दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर; हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीमध्ये नोंद

नवी दिल्ली : दिवाळीच्या आसपासच्या दिवसात फटक्यांच्या धुरामुळे होणाऱ्या वायू प्रदूषणाबाबत कायम बोलले जाते. पण सध्या दिल्लीने मात्र याबाबतचे सगळे विक्रम मोडले आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, रविवारी दिल्लीची हवेची गुणवत्ता "अत्यंत खराब" श्रेणीमध्ये नोंदवण्यात आली, या दिवशी हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्युआय) ३८२ वर पोहोचला.


या श्रेणीमुळे दिल्लीतील हवेचा दर्जा आता अत्यंत खराबवरुन गंभीर स्थितीमध्ये पोहोचण्याच्या पातळीवर पोहोचला आहे. कचरा किंवा पेंढा जाळण्याचे प्रमाण कमी असूनही हवेने प्रदूषणाची पातळी ओलांडली आहे. याचा अर्थ दिल्लीच्या प्रदूषणावर बाकीचे घटकही प्रभाव निर्माण करत आहेत, हे दिसून येते.


वाहनांमधून बाहेर पडणारा धूर, औद्योगिक उत्सर्जन आणि बांधकामाची धूळ हे दिल्लीच्या प्रदूषणामध्ये मोठी भर टाकतात.यातील कण हवेत बराच काळ राहून मानवी श्वासोश्वासावर गंभीर परिणाम करतात. दिल्लीतील हवेची पाहणी करणाऱ्या ४० स्थानकांपैकी डझनहून अधिक स्थानकांनी रविवारपर्यंत 'गंभीर' श्रेणीत प्रवेश केला आहे. त्रासदायक एक्युआय पातळी नोंदवणाऱ्या प्रमुख स्थानांमध्ये आनंद विहार, अशोक विहार, बवाना, द्वारकामधील दोन्ही स्थानके, जहांगीरपुरी, मुंडका, नजफगढ, लाजपत नगर, पटपरगंज, विवेक विहार, रोहिणी, पंजाबी बाग आणि वजीरपूर यांचा समावेश आहे. स्थानिक प्रदूषणाचे स्रोत,प्रतिकूल हवामानशास्त्रीय परिस्थिती आणि मोठ्या प्रमाणात उत्सर्जन यामुळे दिल्लीतील प्रदूषणात आणखी भर पडत आहे.


उत्तर भारतात विशेषत: दिल्ली परिसरात पीक जाळणे, वाहनांचे उत्सर्जन, कोळसा जाळणे, कचरा जाळणे आणि उष्णता आणि स्वयंपाकासाठी बायोमास जाळणे यापासून धुराचा सामना करत आहेत. उत्तर भारत आणि शेजारील पाकिस्तानमध्ये वार्षिक पीक जाळल्यामुळे दिल्लीत आपत्कालीन-स्तरीय हवेच्या गुणवत्तेचे दिवस नियमितपणे अनुभवले जातात. देशाच्या राजधानीत पीएम २.५ उत्सर्जनाच्या ४०% साठी वाहनांचे उत्सर्जन जबाबदार आहे. प्रत्युत्तर म्हणून दिल्लीत जुन्या वाहनांवर बंदी घालण्यात आली. २०१८ च्या उत्तरार्धात बंदी लागू झाल्यापासून रस्त्यावरील कारच्या संख्येत ३५% ने घट झाली आहे. तरीही प्रदुषणाचे प्रमाण रोखण्यास म्हणावेसे यश मिळत नाही, हे मान्य करायवास हवे.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : ‘होर्मुझ सामुद्रधुनीत अडथळा अस्वीकार्य’; लोकसभेत पंतप्रधान मोदींचा जगाला स्पष्ट संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील तणाव आणि युद्धस्थितीवर लोकसभेत महत्त्वपूर्ण निवेदन करताना

एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसचा पश्चिम आशियासाठी ३० विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय

नवी दिल्ली : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर, अनेक विमान कंपन्यांना पश्चिम आशियाई देशांमधील

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएची काश्मिरात छापेमारी

श्रीनगर : दिल्लीतील लाल किला स्फोट प्रकरणाच्या तपासात राष्ट्रीय जांच एजेंसी (एनआयए) ने आज, सोमवारी पहाटे काश्मीर

धक्कादायक! भारतीय वायुसेना कर्मचारी करत होता पाकिस्तानसाठी हेरगिरी; आसाममधून अटक

वायुसेना आणि राजस्थान गुप्तचर विभागाच्या संयुक्त पथकाने आसाममधील वायुसेना तळावर कार्यरत असलेल्या एका

मुस्लिम डॉक्टरने गुंगीचे इंजेक्शन देत केला हिंदू मुलीवर बलात्कार; मध्यप्रदेशातील संतापजनक घटना

इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुस्लिम डॉक्टरने एका हिंदू तरुणीवर

भारताने पुन्हा एकदा गाठला एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचा टप्पा

- देशाच्या ऊर्जा सुरक्षेला मिळणार आणखी बळकटी भारताने २० मार्च २०२६ रोजी सलग दुसऱ्या वर्षी १ अब्ज टन कोळसा