फेसबुक, ट्विटरनंतर आता Wikipediaवर अ‍ॅक्शन! भारत सरकारने पाठवली नोटीस

नवी दिल्ली : फेसबुक आणि ट्विटरनंतर आता सरकारने विकिपीडियावर कारवाई केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर विकिपीडिया आणखी एका अडचणीत सापडला आहे. विकिपीडियाला केंद्र सरकारने नोटीस पाठवली आहे. खरंतर, या लोकप्रिय आणि विनामूल्य ऑनलाइन इनसाइक्लोपीडिया विकिपीडियामध्ये पक्षपात आणि चुकीची माहिती असल्याच्या तक्रारी होत्या.


सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, केंद्र सरकारने सांगितलंय की, विकिपीडियावर निवडक गटाने संपादकीय नियंत्रण ठेवले आहे. अशा स्थितीत असा प्रश्न निर्माण होतो की, विकिपीडियाला ‘मध्यस्थ’ ऐवजी ‘प्रकाशक’ का मानले जाऊ नये. दिल्ली उच्च न्यायालयात अशी नोटीस सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत आली आहे. ज्यात एशियन न्यूज इंटरनॅशनल (वृत्तसंस्था) ANI ने त्या यूझर्सविषयी तक्रार दाखल केली आहे. ज्यांनी फर्मबद्दल एडिट करुन काही चुकीच्या गोष्टी लिहिल्या होत्या. विकिपीडियावरील कथित संपादनात ANIचे वर्णन भारत सरकारचे ‘प्रचार साधन’ म्हणून करण्यात आले होते.


दिल्ली उच्च न्यायालयाने एएनआय या वृत्तसंस्थेशी सप्टेंबरमध्ये झालेल्या सुनावणीत संबंधित एका प्रकरणात विकिपीडियाविरुद्ध अवमानाची नोटीस जारी केली होती. भारतीय कायद्यांचे पालन न केल्याबद्दल खंडपीठाने विकिपीडियाला इशारा दिला होता आणि म्हटले होते की, जर तुम्हाला भारत आवडत नसेल तर कृपया भारतात काम करू नका, सरकारला आम्ही तुमची साइट ब्लॉक करण्यास सांगू.


न्यायालयात एएनआयच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली होती की वृत्तसंस्थेची माहिती असलेल्या पृष्ठावर काही एडिट करण्याची परवानगी देण्यात आली आहे. विकिपीडियावर एका एडिटद्वारे, असे लिहिले आहे की ANI ही वृत्तसंस्था भारत सरकारचे प्रचाराचे साधन आहे. त्यामुळे कंपनीने मानहानीचा दावा दाखल केला.


विकिपीडिया एडिट करणाऱ्या तीन अकाउंटची माहिती देण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते. मात्र एएनआयने सुनावणीदरम्यान ही माहिती देण्यात आली नसल्याचा दावा केला आहे. एएनआयने वृत्त दिले आहे की विकिपीडियाने हे प्रत्यक्षात सांगितले नाही. त्याच वेळी, आपल्या बचावादरम्यान विकिपीडियाने न्यायालयाला सांगितले होते, की त्याच्या वतीने काही कागदपत्रे सादर होईपर्यंत माहिती जारी करण्यास विलंब होत आहे.हे घडण्यामागचं कारणं असं की, विकिपीडिया भारतात स्थित नाही. त्यावर न्यायमूर्ती नवीन चावला यांनी नाराजी व्यक्त केली.

Comments
Add Comment

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित

मुंबई: सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत असून किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना आर्थिक

गॅस सिलिंडरच्या मागणीत २० ते २२ लाखांनी वाढ

नवी दिल्ली : गॅस तुटवड्यामुळे केवळ व्यावसायिकच नव्हे, तर त्यावर अवलंबून असणारे शेकडो कामगार आणि स्थानिक

मासिक पाळी रजा अनिवार्य करण्यास नकार, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मासिक पाळी रजा अनिवार्य करण्याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळून लावली आहे.

कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा आणि फरमान यांच्या लग्नावर वडिलांचा गंभीर आरोप; त्यांनी माझ्या डोळ्यासमोर...

मुंबई: कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा भोसले सध्या तिच्या आंतरधर्मीय लग्नामुळे चर्चेत आहे. मल्याळम

चिंता करू नका; भारतात गॅस-इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध - मंत्री हरदीप सिंह पुरी

लोकसभेत केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी पश्चिम आशियातील संकटानंतर देशात गॅस

तुम्हाला 'या' ५ प्रकारे गॅस सिलेंडर बुक करता येणार; कोणता सर्वात सोपा पर्याय?, जाणून घ्या.

नवी दिल्ली: देशातील लाखो कुटुंबे स्वयंपाकासाठी एलपीजी गॅस सिलिंडर वापरतात. त्यामुळे प्रत्येक कुटुंबासाठी