हे पदार्थ खाल्ल्याने वाढतो कोलेस्ट्रॉलचा धोका, करू नका या चुका

मुंबई: आपल्या शरीराच्या कामकाजासाठी कोलेस्ट्रॉल अतिशय गरजेचे आहे. मात्र याचा स्तर शरीरात वाढू लागल्यास खासकरून हृदयासाठी धोकादायक आहे. कोलेस्ट्रॉल एक प्रकारचे फॅट आहे जे अधिक वाढल्यास शरीरात अनेक प्रकारचे त्रास होऊ लागतात. खराब कोलेस्ट्रॉल शरीरात वाढल्यास स्ट्रोक, हॉर्ट अॅटॅक, टाईप २ डायबिटीजसारख्या आजारांचा धोका वाढतो.


हॉर्ट अॅटॅक आणि स्ट्रोक हे जीवघेणे आजार आहेत. जर तुम्ही तुमच्या खाण्यापिण्यावर लक्ष दिले नाही तर शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू लागते. अशातच आम्ही तुम्हाला सांगत आहोत की असे कोणते पदार्थ आहे ज्यांच्यामुळे शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका असतो.



प्रोसेस्ड फूडमुळे वाढते कोलेस्ट्रॉल


बाजारात मिळणारे पॅक्ड फूड सध्या चलनात आहे. मात्र ते शरीरासाठी अजिबात चांगले नाही. पॅक्ड पदार्थ लवकर खराब होऊ नयेत यासाठी ते प्रोसेस केले जातात. अशातच खाण्यामध्ये ट्रान्स फॅट आणि सोडियमचे प्रमाण वाढते. यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशरसारख्या आजारांचा धोका वाढतो. तुम्हीही प्रोसेस्ड फूड खात असाल तर त्याचे मर्यादित सेवन करा.



गोड खाद्य पदार्थ


गोड खाद्य पदार्थ शरीरासाटी अतिशय हानिकारक असतात. साखरयुक्त पदार्थ खाल्ल्यांमध्ये नसांमध्ये खराब कोलेस्ट्रॉल वाढू लागते. यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकते. जर तुम्ही दररोज केक, कुकीज, शेक आणि मिठाईचे सेवन करत असाल तर ही सवय आजच बदला.


धूम्रपान


स्मोकिंगची सवय आपल्या आरोग्यासाठी योग्य नाही. यामुळे शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्याऐवजी खराब कोलेस्ट्रॉल वाढते. यामुळे तुम्हाला जर आधीपासून हाय कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर सिगारेट पिणे सोडा.

Comments
Add Comment

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे