हे पदार्थ खाल्ल्याने वाढतो कोलेस्ट्रॉलचा धोका, करू नका या चुका

मुंबई: आपल्या शरीराच्या कामकाजासाठी कोलेस्ट्रॉल अतिशय गरजेचे आहे. मात्र याचा स्तर शरीरात वाढू लागल्यास खासकरून हृदयासाठी धोकादायक आहे. कोलेस्ट्रॉल एक प्रकारचे फॅट आहे जे अधिक वाढल्यास शरीरात अनेक प्रकारचे त्रास होऊ लागतात. खराब कोलेस्ट्रॉल शरीरात वाढल्यास स्ट्रोक, हॉर्ट अॅटॅक, टाईप २ डायबिटीजसारख्या आजारांचा धोका वाढतो.


हॉर्ट अॅटॅक आणि स्ट्रोक हे जीवघेणे आजार आहेत. जर तुम्ही तुमच्या खाण्यापिण्यावर लक्ष दिले नाही तर शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू लागते. अशातच आम्ही तुम्हाला सांगत आहोत की असे कोणते पदार्थ आहे ज्यांच्यामुळे शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका असतो.



प्रोसेस्ड फूडमुळे वाढते कोलेस्ट्रॉल


बाजारात मिळणारे पॅक्ड फूड सध्या चलनात आहे. मात्र ते शरीरासाठी अजिबात चांगले नाही. पॅक्ड पदार्थ लवकर खराब होऊ नयेत यासाठी ते प्रोसेस केले जातात. अशातच खाण्यामध्ये ट्रान्स फॅट आणि सोडियमचे प्रमाण वाढते. यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशरसारख्या आजारांचा धोका वाढतो. तुम्हीही प्रोसेस्ड फूड खात असाल तर त्याचे मर्यादित सेवन करा.



गोड खाद्य पदार्थ


गोड खाद्य पदार्थ शरीरासाटी अतिशय हानिकारक असतात. साखरयुक्त पदार्थ खाल्ल्यांमध्ये नसांमध्ये खराब कोलेस्ट्रॉल वाढू लागते. यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकते. जर तुम्ही दररोज केक, कुकीज, शेक आणि मिठाईचे सेवन करत असाल तर ही सवय आजच बदला.


धूम्रपान


स्मोकिंगची सवय आपल्या आरोग्यासाठी योग्य नाही. यामुळे शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्याऐवजी खराब कोलेस्ट्रॉल वाढते. यामुळे तुम्हाला जर आधीपासून हाय कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर सिगारेट पिणे सोडा.

Comments
Add Comment

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका