SBI यूजर्स सावध व्हा! WhatsAppवर असा मेसेज आला तर चुकूनही करू नका क्लिक

मुंबई: जर तुम्ही भारतीय स्टेट बँक युजर आहात तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. खरंतर, सध्या फसवणुकीच्या घटना वेगाने वाढत आहे. फसवणूकदार फसवणूक करण्यासाठी विविध पद्धती वापरत आहेत. सध्या लोकांना बँकेच्या नावावर मेसेज पाठवले जात आहेत. या मेसेजमध्ये एक लिंक देण्यात आली आहे.


युजर्स लिंकवर क्लिक करण्यासाठी विविध ऑफर्स देत आहेत. काही असेच एसबीआय युजर्ससोबत घडत आहे. मात्र एसबीआयने आपल्या युजर्ससाठी इशारा जारी केला आहे. जाणून घ्या डिटेलबाबत...


भारतीय स्टेट बँकने आपल्या ग्राहकांना इशारा दिला आहे. यात असे म्हटले आहे की काही लोक एसबीआयच्या नावाने नकली मेसेज पाठवत आहेत. हे मेसेज व्हॉट्सअॅप आणि एसएमएसच्या माध्यमातून पाठवले जात आहेत. या मेसेजमध्ये म्हटले आहे की तुमचे एसबीआय रिवॉर्ड पॉईंट्स लवकर संपणार आहेत. अशातच ते लवकरात लवकर रिडीम करा.


मेसेजमध्ये एक लिंकही देण्यात आली आहे. एसबीआयने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. यात एसबीआयने स्पष्ट केले आहे की बँकेकडून कधीही अशा प्रकारचे मेसेजेस येत नाहीत. यासाठी ग्राहकांनी अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये.


 


एसबीआय रिवार्ड पॉईंट्स


एसबीआय आपल्या ग्राहकांना नेहमी ट्रान्झॅक्शनवर रिवार्ड पॉईंट्स पाठवत असते. प्रत्येक पॉईंट्सची किंमत २५ पैसे असते. या रिवार्ड पॉईंट्सचा वापर तुम्ही कोणत्याही प्रॉडक्ट अथवा सर्व्हिसेस खरेदीसाठी करू शकता. यात कपडे, सिनेमाचे तिकीट, मोबाईल अथवा डीटीएच रिचार्ज यांचा समावेश करू शकता.

Comments
Add Comment

अयोध्या : घरात झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

अयोध्या : अयोध्या जिल्ह्यातील नगर पंचायत भदरसा भरतकुंडच्या महाराणा प्रताप वॉर्डातील पगलाभारी गावात जोरदार

दहशतवाद्यांनी बर्फवृष्टीचा फायदा घेऊन घुसखोरी करू नये , सुरक्षा दलांनी सज्ज रहावे - अमित शाह

नवी दिल्ली : “केंद्र सरकारचे दहशतवादाविरोधातील “शून्य सहनशीलता” धोरण पुढेही कायम राहणार आहे”, असे केंद्रीय

मोठा अपघात टळला; फर्रुखाबादमध्ये खाजगी विमानाचा अपघात

फर्रुखाबा : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथील विमान तळावर आज सकाळी एका खासगी विमानाचा

विषारी कफ सिरपमुळे २३ चिमुरड्यांचा मृत्यू, कंपनीच्या संचालकाला अटक

नवी दिल्ली : श्रीसन फार्मा कंपनीच्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या एका बॅचच्या निर्मिती प्रक्रियेत गंभीर गडबड झाली.

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, ९ ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ११