मुंबई: टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध खेळलेल्या कसोटी मालिकेत ३-० असा पराभव सहन करावा लागला. हा भारतीय क्रिकेट इतिहासातील पहिलाच असा क्षण होता जेव्हा एखाद्या संघाने भारताला भारतात व्हाईटवॉश दिला. भारताला हा लाजिरवाणा पराभव रोहित शर्माच्या नेतृत्वात आणि गौतम गंभीरच्या कोचिंगमध्ये झेलावा लागला. आता टीम इंडिया पुढील मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळत आहे. यात गंभीर कोच म्हणून असणार नाही.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर चार सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. याची सुरूवात ८ नोव्हेंबरासून होईल तर समाप्ती १५ नोव्हेंबरला होईल. यातच टीम इंडियाला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना व्हायचे आहे. अशातच गंभीरला टीम इंडियासोबत आफ्रिका दौऱ्यावर जाणे शक्य नाही.
आफ्रिका दौऱ्यावर गंभीरच्या जागी व्ही व्हीएस लक्ष्मणला टीम इंडियाचे हेड कोच म्हणून संधी मिळेल. असे यासाठी कारण आधी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ही मालिका ठरलेली नव्हती. लक्ष्मणसोबत साईराज बहुतुले, ऋषिकेश कानिटकर आणि सुभादीप घोषही आफ्रिका दौऱ्यात कोचिंग स्टाफसोबत दिसतील.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंह, तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमनदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, विजयकुमार वैशाक, आवेश खान, यश दयाल.
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…
मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण…
हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…