न्यूझीलंडविरुद्ध पराभवानंतर पुढील मालिकेत कापला जाणार गौतम गंभीरचा पत्ता, या दिग्गजाकडे जबाबदारी!

मुंबई: टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध खेळलेल्या कसोटी मालिकेत ३-० असा पराभव सहन करावा लागला. हा भारतीय क्रिकेट इतिहासातील पहिलाच असा क्षण होता जेव्हा एखाद्या संघाने भारताला भारतात व्हाईटवॉश दिला. भारताला हा लाजिरवाणा पराभव रोहित शर्माच्या नेतृत्वात आणि गौतम गंभीरच्या कोचिंगमध्ये झेलावा लागला. आता टीम इंडिया पुढील मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळत आहे. यात गंभीर कोच म्हणून असणार नाही.


दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर चार सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. याची सुरूवात ८ नोव्हेंबरासून होईल तर समाप्ती १५ नोव्हेंबरला होईल. यातच टीम इंडियाला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना व्हायचे आहे. अशातच गंभीरला टीम इंडियासोबत आफ्रिका दौऱ्यावर जाणे शक्य नाही.


आफ्रिका दौऱ्यावर गंभीरच्या जागी व्ही व्हीएस लक्ष्मणला टीम इंडियाचे हेड कोच म्हणून संधी मिळेल. असे यासाठी कारण आधी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ही मालिका ठरलेली नव्हती. लक्ष्मणसोबत साईराज बहुतुले, ऋषिकेश कानिटकर आणि सुभादीप घोषही आफ्रिका दौऱ्यात कोचिंग स्टाफसोबत दिसतील.



दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ


सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंह, तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमनदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, विजयकुमार वैशाक, आवेश खान, यश दयाल.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत