आजपासून खायला सुरूवात करा या गोष्टी, कधीच येणार नाही व्हिटामिन बी, बी१२ची कमतरता

मुंबई: व्हिटामिन बी१२ हे अत्यंत गरजेचे पोषकतत्व आहे जे शरीराच्या विवइध कार्यांमध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात. लाल रक्तपेशींचे उत्पादन, हेल्दी नर्व्हस सिस्टीम आणि डीएनएच्या कामांसाठी गरजेचे आहे.


कारण आपले शरीर स्वत:हून बी १२ ची निर्मिती करत नाही. यासाठी आपल्या आहारातून बी१२चा शरीराला पुरवठा करणे गरजेचे असते. व्हिटामिन बी१२ची मात्र ३००Pg/ml पेक्षा जास्त असणे नॉर्मल मानले जाते. जेव्हा हा स्तर सातत्याने की होतो तेव्हा व्हिटामिन बी १२ची कमतरता मानली जाते. जर वेळेवर याकडे लक्ष दिले नाही तर गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.


व्हिटामिन बी१२च्या कमतरतेमुळे हात-पाय सुन्न होतात. तसेच चेहरा पिवळा पडणे, स्किन ड्राय होणे तसेच स्मरणशक्ती कमी होणे, स्वभाव चिडचिडा होणे यासारखी लक्षणे दिसतात.


कोणत्याही व्यक्तीच्या शरीरात बी१२ ची कमतरता निर्माण होऊ शकते. मात्र शाकाहारी लोकांच्या शरीरात बी१२ची कमतरता अधिक आढळते.


बी१२ची कमतरता भरून काढण्यासाठी डेअरी पदार्थ जसे दूध, दही आणि पनीर हा व्हिटामिन बी१२चा चांगला स्त्रोत आहे. आपल्या दररोजच्या डाएटमध्ये सामील करून तुम्ही व्हिटामिन बी१२ची कमतरता भरून काढू शकता.


सीवीड्समध्येही व्हिटामिन बी१२ असते. जपानी आणि कोरियन खाण्यामध्ये सीवीड्सचा समावेश अधिक केला जातो.


टीप - वरील लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. प्रहार कोणत्याही प्रकारे याची पुष्टी करत नाही. संबंधित गोष्टींसाठी तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

Comments
Add Comment

उत्तम आरोग्यासाठी पोटाकडे लक्ष द्या..

पोटाचे आरोग्य उत्तम असेल तर आपलं पूर्ण शरीर निरोगी राहतं. पोटाचं आरोग्य सांभाळण्यासाठी आतड्याचे स्वच्छ राहणे,

Hair Care: केस गळती थांबवण्यासाठी 'या' ५ बियांचे सेवन करा, नैसर्गिकरित्या केस वाढतील

मुंबई : आजकाल बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे केस गळण्याची समस्या खूप वाढली आहे. अशा परिस्थितीत, केसांचे

योगाचे प्रकार

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके मागील लेखात पातंजल-योगाव्यतिरिक्त योगाच्या इतर प्रकारांपैकी हठयोगाविषयी माहिती

Health: सकाळी, दुपारी की रात्री? ड्रायफ्रुट्स खाण्याची योग्य वेळ कोणती, घ्या जाणून...

मुंबई: सुका मेवा (Dry fruits) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु तो कोणत्या वेळी खावा, हे जाणून घेणे महत्त्वाचे

उष्ण पदार्थांचे अति सेवन : उच्च रक्तदाब आणि त्वचेच्या समस्यांचे प्रमुख कारण !

मुंबई : आयुर्वेद हा भारतीय प्राचीन आरोग्यशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये शरीराच्या संतुलनावर विशेष

साथींच्या आजारापासून मुलांना दूर ठेवा

विनायक बेटावदकर गणपती उत्सवापूर्वी सुमारे पंधरा दिवस, गणपती उत्सवात कल्याण शहर, ग्रामीण भागाचे हवामान साधारण