न्यूझीलंडविरुद्ध पराभवानंतर पुढील मालिकेत कापला जाणार गौतम गंभीरचा पत्ता, या दिग्गजाकडे जबाबदारी!

मुंबई: टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध खेळलेल्या कसोटी मालिकेत ३-० असा पराभव सहन करावा लागला. हा भारतीय क्रिकेट इतिहासातील पहिलाच असा क्षण होता जेव्हा एखाद्या संघाने भारताला भारतात व्हाईटवॉश दिला. भारताला हा लाजिरवाणा पराभव रोहित शर्माच्या नेतृत्वात आणि गौतम गंभीरच्या कोचिंगमध्ये झेलावा लागला. आता टीम इंडिया पुढील मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळत आहे. यात गंभीर कोच म्हणून असणार नाही.


दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर चार सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. याची सुरूवात ८ नोव्हेंबरासून होईल तर समाप्ती १५ नोव्हेंबरला होईल. यातच टीम इंडियाला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना व्हायचे आहे. अशातच गंभीरला टीम इंडियासोबत आफ्रिका दौऱ्यावर जाणे शक्य नाही.


आफ्रिका दौऱ्यावर गंभीरच्या जागी व्ही व्हीएस लक्ष्मणला टीम इंडियाचे हेड कोच म्हणून संधी मिळेल. असे यासाठी कारण आधी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ही मालिका ठरलेली नव्हती. लक्ष्मणसोबत साईराज बहुतुले, ऋषिकेश कानिटकर आणि सुभादीप घोषही आफ्रिका दौऱ्यात कोचिंग स्टाफसोबत दिसतील.



दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ


सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंह, तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमनदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, विजयकुमार वैशाक, आवेश खान, यश दयाल.

Comments
Add Comment

क्रिकेटच्या 'थाला'ला हाऊसिंग बोर्डाची नोटीस; केवळ १५ दिवसांची मुदत

क्रिकेटचा थाला अशी ओळख असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला झारखंड राज्य गृहनिर्माण

वेस्ट इंडिज-भारताच्या सामन्याचा पावसावर ठरणार निकाल

रन रेटवर ठरणार उपांत्य फेरीचा दावेदार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून

अर्शदीपने मोडला बोल्टचा विक्रम

बुमराहलाही टाकले मागे नवी दिल्ली : भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टी-२० विश्वचषकात आपल्या

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून