SBI यूजर्स सावध व्हा! WhatsAppवर असा मेसेज आला तर चुकूनही करू नका क्लिक

मुंबई: जर तुम्ही भारतीय स्टेट बँक युजर आहात तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. खरंतर, सध्या फसवणुकीच्या घटना वेगाने वाढत आहे. फसवणूकदार फसवणूक करण्यासाठी विविध पद्धती वापरत आहेत. सध्या लोकांना बँकेच्या नावावर मेसेज पाठवले जात आहेत. या मेसेजमध्ये एक लिंक देण्यात आली आहे.


युजर्स लिंकवर क्लिक करण्यासाठी विविध ऑफर्स देत आहेत. काही असेच एसबीआय युजर्ससोबत घडत आहे. मात्र एसबीआयने आपल्या युजर्ससाठी इशारा जारी केला आहे. जाणून घ्या डिटेलबाबत...


भारतीय स्टेट बँकने आपल्या ग्राहकांना इशारा दिला आहे. यात असे म्हटले आहे की काही लोक एसबीआयच्या नावाने नकली मेसेज पाठवत आहेत. हे मेसेज व्हॉट्सअॅप आणि एसएमएसच्या माध्यमातून पाठवले जात आहेत. या मेसेजमध्ये म्हटले आहे की तुमचे एसबीआय रिवॉर्ड पॉईंट्स लवकर संपणार आहेत. अशातच ते लवकरात लवकर रिडीम करा.


मेसेजमध्ये एक लिंकही देण्यात आली आहे. एसबीआयने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. यात एसबीआयने स्पष्ट केले आहे की बँकेकडून कधीही अशा प्रकारचे मेसेजेस येत नाहीत. यासाठी ग्राहकांनी अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये.


 


एसबीआय रिवार्ड पॉईंट्स


एसबीआय आपल्या ग्राहकांना नेहमी ट्रान्झॅक्शनवर रिवार्ड पॉईंट्स पाठवत असते. प्रत्येक पॉईंट्सची किंमत २५ पैसे असते. या रिवार्ड पॉईंट्सचा वापर तुम्ही कोणत्याही प्रॉडक्ट अथवा सर्व्हिसेस खरेदीसाठी करू शकता. यात कपडे, सिनेमाचे तिकीट, मोबाईल अथवा डीटीएच रिचार्ज यांचा समावेश करू शकता.

Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या