक्षक हे खूप प्रतिभावान आहेत. शैक्षणिक

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची

BMC ची मोठी भेट: आता हॉस्पिटलमध्ये 'मोफत' आणि 'कॅशलेस' उपचार!

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने (BMC) आरोग्याच्या सोयी चांगल्या करण्यासाठी एक खूप चांगली गोष्ट सुरू केली आहे. या नव्या

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल