आग्रा येथे हवाई दलाचे विमान कोसळले, पायलटसह २ जणांनी शेतात उड्या घेत...

आग्रा : उत्तर प्रदेशातील आगरा येथे आज एक मोठी दुर्घटना घडली. हवाई दलाच्या विमानाने आकाशातच पेट घेतला. ही आग वाढल्यानंतर विमान एका शेतात कोसळले. दरम्यान, अपघातावेळी विमानातील पायलट आणि आणखी २ व्यक्तींनी शेतात उडी मारून आपला जीव वाचवला. विमान जमिनीवर कोसळताच आग आणखी भडकली. आग्रा येथील कागारौल भागातील सोंगा गावाजवळ ही दुर्घटना घडली.

या घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचत आहेत. विमान शेतात कोसळताना पाहून गावातील सर्व लोकही तेथे पोहोचले. या दुर्घटनेनंतर, तातडीने चौकशीचे आदेश करण्यात आले आहेत. तसेच, दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी संबंधित सर्व संस्थांना सतर्क करण्यात आले आहेत.


पंजाबमधून केले होते उड्डाण -


एएनआय या वृत्त संस्थेने संरक्षण अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, हे मिग-२९ विमान होते. पंजाबमधील अदमपुर येथून या विमानाने उड्डाण घेतले होते. विमान रूटीन एक्सरसाइजसाठी आगरा येथे जात होते. दुर्घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Comments
Add Comment

'ATAGS' artillery gun is ready : १५ सेकंदात ३ हल्ले आणि ४८ किमीचा अचूक पल्ला; चीन-अमेरिकाही चकित

नवी दिल्ली: रणांगणावर भारताच्या सं

Delhi-Pune SpiceJet Flight : दिल्ली - पुणे विमानात तांत्रिक बिघाड; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!

नवी दिल्ली : दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याची घटना

Actor Prakash Raj : अभिनेते प्रकाश राज यांचा SIR वरचा दावा खोटा? निवडणूक आयोगाने दाखवला BLOचा व्हिडिओ; म्हणाले "जुन्या पत्त्यावर..."

नवी दिल्ली : अभिनेता प्रकाश राज (Actor Prakash Raj) आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतात. आता कर्नाटकमधील Special Intensive Revision (SIR)

Jharkhand : पोलिसांच्या दडपशाहीविरोधात झारखंड बंद

रांची : झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या

Arunachal Pradesh : "अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग", चीनच्या आक्षेपाला भारताचे चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली : भारताने गेल्या आठवड्यात आपल्या अधिकृत नकाशावर अरुणाचल प्रदेशातील २७ ठिकाणे आणि भौगोलिक

Vande Mataram Law : ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीने ऐतिहासिक विधेयकाचे कायद्यात रूपांतर

नवी दिल्ली: राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’चा अवमान करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी