मुंबई: भारतीय क्रिकेट संघाला न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत मिळाला व्हाईटवॉश विसरायला बराच वेळ लागेल. यातच आता वेगळ्या फॉरमॅटसह वेगळा कर्णधार आणि वेगळ्या कोचसह टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला पोहोचली आहे. ४ सामन्यांची टी-२० मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात परदेशी दौऱ्यावर पोहोचला आहे.
बीसीसीआयने संघ पोहोचल्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. दक्षिण आफ्रिकेत संघाचे मुख्य कोच म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण दिसतील. या दौऱ्यात चार टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना ९ नोव्हेंबरला किंग्समीडमध्ये खेळवला जाणार आहे. दुसरा सामना १० तारखेला सेंट जॉर्ज ओव्हलमध्ये खेळवला जाईल. तिसरा टी-२० सामना सुपरस्पोर्ट पार्कमध्ये असणार आहे. तर शेवटचा सामना वांडरर्स स्टेडियममध्ये होईल.
पहिला टी-२० सामना- ८ नोव्हेंबर, किंग्समीड
दुसरा टी-२० सामना – १० नोव्हेंबर, सेंट जॉर्ज ओवल
तिसरा टी-२० सामना – १३ नोव्हेंबर, सुपरस्पोर्ट पार्क
चौथा टी-२० सामना – १५ नोव्हेंबर, वाँडरर्स स्टेडियम
सूर्यकुमार यादव(कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन(विकेटकीपर), रिंकु सिंह, तिलक वर्मा, जितेश शर्मा(विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंह, वरूण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, विजयकुमार, आवेश खान आणि यश दयाल.
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या एच/पश्चिम विभागातील खारदांडा स्मशानभूमी पुन्हा एकदा बंद ठेवण्याची वेळ आली…
पाच रुपयांचे तिकीट दहा रुपये, सहा रुपयांचे तिकीट बारा रुपये मुंबई (प्रतिनिधी) : तोट्यात चाललेल्या…
एनटीसी गिरण्यांच्या जागेची शोध मोहीम सुरू करण्याचे म्हाडाला आदेश मुंबई (प्रतिनिधी) : गिरणी कामगारांच्या घरांच्या…
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो लवकरच होणार दाखल मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई शहरात आणि उपनगरात मेट्रोची कामे वेगाने…
पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तांवर मार्केटयार्डात मोठ्या प्रमाणात हापूस आंबा उपलब्ध…
प्रा. नंदकुमार काकिर्डे स्वित्झर्लंडस्थित आय क्यू एअर संस्थेने जागतिक पातळीवरील हवा प्रदूषणाचा व्यापक अहवाल प्रसिद्ध…